शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

रोजगार सेवकांच्या समस्या वाढल्या

By admin | Updated: April 29, 2015 01:12 IST

शासनाच्या विविध योजनांपैकी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ आदी योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणाऱ्या मानधनापेक्षा कमी पैशात....

सिंदेवाही : शासनाच्या विविध योजनांपैकी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ आदी योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणाऱ्या मानधनापेक्षा कमी पैशात राज्य शासन रोजगार सेवकांना राबवित आहे. वेळोवेळी त्यांच्याकडून विविध प्रकारची कामे करवून घेत आहे. एकंदरीत महिन्याला आठ दिवसांचे प्रति दिवस केवळ २५ रुपयांप्रमाणे मोबदला दिला जात आहे. या अल्प मानधनावर किती दिवस काढायचे, असा प्रश्न रोजगार सेवकांना पडला आहे.अंगमेहनतीची अकुशल कामे करणाऱ्या मजुरांना रोजगार उपलब्ध व्हावा व ग्रामीण भागातील मंजुरांचे स्थलांतर थांबावे, या उद्देशाने केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम २००५ पारित केला. या कायदानुसार ग्रामीण भागातील कुटुंबाला एका वर्षात १०० दिवस रोजगार उपलब्ध करून देण्याची हमी देण्यात आली. ही योजना राबविताना ग्रामसेवकांच्या मदतीला ग्राम रोजगार सेवक देण्यात आला. परंतु काही दिवसातच ग्रामसेवक यांनी रोजगार हमी योजनेतून आपली जवाबदारी काढून घेतली. यापूर्वी ग्रामसेवकांनी रोजगार हमी योजनेच्या कामावर सेवकांनी सांभाळून मजुरांना कामे उपलब्ध करून दिली. त्यात सतत चालणारी मजुरांची नोंदणी, त्यांचे जॉबकार्ड बनविणे, कामे उपलब्ध करून देणे तसेच शासनाकडून मिळालेले विविध नमुने अद्ययावत करणे, मजुरांची डिमांड देणे,आदी कामे रोजगार सेवकांना करावी लागतात. परंतु त्यांना या सर्व कामासाठी २.२५ टक्के कमिशन दिल्या जाते. एकंदरीत त्या रोजगार सेवकाला प्रति दिवस २५ रुपये मजुरी पडते. परंतु ज्या रोजगार सेवकांच्या हाताखाली मजुर म्हणून कामे करतात त्यांना शासनाने १ एप्रिल २०१५ पासून प्रति दिवस १८१ रुपये प्रमाणे मजुरी जाहीर केली. मात्र रोजगार सेवकांना अल्प मजुरीवर काम करावे लागत आहे.