शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

प्र.के. अत्रेंच्या भाषणाने चेतली होती मने

By admin | Updated: May 1, 2015 01:09 IST

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान फार मोठे नसले तरी सीपी अँड बेरारचा काळ ....

गोपालकृष्ण मांडवकर चंद्रपूरचंद्रपूर: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान फार मोठे नसले तरी सीपी अँड बेरारचा काळ अनुभवणाऱ्या आंध्र-महाराष्ट्र सीमेवरील या जिल्ह्याने उपक्षेची धग मात्र अनुभवली होती. या धगीतूनच वेगळ्या विदर्भ राज्यनिर्मितीच्या बाजूने या जिल्ह्याची मानसिकता होती. मात्र नंतरच्या काळात संंयुक्त महाराष्ट्राच्या पाठीशी चंद्रपूर जिल्ह्यातून जनमत उभे झाले. विशेष म्हणजे, आचार्य प्र. के. अत्रे यांच्यासारख्यांच्या भाषणांनी येथील लोकांची मने चेतविण्याचे काम केले होते.संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभागी असलेल्यापैकी बहुतेक जण आता हयात नाहीत. केवळ बोटावर मोजण्याएवढी मंडळी आता हयात असली तरी अनेकांच्या आठवणी धुसर झाल्या आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत रिपब्लिकन पार्टी हा महत्वाचा घटक पक्ष होता. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आंदोलनाच्या निमीत्ताने भाई डांगे, एस.एम. जोशी, उद्धवराव पाटील आदी प्रभुतींची नेहमी ये-जा असायची. बॅरिष्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत काम केले. दादासाहेब गायकवाड यांचे त्यांना सहकार्य असायचे. चंद्रपूर जिल्ह्यातील कॉग्रसेचे नेते विदर्भवादी होते. दिवंगत मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार हे सुद्धा प्रारंभी कट्टर विदर्भवादी होते. मुंबईत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू असताना कन्नमवारांनी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा ताणून धरला होता. तेव्हा ते यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात मंत्री होते. मात्र याच काळात पंडित जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण आणि मा.सा. कन्नमवार यांची बंदद्वार चर्चा झाली. अखेर राजकीय तडजोडीतून कन्नमवारांनी संयुक्त महाराष्ट्राला पाठिंबा दिल्याची आठवण आजही चंद्रपूर जिल्ह्यातील जुन्या जाणत्या जेष्ठांना आहे.याच काळात बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे, अ‍ॅड. केशवराव नालमवार, शांताराम पोटदुखे आदी मंडळ संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीकडे वळली. मात्र यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात मोठी आंदोलने झाल्याचे ऐकिवात नाही. १९५८-५९ या काळात हे आंदोलन ऐन भरास आले असताना आचार्य प्र.के. अत्रे यांचे व्याख्यान चंद्रपुरातील गांधी चौकात झाल्याची आठवण माजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे यांच्या स्मरणात आहे. त्यांच्या व्याख्यानाने आणि त्यांच्या नर्मविनोदी शैलीने वातावरण कसे घडविले होते, याची आठवण ते सांगतात. १ मे १९६० मध्ये महाराष्ट्रदिनाचा पहिला शासकीय सोहळा ज्युबिली शाळेच्या मैदानावर झाला होता. या समारंभात जनता मोठ्या संख्येने सहभागी होती. तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांनी हा समारंभ आयोजति केला होता.संयुक्त महाराष्ट्राच्या निर्र्मीतीमुळे चंद्रपूर जिल्ह्यासह अहेरी, गडचिरोली हे विकासाच्या प्रवाहात जोडले जातील अशी कै. मा.सा. कन्नमवारांची अपेक्षा होती. याच अपेक्षेने चंद्रपुरातील मंडळीही या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत उतरली होती. मात्र संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर ठोस असे काही मिळाले नाही. भद्रावतीमध्ये आयुधे निर्माण करण्याचा कारखाना आला. चंद्रपूर शहरात जिल्हा सामान्य रूग्णालय उभे राहीले. एक उड्डाण पूलही नंतरच्या काळात झाला. मात्र सिंचन, दळणवळ या दृष्टीने म्हणावा तसा विकासाला वाव मिळाला नाही. गडचिरोली, अहेरी हा ऐके काळी चंद्रपूरचाच असलेला भाग आजही उपेक्षितच आहे. विकासाची स्वप्न खुप सारी होती. मात्र विदर्भाचा अनुशेष सतत वाढतच राहिला. यातूनच स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी पुन्हा उचल खात आहे.