शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

कृषी विभागातील पदे भरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 4:27 AM

ब्रह्मपुरी : शासकीय कार्यालयातील तसेच कृषी विभागातील विविध पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या गतिमानतेवर परिणाम झाला आहे. अनेक योजनांचा ...

ब्रह्मपुरी : शासकीय कार्यालयातील तसेच कृषी विभागातील विविध पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या गतिमानतेवर परिणाम झाला आहे. अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी कार्यालयात येत आहेत. परंतु, महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामांवर परिणाम झाला आहे. यातील काही रिक्त पदे अनुकंपा तत्त्वातील आहेत.

रस्त्यावर नागरिकांचे अतिक्रमण

कोरपना : नांदा गावालगत सिमेंट उद्योग असल्याने मागील काही वर्षांमध्ये परिसरात वाहनांची संख्या वाढली. या परिसरातील रस्त्यांवर अतिक्रमण वाढल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला. त्यामुळे बांधकाम विभागाने रस्त्यांचे रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली.

तलावांच्या सर्वेक्षणाची मागणी

नागभीड : जिल्ह्यातील सिंचनाचे प्रमाण अतिशय अल्प आहे. अनेक वर्षांपासून मालगुजारी तलावांची दुरूस्ती केली जात नाही. परिणामी, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरवशावर शेती करावी लागत आहे. कृषी सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेले मामा तलाव केवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तलावांचे सर्वेक्षण करून दुरूस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

अनेकांकडे आरोग्यसेतू अ‍ॅप डाॅऊनलोड

मूल : कोरोना संसर्ग असलेल्या तसेच बाधितांशी संपर्क आल्यास ‘आरोग्यसेतू’ अ‍ॅप यूजर्सला अलर्ट करते. शासनाने अँड्राईड आणि आयओएस वापरकर्त्यांसाठी कोविड-१९ ट्रेसिंग अ‍ॅप इलेक्ट्रानिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटरने (एनआयसी) हे अ‍ॅप विकसित केले आहे. मागील काही दिवसांपासून चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे पुन्हा अनेकांनी आरोग्यसेतू ॲप डाॅऊनलोड केला आहे.

रेडियमअभावी अपघाताची शक्यता

जिवती : तालुक्यातील अनेक वळण रस्त्यावर रेडियम नसल्याने रात्रीच्यावेळी वाहनांचे अपघात होण्याची शक्यता आहे. वाहनचालकांना रात्रीच्या वेळी समोरील रस्ता दिसत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्येक रस्त्यावर रेडियम लावून अपघात टाळावा, अशी मागणी सहयोगी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.

मोकाट जनावरांमुळे पिकांची नासाडी

बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यातील काही गावांमध्ये सिंचन सुविधा आहे. त्यामुळे दुबार पीक घेतल्या जाते. विविध रोगांच्या प्रादुर्भावापासून शेतकरी कसेबसे आपल्या पिकांचे संरक्षण करीत आहेत. मात्र मोकाट जनावरांमुळे पीके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.

पळसगाव पुलाची उंची वाढवा

चिमूर : तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या काही गावातील नाल्यावरील पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसामध्ये नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या पुलाची उंची वाढवून दिलासा देण्याची मागणी केली जातआहे.

वीज ग्राहकांना त्रास

चिमूर : तालुक्यातील काही गावांमध्ये विजेचा लंपडाव सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.