शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट सुरुच; भाड्यात दुप्पट-तिप्पट दराने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 18:16 IST

एसटी कर्मचाऱ्यांनी शासनामध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. याचाच फायदा घेत अनेक खासगी प्रवासी वाहने रस्त्यावर धावत असून प्रवाशांकडून वारेमाप शुल्क आकारले जात आहे.

ठळक मुद्देऔरंगाबाद भाडे १७००, प्रवाशांची लूट पर्यायच नसल्याने प्रवाशांकडून खासगी वाहनांचा वापर

चंद्रपूर : शासनात विलीनीकरणासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे खासगी प्रवासी वाहनांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. प्रवासाची साधने कमी असल्याने ट्रॅव्हल्सधारक मनमानी भाडे वसूल करीत आहेत. चंद्रपूर ते औरंगाबादचे भाडे तर १७०० रुपये आकारत आहेत. मात्र पर्याय नसल्याने अतिरिक्त भाडे देऊन प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.

मागील दोन महिन्यांपासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी शासनामध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. याचाच फायदा घेत अनेक खासगी प्रवासी वाहने रस्त्यावर धावत आहेत. ट्रॅव्हल्स तर खचाखच भरून धावत आहेत. तसेच त्यांनी भाडेवाढसुद्धा केली आहे.

चंद्रपुरातून पुणे, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, चिमूर, वरोरा, राजुरा आदी मार्गावर ट्रॅव्हल्स मोठ्या प्रमाणात धावत आहेत. त्यातच कोरोनाने रेल्वेही अल्प प्रमाणात धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना ट्रॅव्हल्सशिवाय पर्याय नाही. परिणामी ट्रॅव्हल्सची प्रत्येक फेरी खचाखच भरून धावते. तपासणीही होत नसल्याने वारेमाप शुल्क आकारले जात आहे.

ट्रॅव्हल्स चालकांची मनमानी

प्रवाशांची हेडसांड होऊ नये वाहतूक विभागातर्फे व आरटीओतर्फे स्कूल बसेस, खासगी वाहनांना परवानगी दिली आहे. तपासणीसाठी पोलिसांचे पथकही गठित केले आहे. तसेच निरीक्षकही नेमण्यात आले आहेत. परंतु, पाहिजे त्या प्रमाणात कारवाई होत नसल्याने ट्रॅव्हल्स चालकांची मनमानी सुरू आहे.

ट्रॅव्हल्सवर कारवाई नाही

ट्रॅव्हल्समध्ये असलेल्या क्षमतेपेक्षा अधिक सीट भरल्या, तर आरटीओचे किंवा वाहतूक विभागाचे पथक कारवाई करीत होते. मात्र संप सुरू असल्याने पोलिसांचेही दुर्लक्ष होत आहे की काय, असे दिसून येत आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्स चालकांची मनमानी सुरू आहे. ते अतिरिक्त शुल्क आकारत आहेत.

पैसे जास्त देण्याशिवाय पर्याय काय?

ट्रेनही बंद आहे. बससुद्धा नाही. परंतु, कामानिमित्त प्रवास करावाच लागतो. त्यामुळे इच्छा नसूनही, पर्याय नाही म्हणून अतिरिक्त पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे.

- अमित दुधे, प्रवासी

चंद्रपूर ते गडचिरोली जाण्यासाठी बसने केवळ ९० रुपये लागायचे. परंतु, ट्रॅव्हल्सने १०० रुपये द्यावे लागतात. तेसुद्धा ट्रॅव्हल्स व्याहाडपर्यंत जात असते. पर्याय नसल्याने प्रवास करावाच लागतो.

- धम्मदीप बोरकर, प्रवासी

टॅग्स :ST Strikeएसटी संपagitationआंदोलनpassengerप्रवासीPublic Transportसार्वजनिक वाहतूकticketतिकिट