शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:01 IST

जिल्ह्यात काही गावांत सिंचनाची सुविधा आहे. अनेक शेतकरी सिंचन करून दुबार पीक घेत आहेत. नगदी पीक म्हणून भाजीपाल्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी शासनाकडून प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. या उपाययोजनेमध्ये आठवडी बाजार बंद करण्याच्या निर्णयाचा समावेश असल्याने हिरवी मिरची, टमाटर, वांगे, पालेभाज्या, फुलकोबींचे मोठे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देबाजार बंद : संसर्ग होऊ नये म्हणून प्रशासनाच्या उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी नेहमीच अडचणीत सापडत आहे, अशातच शेतकऱ्यांच्या अडचणीत कोरोनानेही भर घातली आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रशासनाने आठवडी बाजार बंद केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा भाजीपाला जागेवरच पडून राहत असल्याने मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.जिल्ह्यात काही गावांत सिंचनाची सुविधा आहे. अनेक शेतकरी सिंचन करून दुबार पीक घेत आहेत. नगदी पीक म्हणून भाजीपाल्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी शासनाकडून प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. या उपाययोजनेमध्ये आठवडी बाजार बंद करण्याच्या निर्णयाचा समावेश असल्याने हिरवी मिरची, टमाटर, वांगे, पालेभाज्या, फुलकोबींचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यावर्षी पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे जलसाठ्यात बºयापैकी वाढ झाली आहे. नदीपात्रात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे नदीकाठाशेजारील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याच्या पिकाची लागवट केली आहे.कोरोनाच्या सावटामुळे शहरातील बाजारात तसेच आठवडी बाजारतही शुकशुकाट असतो.परिणामी त्यांचे मोठे नुकसान होत आहे. विशेष म्हणजे, शहराशेजारी असलेल्या बहुतांश शेतकऱ्यांकडे भाजीपाला पिकतो. त्यामुळे ते गावात सुद्धा ग्राहक मिळेनासे झाले आहे.शेतकऱ्यांना आर्थिक फटकाशहराजवळील शेतकरी आपला शेतमाल विकण्यासाठी आणतात. मात्र जागतिक स्तरावर कोरोनाचा होणारा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने सार्वजनिक ठिकाणासह आठवडी बाजारावर बंदी आणली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या काळणीवर आलेला भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान होत आहे. भाजीपाला पीक कमी वेळात होणार असल्यामुळे तो वेळेवर काढून वेळेवर मार्केटमध्ये पोहोचण्याची धडपड शेतकºयांमध्ये असते. मात्र शहरातील आठवडी बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. एकतर संचारबंदीमुळे घराबाहेर पडणे बंद आहे. त्यामुळे रोजगार मिळेनासा झाला आहे. त्यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी