शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
3
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
4
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
5
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
6
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
7
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
9
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
10
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
11
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
12
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
13
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
14
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
15
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

प्र.के. अत्रेंच्या भाषणाने चेतली होती मने

By admin | Updated: May 1, 2015 01:09 IST

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान फार मोठे नसले तरी सीपी अँड बेरारचा काळ ....

गोपालकृष्ण मांडवकर चंद्रपूरचंद्रपूर: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान फार मोठे नसले तरी सीपी अँड बेरारचा काळ अनुभवणाऱ्या आंध्र-महाराष्ट्र सीमेवरील या जिल्ह्याने उपक्षेची धग मात्र अनुभवली होती. या धगीतूनच वेगळ्या विदर्भ राज्यनिर्मितीच्या बाजूने या जिल्ह्याची मानसिकता होती. मात्र नंतरच्या काळात संंयुक्त महाराष्ट्राच्या पाठीशी चंद्रपूर जिल्ह्यातून जनमत उभे झाले. विशेष म्हणजे, आचार्य प्र. के. अत्रे यांच्यासारख्यांच्या भाषणांनी येथील लोकांची मने चेतविण्याचे काम केले होते.संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभागी असलेल्यापैकी बहुतेक जण आता हयात नाहीत. केवळ बोटावर मोजण्याएवढी मंडळी आता हयात असली तरी अनेकांच्या आठवणी धुसर झाल्या आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत रिपब्लिकन पार्टी हा महत्वाचा घटक पक्ष होता. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आंदोलनाच्या निमीत्ताने भाई डांगे, एस.एम. जोशी, उद्धवराव पाटील आदी प्रभुतींची नेहमी ये-जा असायची. बॅरिष्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत काम केले. दादासाहेब गायकवाड यांचे त्यांना सहकार्य असायचे. चंद्रपूर जिल्ह्यातील कॉग्रसेचे नेते विदर्भवादी होते. दिवंगत मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार हे सुद्धा प्रारंभी कट्टर विदर्भवादी होते. मुंबईत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू असताना कन्नमवारांनी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा ताणून धरला होता. तेव्हा ते यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात मंत्री होते. मात्र याच काळात पंडित जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण आणि मा.सा. कन्नमवार यांची बंदद्वार चर्चा झाली. अखेर राजकीय तडजोडीतून कन्नमवारांनी संयुक्त महाराष्ट्राला पाठिंबा दिल्याची आठवण आजही चंद्रपूर जिल्ह्यातील जुन्या जाणत्या जेष्ठांना आहे.याच काळात बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे, अ‍ॅड. केशवराव नालमवार, शांताराम पोटदुखे आदी मंडळ संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीकडे वळली. मात्र यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात मोठी आंदोलने झाल्याचे ऐकिवात नाही. १९५८-५९ या काळात हे आंदोलन ऐन भरास आले असताना आचार्य प्र.के. अत्रे यांचे व्याख्यान चंद्रपुरातील गांधी चौकात झाल्याची आठवण माजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे यांच्या स्मरणात आहे. त्यांच्या व्याख्यानाने आणि त्यांच्या नर्मविनोदी शैलीने वातावरण कसे घडविले होते, याची आठवण ते सांगतात. १ मे १९६० मध्ये महाराष्ट्रदिनाचा पहिला शासकीय सोहळा ज्युबिली शाळेच्या मैदानावर झाला होता. या समारंभात जनता मोठ्या संख्येने सहभागी होती. तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांनी हा समारंभ आयोजति केला होता.संयुक्त महाराष्ट्राच्या निर्र्मीतीमुळे चंद्रपूर जिल्ह्यासह अहेरी, गडचिरोली हे विकासाच्या प्रवाहात जोडले जातील अशी कै. मा.सा. कन्नमवारांची अपेक्षा होती. याच अपेक्षेने चंद्रपुरातील मंडळीही या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत उतरली होती. मात्र संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर ठोस असे काही मिळाले नाही. भद्रावतीमध्ये आयुधे निर्माण करण्याचा कारखाना आला. चंद्रपूर शहरात जिल्हा सामान्य रूग्णालय उभे राहीले. एक उड्डाण पूलही नंतरच्या काळात झाला. मात्र सिंचन, दळणवळ या दृष्टीने म्हणावा तसा विकासाला वाव मिळाला नाही. गडचिरोली, अहेरी हा ऐके काळी चंद्रपूरचाच असलेला भाग आजही उपेक्षितच आहे. विकासाची स्वप्न खुप सारी होती. मात्र विदर्भाचा अनुशेष सतत वाढतच राहिला. यातूनच स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी पुन्हा उचल खात आहे.