शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

कालव्यावरील पूल बुजविल्याने रहदारीसह पाणी पुरवठ्याचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:01 IST

पाटबंधारे विभागाच्या सिंचाई उपविभाग सावली अंतर्गत शाखा बेंबाळचे गोवर्धन उपकालव्याने परिसरातील नांदगाव, घोसरी, बेंबाळ, बोंडाळा, फुटाणा, गोवर्धन व दिघोरी या गावातील शेतपिकांना पाणी पुरवठा केल्या जातो. सदर गोवर्धन कालवा घोसरी गावालगतच्या पुलावरूनच पोचमार्गाने रहदारी सुरू असते. आसोला तलावाची निर्मिती ब्रिटिश कालीन आहे. तेव्हापासून या पुलाची डागडुजी केली नसल्याने पुल पूर्णपणे जीर्ण झाला आहे.

ठळक मुद्देधानपिकांना फटका बसण्याची शक्यता : सिंचन विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कघोसरी : आसोला तलावांतर्गत गोवर्धन उपकालव्याच्या घोसरी लगतचे ब्रिटिश कालीन पुल जीर्ण झाल्याने रहदारीस धोकादायक झाले आहे. दरम्यान, सदर पुल आता चक्क माती टाकून बुजविण्यात आला आहे. त्यामुळे ऐन हंगामात शेतात जायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून कालवा बंद झाल्याने भविष्यात शेतीला पाणी पुरवठा करणेही कठीण होणार आहे.पाटबंधारे विभागाच्या सिंचाई उपविभाग सावली अंतर्गत शाखा बेंबाळचे गोवर्धन उपकालव्याने परिसरातील नांदगाव, घोसरी, बेंबाळ, बोंडाळा, फुटाणा, गोवर्धन व दिघोरी या गावातील शेतपिकांना पाणी पुरवठा केल्या जातो. सदर गोवर्धन कालवा घोसरी गावालगतच्या पुलावरूनच पोचमार्गाने रहदारी सुरू असते. आसोला तलावाची निर्मिती ब्रिटिश कालीन आहे. तेव्हापासून या पुलाची डागडुजी केली नसल्याने पुल पूर्णपणे जीर्ण झाला आहे.सदर पुलाचे बांधकाम करण्याबाबत पाटबंधारे विभागाकडे अनेकदा निवेदन देण्यात आले. परंतु संबंधितांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पुलाचे बांधकाम रखडलेल्याने आता कालव्यात माती टाकून बुजविला आहे. सद्यस्थितीत खरीप हंगाम ऐन तोंडावर आलेला असताना टेल वरील धान पिकांना पाणी पुरवठा करणे जिकरीचे झाले आहे. त्यामुळे शेती उत्पन्नापासून येथील शेतकऱ्यांना फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.उपाययोजना करणे आवश्यकपाटबंधारे विभागाने गोवर्धन उपकालव्याद्वारे धानपिकांना सुरळीत पाणी पुरवठा करण्याच्या हेतूने बोरघाट उपसा सिंचन योजना कार्यान्वित केली. मात्र कालव्यातील गाळ उपसा करण्यात येत नसल्यामुळे दिघोरी टेल पर्यंतच्या धानपिकांना सुरळीत पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे यावर उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीWaterपाणी