शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
6
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
7
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
8
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
11
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
12
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
13
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
14
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
15
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
16
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
17
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
18
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
19
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
20
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू

व्यावसायिक आनंदित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:19 IST

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे एप्रिल महिन्यापासून लाॅकडाऊन करण्यात आले होते. अत्यावश्यक सेवा सोडता इतर सर्व व्यवहार बंद होते. दरम्यान, ...

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे एप्रिल महिन्यापासून लाॅकडाऊन करण्यात आले होते. अत्यावश्यक सेवा सोडता इतर सर्व व्यवहार बंद होते. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने आता बाजारपेठ सुरू ठेवण्यासाठी वेळ वाढवून दिला आहे. आता सकाळी ७ ते सांयकाळी ७ वाजेपर्यंत बाजार सुरू राहणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. मागील दोन महिन्यातील नुकसान यामुळे भरून निघेल, असा विश्वास व्यावासयिकांनी व्यक्त केला जात आहे.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. परिणामी राज्य शासनाने लाॅकडाऊन केले. कोरोना संकटामुळे एप्रिल महिन्यात लाॅकडाऊन करण्यात आले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बंद होते. दरम्यान, जून महिन्यामध्ये रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाल्याने जिल्हा प्रशासनाने शिथिलता देत बाजारपेठेसह, शासकीय, निमशासकीय कार्यालये सुरू ठेवण्यास परवानगी दिली. त्यामुळे व्यावसायिकांसह सामान्य नागरिकांमध्येही आनंद व्यक्त करण्यात आला. त्यानंतर आता सोमवारपासून पुन्हा या वेळेत दोन तासांनी वाढ करून बाजारपेठ सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, वेळ वाढवून देण्यात आल्यामुळे बाजारातील गर्दी कमी होईल परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होईल, असेही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

कोट

जिल्हा प्रशासनाने बाजाराची वेळ दोन तासांनी वाढवून दिल्यामुळे सर्वांनाच फायदा होणार आहे. यामुळे बाजारातील गर्दीवर नियंत्रण येईल तसेच नागरिकांनाही सोयीचे होईल.

-सदानंद खत्री

व्यापारी, चंद्रपूर