शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

एका बेंचवर एकच विद्यार्थी बसविण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 05:00 IST

शासन निर्देश व शाळा व्यवस्थापन समितीच्या सहमतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीत चालावे, वर्ग पाळीतही बदल केले जाणार आहे. १ जुलै २०२० पासून इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू राहतील, यासाठी दोन पाळीचे नियोजन तयार आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सकाळी ९ ते दुपारी १२ वाजतापर्यंत नववी इयत्ता व दुपारी १२ ते दुपारी ३ वाजता पर्यंत दहाव्या वर्गाच्या अध्यापनासाठी विद्यार्थ्यांना बोलविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देचंद्रपूर मनपाचे नियोजन : आठवड्यातून एक दिवस घरी जावून शिक्षक करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनामुळे शाळा सुरू करण्याबाबत राज्य शासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये संभ्रम आहे. मात्र, यासंदर्भात कधीही आदेश निर्गमित होऊ शकतो हे लक्षात घेऊन चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाने शहरातील ३ हजार २२७ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पूर्वतयारी करून ठेवली आहे. त्याचाच भाग म्हणून एका बेंचवर एकच विद्यार्थी बसविण्याचे नियोजनही केले आहे.चंद्रपूर महानगर पालिकेच्या वतीने शहरात ३२ शाळा चालविल्या जातात. कोरोना लॉकडाऊनमुळे शहरातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी विविध पर्यायी उपाययोजना करून ठेवण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार १६ मार्च २०२० पासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे चालू सत्रातील शिक्षण कशा प्रकारे सुरू करता येईल, यासाठी महापौर राखी कंचर्लावार, मनपा महापौर व आयुक्त राजेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात मनपा उपायुक्त गजानन बोकडे यांच्या नेतृत्वात आराखडा सज्ज ठेवण्यात आला आहे. महानगर पालिकेच्या सर्व शाळेत कोविड १९ प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून २५ जूनपर्यंत शहरातील सर्व ३२ शाळा सॅनिटायझर व फॉगिंग पूर्ण करण्यात येणार आहे. मनपा सर्व शाळेत मास्क, सॅनिटायझर, उपलब्ध करून देण्यात येईल. शुक्रवारपर्यंत सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक पोहचविण्यात येणार आहे. शिक्षकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून वर्गनिहाय पालक सभा घ्यायच्या, यासंदर्भात नियोजन पूर्ण झाले. सर्व शिक्षकांनी वर्गनिहाय विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शैक्षणिक वाटचाल सुरू राहावी, यासाठी पाठ्यपुस्तके पोहोवत आहेत. सत्र सुरू झाले तर विद्यार्थी व पालकांना कोविड १९ प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देण्यात येईल. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी दिशा अ‍ॅपच्या माध्यमातून शिक्षक आठवड्यातून एक दिवस घरी जाऊन मार्गदर्शन करीत आहेत.वर्ग पाळीत करणार बदलशासन निर्देश व शाळा व्यवस्थापन समितीच्या सहमतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीत चालावे, वर्ग पाळीतही बदल केले जाणार आहे. १ जुलै २०२० पासून इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू राहतील, यासाठी दोन पाळीचे नियोजन तयार आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सकाळी ९ ते दुपारी १२ वाजतापर्यंत नववी इयत्ता व दुपारी १२ ते दुपारी ३ वाजता पर्यंत दहाव्या वर्गाच्या अध्यापनासाठी विद्यार्थ्यांना बोलविण्यात येणार आहे.दर आठवड्यातून आरोग्य तपासणीप्रत्येक विद्यार्थ्यांचे थर्मामिटरने तापमान मोजून नोंद घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी घरी येताना मास्क व पिण्याचे पाणी सोबत आणावे, कोणताही विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांचे साहित्य घेणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली नसल्यासरूग्णालयात उपचार करण्यात येईल किंवा शाळेत न येण्याच्या सूचना पालकांना देण्यात येईल. १५ दिवसांनी शाळा सॅनिटायझर करण्यासोबतच विद्यार्थी व शिक्षकांची एक दिवस आरोग्य तपासणी होणार आहे.शाळा सुरू करण्याबाबत आदेश जारी झाल्यास कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आराखडा तयार आहे. यामध्ये पालकांनाही सहभागी करून घेण्यासंदर्भात मनपाच्या सर्व शाळा व्यवस्थापन समित्यांची सोशल डिस्टन्सिंग पाळून शुक्रवारी सभा आयोजित करण्यात आली.-नागेश नित, प्रशासन अधिकारी (शिक्षण) मनपा, चंद्रपूरचंद्रपूर महानगर पालिकेतील शाळांची गुणवत्ता आता सुधारली आहे. यंदा कोरोनामुळे शाळा बंद आहेत. याही परिस्थितीत मनपाने विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद कायम ठेवला. शाळा कधी सुरू होणार, याबाबत अनिश्चितता असली तरी पालकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे.- श्रीकांत चौधरी, पालक, चंद्रपूर

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या