शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
3
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?
4
झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणी त्यांच्याच चुलत भावाला अटक; सिंगापूर यॉट पार्टीशी काय संबंध?
5
TATA च्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार उसळी; सोन्यातील तेजीदरम्यानही ब्रोकरेजचा विश्वास कायम, तुमच्याकडे आहे का?
6
सोनम वांगचूक यांना भेटायला तुरुंगात पोहोचल्या पत्नी गीतांजली! पुढे काय करणार? सांगितला प्लॅन
7
Priyanka Gandhi : Video - प्रियंका गांधींनी का मागितली अभिनेत्री आलिया भटची माफी?, टॅग करून म्हणाल्या...
8
"स्मिता पाटीलच्या मृतदेहावर मी मेकअप करत होतो आणि डोळ्यातून...", अभिनेत्रीच्या मेकअप आर्टिस्टचा खुलासा
9
Rohit Sharma Diet Plan : रोहित शर्माचा नवीन लूक, दहा किलो वजन घटवले; 'हिटमॅन'चा डाएट प्लान आला समोर
10
सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट
11
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
12
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
13
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
14
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
15
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
16
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
17
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
18
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
19
तुमच्याकडे असलेलं १० रूपयांचं नाणं खरं की खोटं?; RBI नं सांगितलं सत्य, वाचा काय आहे प्रकार?
20
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा

प्र.के. अत्रेंच्या भाषणाने चेतली होती मने

By admin | Updated: May 1, 2015 01:09 IST

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान फार मोठे नसले तरी सीपी अँड बेरारचा काळ ....

गोपालकृष्ण मांडवकर चंद्रपूरचंद्रपूर: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान फार मोठे नसले तरी सीपी अँड बेरारचा काळ अनुभवणाऱ्या आंध्र-महाराष्ट्र सीमेवरील या जिल्ह्याने उपक्षेची धग मात्र अनुभवली होती. या धगीतूनच वेगळ्या विदर्भ राज्यनिर्मितीच्या बाजूने या जिल्ह्याची मानसिकता होती. मात्र नंतरच्या काळात संंयुक्त महाराष्ट्राच्या पाठीशी चंद्रपूर जिल्ह्यातून जनमत उभे झाले. विशेष म्हणजे, आचार्य प्र. के. अत्रे यांच्यासारख्यांच्या भाषणांनी येथील लोकांची मने चेतविण्याचे काम केले होते.संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभागी असलेल्यापैकी बहुतेक जण आता हयात नाहीत. केवळ बोटावर मोजण्याएवढी मंडळी आता हयात असली तरी अनेकांच्या आठवणी धुसर झाल्या आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत रिपब्लिकन पार्टी हा महत्वाचा घटक पक्ष होता. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आंदोलनाच्या निमीत्ताने भाई डांगे, एस.एम. जोशी, उद्धवराव पाटील आदी प्रभुतींची नेहमी ये-जा असायची. बॅरिष्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत काम केले. दादासाहेब गायकवाड यांचे त्यांना सहकार्य असायचे. चंद्रपूर जिल्ह्यातील कॉग्रसेचे नेते विदर्भवादी होते. दिवंगत मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार हे सुद्धा प्रारंभी कट्टर विदर्भवादी होते. मुंबईत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू असताना कन्नमवारांनी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा ताणून धरला होता. तेव्हा ते यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात मंत्री होते. मात्र याच काळात पंडित जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण आणि मा.सा. कन्नमवार यांची बंदद्वार चर्चा झाली. अखेर राजकीय तडजोडीतून कन्नमवारांनी संयुक्त महाराष्ट्राला पाठिंबा दिल्याची आठवण आजही चंद्रपूर जिल्ह्यातील जुन्या जाणत्या जेष्ठांना आहे.याच काळात बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे, अ‍ॅड. केशवराव नालमवार, शांताराम पोटदुखे आदी मंडळ संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीकडे वळली. मात्र यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात मोठी आंदोलने झाल्याचे ऐकिवात नाही. १९५८-५९ या काळात हे आंदोलन ऐन भरास आले असताना आचार्य प्र.के. अत्रे यांचे व्याख्यान चंद्रपुरातील गांधी चौकात झाल्याची आठवण माजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे यांच्या स्मरणात आहे. त्यांच्या व्याख्यानाने आणि त्यांच्या नर्मविनोदी शैलीने वातावरण कसे घडविले होते, याची आठवण ते सांगतात. १ मे १९६० मध्ये महाराष्ट्रदिनाचा पहिला शासकीय सोहळा ज्युबिली शाळेच्या मैदानावर झाला होता. या समारंभात जनता मोठ्या संख्येने सहभागी होती. तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांनी हा समारंभ आयोजति केला होता.संयुक्त महाराष्ट्राच्या निर्र्मीतीमुळे चंद्रपूर जिल्ह्यासह अहेरी, गडचिरोली हे विकासाच्या प्रवाहात जोडले जातील अशी कै. मा.सा. कन्नमवारांची अपेक्षा होती. याच अपेक्षेने चंद्रपुरातील मंडळीही या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत उतरली होती. मात्र संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर ठोस असे काही मिळाले नाही. भद्रावतीमध्ये आयुधे निर्माण करण्याचा कारखाना आला. चंद्रपूर शहरात जिल्हा सामान्य रूग्णालय उभे राहीले. एक उड्डाण पूलही नंतरच्या काळात झाला. मात्र सिंचन, दळणवळ या दृष्टीने म्हणावा तसा विकासाला वाव मिळाला नाही. गडचिरोली, अहेरी हा ऐके काळी चंद्रपूरचाच असलेला भाग आजही उपेक्षितच आहे. विकासाची स्वप्न खुप सारी होती. मात्र विदर्भाचा अनुशेष सतत वाढतच राहिला. यातूनच स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी पुन्हा उचल खात आहे.