शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
5
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
6
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
7
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
8
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
9
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
10
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
11
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
12
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
13
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
14
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
15
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
16
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
17
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
18
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
19
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
20
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया

व्यावसायिक आनंदित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:19 IST

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे एप्रिल महिन्यापासून लाॅकडाऊन करण्यात आले होते. अत्यावश्यक सेवा सोडता इतर सर्व व्यवहार बंद होते. दरम्यान, ...

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे एप्रिल महिन्यापासून लाॅकडाऊन करण्यात आले होते. अत्यावश्यक सेवा सोडता इतर सर्व व्यवहार बंद होते. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने आता बाजारपेठ सुरू ठेवण्यासाठी वेळ वाढवून दिला आहे. आता सकाळी ७ ते सांयकाळी ७ वाजेपर्यंत बाजार सुरू राहणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. मागील दोन महिन्यातील नुकसान यामुळे भरून निघेल, असा विश्वास व्यावासयिकांनी व्यक्त केला जात आहे.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. परिणामी राज्य शासनाने लाॅकडाऊन केले. कोरोना संकटामुळे एप्रिल महिन्यात लाॅकडाऊन करण्यात आले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बंद होते. दरम्यान, जून महिन्यामध्ये रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाल्याने जिल्हा प्रशासनाने शिथिलता देत बाजारपेठेसह, शासकीय, निमशासकीय कार्यालये सुरू ठेवण्यास परवानगी दिली. त्यामुळे व्यावसायिकांसह सामान्य नागरिकांमध्येही आनंद व्यक्त करण्यात आला. त्यानंतर आता सोमवारपासून पुन्हा या वेळेत दोन तासांनी वाढ करून बाजारपेठ सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, वेळ वाढवून देण्यात आल्यामुळे बाजारातील गर्दी कमी होईल परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होईल, असेही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

कोट

जिल्हा प्रशासनाने बाजाराची वेळ दोन तासांनी वाढवून दिल्यामुळे सर्वांनाच फायदा होणार आहे. यामुळे बाजारातील गर्दीवर नियंत्रण येईल तसेच नागरिकांनाही सोयीचे होईल.

-सदानंद खत्री

व्यापारी, चंद्रपूर