शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
2
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
4
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
5
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
6
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
7
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
8
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
9
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
10
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
11
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
12
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
13
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
14
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
15
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
16
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
17
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
18
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
19
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
20
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद

रोजगार सेवकांच्या समस्या वाढल्या

By admin | Updated: April 29, 2015 01:12 IST

शासनाच्या विविध योजनांपैकी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ आदी योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणाऱ्या मानधनापेक्षा कमी पैशात....

सिंदेवाही : शासनाच्या विविध योजनांपैकी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ आदी योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणाऱ्या मानधनापेक्षा कमी पैशात राज्य शासन रोजगार सेवकांना राबवित आहे. वेळोवेळी त्यांच्याकडून विविध प्रकारची कामे करवून घेत आहे. एकंदरीत महिन्याला आठ दिवसांचे प्रति दिवस केवळ २५ रुपयांप्रमाणे मोबदला दिला जात आहे. या अल्प मानधनावर किती दिवस काढायचे, असा प्रश्न रोजगार सेवकांना पडला आहे.अंगमेहनतीची अकुशल कामे करणाऱ्या मजुरांना रोजगार उपलब्ध व्हावा व ग्रामीण भागातील मंजुरांचे स्थलांतर थांबावे, या उद्देशाने केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम २००५ पारित केला. या कायदानुसार ग्रामीण भागातील कुटुंबाला एका वर्षात १०० दिवस रोजगार उपलब्ध करून देण्याची हमी देण्यात आली. ही योजना राबविताना ग्रामसेवकांच्या मदतीला ग्राम रोजगार सेवक देण्यात आला. परंतु काही दिवसातच ग्रामसेवक यांनी रोजगार हमी योजनेतून आपली जवाबदारी काढून घेतली. यापूर्वी ग्रामसेवकांनी रोजगार हमी योजनेच्या कामावर सेवकांनी सांभाळून मजुरांना कामे उपलब्ध करून दिली. त्यात सतत चालणारी मजुरांची नोंदणी, त्यांचे जॉबकार्ड बनविणे, कामे उपलब्ध करून देणे तसेच शासनाकडून मिळालेले विविध नमुने अद्ययावत करणे, मजुरांची डिमांड देणे,आदी कामे रोजगार सेवकांना करावी लागतात. परंतु त्यांना या सर्व कामासाठी २.२५ टक्के कमिशन दिल्या जाते. एकंदरीत त्या रोजगार सेवकाला प्रति दिवस २५ रुपये मजुरी पडते. परंतु ज्या रोजगार सेवकांच्या हाताखाली मजुर म्हणून कामे करतात त्यांना शासनाने १ एप्रिल २०१५ पासून प्रति दिवस १८१ रुपये प्रमाणे मजुरी जाहीर केली. मात्र रोजगार सेवकांना अल्प मजुरीवर काम करावे लागत आहे.