शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

प्र.के. अत्रेंच्या भाषणाने चेतली होती मने

By admin | Updated: May 1, 2015 01:09 IST

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान फार मोठे नसले तरी सीपी अँड बेरारचा काळ ....

गोपालकृष्ण मांडवकर चंद्रपूरचंद्रपूर: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान फार मोठे नसले तरी सीपी अँड बेरारचा काळ अनुभवणाऱ्या आंध्र-महाराष्ट्र सीमेवरील या जिल्ह्याने उपक्षेची धग मात्र अनुभवली होती. या धगीतूनच वेगळ्या विदर्भ राज्यनिर्मितीच्या बाजूने या जिल्ह्याची मानसिकता होती. मात्र नंतरच्या काळात संंयुक्त महाराष्ट्राच्या पाठीशी चंद्रपूर जिल्ह्यातून जनमत उभे झाले. विशेष म्हणजे, आचार्य प्र. के. अत्रे यांच्यासारख्यांच्या भाषणांनी येथील लोकांची मने चेतविण्याचे काम केले होते.संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभागी असलेल्यापैकी बहुतेक जण आता हयात नाहीत. केवळ बोटावर मोजण्याएवढी मंडळी आता हयात असली तरी अनेकांच्या आठवणी धुसर झाल्या आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत रिपब्लिकन पार्टी हा महत्वाचा घटक पक्ष होता. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आंदोलनाच्या निमीत्ताने भाई डांगे, एस.एम. जोशी, उद्धवराव पाटील आदी प्रभुतींची नेहमी ये-जा असायची. बॅरिष्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत काम केले. दादासाहेब गायकवाड यांचे त्यांना सहकार्य असायचे. चंद्रपूर जिल्ह्यातील कॉग्रसेचे नेते विदर्भवादी होते. दिवंगत मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार हे सुद्धा प्रारंभी कट्टर विदर्भवादी होते. मुंबईत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू असताना कन्नमवारांनी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा ताणून धरला होता. तेव्हा ते यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात मंत्री होते. मात्र याच काळात पंडित जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण आणि मा.सा. कन्नमवार यांची बंदद्वार चर्चा झाली. अखेर राजकीय तडजोडीतून कन्नमवारांनी संयुक्त महाराष्ट्राला पाठिंबा दिल्याची आठवण आजही चंद्रपूर जिल्ह्यातील जुन्या जाणत्या जेष्ठांना आहे.याच काळात बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे, अ‍ॅड. केशवराव नालमवार, शांताराम पोटदुखे आदी मंडळ संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीकडे वळली. मात्र यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात मोठी आंदोलने झाल्याचे ऐकिवात नाही. १९५८-५९ या काळात हे आंदोलन ऐन भरास आले असताना आचार्य प्र.के. अत्रे यांचे व्याख्यान चंद्रपुरातील गांधी चौकात झाल्याची आठवण माजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे यांच्या स्मरणात आहे. त्यांच्या व्याख्यानाने आणि त्यांच्या नर्मविनोदी शैलीने वातावरण कसे घडविले होते, याची आठवण ते सांगतात. १ मे १९६० मध्ये महाराष्ट्रदिनाचा पहिला शासकीय सोहळा ज्युबिली शाळेच्या मैदानावर झाला होता. या समारंभात जनता मोठ्या संख्येने सहभागी होती. तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांनी हा समारंभ आयोजति केला होता.संयुक्त महाराष्ट्राच्या निर्र्मीतीमुळे चंद्रपूर जिल्ह्यासह अहेरी, गडचिरोली हे विकासाच्या प्रवाहात जोडले जातील अशी कै. मा.सा. कन्नमवारांची अपेक्षा होती. याच अपेक्षेने चंद्रपुरातील मंडळीही या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत उतरली होती. मात्र संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर ठोस असे काही मिळाले नाही. भद्रावतीमध्ये आयुधे निर्माण करण्याचा कारखाना आला. चंद्रपूर शहरात जिल्हा सामान्य रूग्णालय उभे राहीले. एक उड्डाण पूलही नंतरच्या काळात झाला. मात्र सिंचन, दळणवळ या दृष्टीने म्हणावा तसा विकासाला वाव मिळाला नाही. गडचिरोली, अहेरी हा ऐके काळी चंद्रपूरचाच असलेला भाग आजही उपेक्षितच आहे. विकासाची स्वप्न खुप सारी होती. मात्र विदर्भाचा अनुशेष सतत वाढतच राहिला. यातूनच स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी पुन्हा उचल खात आहे.