शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

आदिवासींसह सिंचन व उद्योगांच्या प्रश्नांना प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:14 IST

महाराष्ट्राचे काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणून निवडून आलेले सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांचे चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या विकाससाठी काय व्हिजन आहे? याची उत्सुकता समस्त जनतेला लागून आहे. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे स्पष्ट केले.

ठळक मुद्देसुरेश धानोरकर। ‘लोकमत’जवळ स्पष्ट केला चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्राचे काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणून निवडून आलेले सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांचे चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या विकाससाठी काय व्हिजन आहे? याची उत्सुकता समस्त जनतेला लागून आहे. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे स्पष्ट केले. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावर असून त्यांचे अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोईसाठी वर्धा नदीवर पाच बॅरेजची गरज आहे. जिल्ह्यातील बंद पडलेले उद्योग सुरू करणे आणि नवीन उद्योग जिल्ह्यात कसे येईल, या प्रश्नांना प्राधान्यक्रमाने सोडविण्याचा भविष्यात प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.तब्बल १५ वर्षानंतर चंद्रपूर लोकसभा मतदार संघात सुरेश धानोकर यांच्या रुपाने काँग्रेसने भाजपच्या ताब्यात असलेला गड परत मिळविला. धानोरकरांच्या रुपाने काँग्रेसला अख्ख्या महाराष्ट्रात चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून प्रतिनिधित्व मिळाले आहेत. या मतदारसंघाबाबत त्यांनी तयार केलेला ‘रोडमॅप’ नेमका काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. खासदार धानोरकर म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. जिल्ह्याचा एक भागच आदिवासी बांधवांचा आहे. त्यांचे अनेक प्रश्न आवासून उभे आहेत. त्यांचा घरकुलाचा प्रश्न गंभीर आहे. आदिवासी बांधवांना घरकुल उपलब्ध करून देणे हा आपला पहिला प्रयत्न असणार आहे.वर्धा नदी ही चंद्रपूर जिल्ह्यासाठी जीवनदायिनी आहे. परंतु शेतकऱ्यांना या नदीच्या पाण्याचा काहीच फायदा होत नाही. परिणामी शेती तोट्यात चालली आहे.शेतकºयांचे जीवनमान उंचवायचे असेल तर सिंचनाची सोय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यासाठी वर्धा नदीवर राजुरा ते वरोरापर्यंत ठिकठिकाणी पाच बॅरेज बांधण्याची नितांत गरज आहे. यामुळे शेतकºयांना थेट लाभ होईल. चंद्रपूर जिल्ह्यात उद्योगांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यातील ८० टक्के उद्योग हे बंद पडलेले आहे.यामुळे बेरोजगारांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. बेरोजगांचे प्रश्न सोडविण्यासाठी बंद पडलेले उद्योग कसे सुरू होतील, हा आपला प्रामाणिक प्रयत्न राहणार आहेत. यासोबतच जिल्ह्यात नवीन उद्योग कसे येतील, यासाठीही सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे खासदार धानोरकर यांनी नमूद केले.संपूर्ण महाराष्ट्रातच दारूबंदी करावी...चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठावी ही आपली मागणी नाही. दारुबंदीचा फायदा अन्य राज्यांना होत आहे. महाराष्ट्राला मिळणारा महसूल अन्य राज्याला मिळत आहे. केवळ चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्टÑातच दारूबंदी केली पाहिजे. चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठावी, ही आपली मागणी नाही, या शब्दात खासदार सुरेश धानोरकर यांनी दारूबंदीविषयी आपली भूमिका स्पष्ट केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालcongressकाँग्रेस