शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

चांदा ते बांदा योजनेसाठी आराखडे सादर करा

By admin | Updated: August 17, 2016 00:34 IST

विविध संसाधनाचा नियोजनबध्द वापर करण्यासोबतच रोजगाराच्या संधी तसेच जिल्हयाचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी चांदा ते बांधा ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे.

दीपक केसरकर : विविध योजनेअंतर्गत रोजगार निर्मितीवर भरचंद्रपूर : विविध संसाधनाचा नियोजनबध्द वापर करण्यासोबतच रोजगाराच्या संधी तसेच जिल्हयाचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी चांदा ते बांधा ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत विविध विभागाने आपले नाविण्यपूर्ण आराखडे तातडीने सादर करावे, असे निर्देश वित्त व नियोजन तसेच गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात चांदा ते बांदा योजने संदर्भात आयोजित बैठकीच्या वेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच आमदार बाळु धानोरकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, मनपा आयुक्त संजय काकडे, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, अप्पर पोलीस अधिक्षक राजपुत, बाधंकामाचे अधिक्षक अभियंता डी.के.बालपांडे, कार्यकारी अभियंता मनोज जयस्वाल, जिल्हा नियोजन अधिकारी जी.आर.वायाळ यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.सिंधुदुर्ग व चंद्रपूर जिल्हयामध्ये रिसोर्स बेस्ड डेव्हलमेंटसाठी सदर चांदा ते बांधा ही योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत कृषी व संबंधित क्षेत्र, पर्यटन, पशु, दूग्ध व मत्स्यव्यवसाय, उद्योग व खनिज विकास, जलसंपदा व वने, ग्रामीण विकास व गरिबी निर्मूलन या सहा बाबींकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. विविध संसाधनाचा नियोजनबध्द वापर करुन दरडोई उत्पन्न दुप्पट करणे तसेच विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत असल्याचे केसरकर म्हणाले.या योजनेअंतर्गत नाविण्यपूर्ण उपक्रम हाती घेणे आवश्यक आहे. जिल्हयातील पर्यटनास चालना देण्यासोबतच शेतकऱ्यांना दिलासा देणारे छोटे मोठे उद्योग, क्लस्टर प्रस्तावित केले जावे. पशु, दुग्ध आणि मत्स्यव्यसायाला चालना देण्यासोबतच फलोत्पादन, बांबूवर आधारित वस्तु निर्मिती, धानापासून पोहे, चुरमुरे बनविण्याचे उद्योग आदी विविध उपक्रमांचा समावेश करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. पर्यटनासाठी व्हिलेज टुुरीझम सुरु करण्यासारखे उपक्रम प्राधान्याने घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. याबाबत येत्या १५ दिवसात पुन्हा स्वतंत्र बैठक घेतली जाईल. यावेळी विभागाने आपले परिपूर्ण प्रस्ताव सादर करावे, असे केसरकर यांनी सांगितले.विविध प्रकारचे क्लस्टर तयार करताना तालुकानिहाय करण्याची सूचना यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. प्रत्येक तालुक्यात रोजगार निर्मितीचा वेगळा उपक्रम घेण्याबाबतही त्यांनी सूचविले. चंद्रपूर शहरातील रामाळा तलाव पर्यटन विकास महामंडळ व महानगरपालिकेच्या वतीने विकसित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. (शहर प्रतिनिधी)