शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

बाजार समितीतच पिकाला कवडीमोल भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 05:00 IST

राजुरा तालुक्यात यावर्षी चार हजार ५५२ हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली. सोयाबीन कमी कालावधीचे नगदी पीक असल्याने शेतकऱ्यांनी यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढविला. लवकर सोयाबीन निघून यावर्षी दिवाळी सण आनंदात जाईल, असे वाटत असतानाच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. कापणी करून ठेवलेला सोयाबीन कडपा पावसात भिजल्याने सोयाबीनच्या शेंगा अंकुरल्या आहे.

ठळक मुद्देओले असल्याचे कारण : ३७१० रुपये हमीभाव, खरेदी दोन हजारात

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राजुरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला खासगी व्यापाऱ्यांकडून दोन हजार रुपयांपर्यंत कमी दर देत असल्याने शेतकऱ्यांची डोळ्यादेखत फसवणूक करण्यात येत आहे. मात्र याकडे सरकारी यंत्रणेचे नियंत्रण नसल्याने शेतकºयांना मोठया प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.राजुरा तालुक्यात यावर्षी चार हजार ५५२ हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली. सोयाबीन कमी कालावधीचे नगदी पीक असल्याने शेतकऱ्यांनी यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढविला. लवकर सोयाबीन निघून यावर्षी दिवाळी सण आनंदात जाईल, असे वाटत असतानाच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. कापणी करून ठेवलेला सोयाबीन कडपा पावसात भिजल्याने सोयाबीनच्या शेंगा अंकुरल्या आहे. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राजुरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन ओले असल्याच्या नावावर खासगी व्यापारी शेतकऱ्यांची अक्षरश: लूट करीत आहे. कवडीमोल भावात खासगी व्यापारी सोयाबीनची खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.सोयाबीनला ३ हजार ७१० रुपये हमीभाव असताना सोयाबीन ओले असल्याच्या नावाखाली खासगी व्यापारी सोयाबीनला ३ हजार ५०० रुपयांपासून २ हजार रुपयांपर्यंत कमी दर देत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्यात येत आहे. एवढया मोठया प्रमाणात शेतकऱ्यांची खासगी व्यापारी लूट करीत असल्याने सरकारी यंत्रणा मात्र गप्प आहे. शेतकºयांचे कैवारी समजले जाणारे राजकीय पुढारी शेतकºयांच्या समस्या जाणून घ्यायला अजिबात तयार नाही. परतीच्या पावसाने शेतकºयांचे कंबरडे मोडले असताना पुन्हा सुल्तानी संकट शेतकºयांची पाठ सोडायला तयार नाही. शेतकऱ्यांचा कोणी वालीच उरला नसल्याने शेतकरी नाईलाजाने सोयाबीनची विक्री करीत आहे. यात व्यापाºयांचे फावत आहे.नाफेडची सोयाबीन खरेदी बंदचराजुरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दरवर्षी नाफेडची खरेदी करण्यात येते. मात्र दिवाळी होऊन १५ दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी नाफेडची शासकीय खरेदी अद्यापही सुरू करण्यात आली नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीत खासगी व्यापारी सोयाबीनचा लिलाव दुपारनंतर करीत असल्याने शेतकºयांना नाईलाजाने रात्रीपर्यंत ताटकळत राहावे लागत आहे.

टॅग्स :agricultureशेती