शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

चरूरवासी पितात नाल्यातील गढूळ पाणी

By admin | Updated: July 2, 2015 01:20 IST

स्थानिक ग्रामपंचायतच्या नळ पाणी पुरवठ्यातील दोष, देखभाल व दुरुस्तीविषयची अनास्था अशा अकार्यक्षम धोरणामुळे नळाद्वारे लालसर व पिवळ्या रंगाचा गढुळ पाणी

बोरगाव पाणीपुरवठा योजना बंद : दूषित पाण्याचा पुरवठाचंदनखेडा : स्थानिक ग्रामपंचायतच्या नळ पाणी पुरवठ्यातील दोष, देखभाल व दुरुस्तीविषयची अनास्था अशा अकार्यक्षम धोरणामुळे नळाद्वारे लालसर व पिवळ्या रंगाचा गढुळ पाणी पुरवठा होत असल्याने चरुर बोरगाव येथील पाणी पुरवठा गत तीन दिवसांपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे चरुर वासीयांना शेतशिवारातील नाईलाजास्तव विहिरीचे दुषित पाणी प्यावे लागत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. चरूर बोरगाव येथे १९७८ ला एक लाख लिटर पाण्याची क्षमता असलेली नळ योजना तत्कालीन सरपंच मनोहरराव आगबत्तनवार यांच्या कार्यकाळात अस्तित्वात आली. काम चांगले झाल्याने ही नळयोजना ३७ वर्षे लोटूनही योग्य व सुस्थितीत आहे. परंतु सन २००७ ला जलस्वराज्य योजना अंतर्गत वाढीव पाणी पुरवठासाठी ६० हजार लिटर पाण्याची क्षमता असलेली नळ योजना मंजुर झाली. दोन्ही नळ योजनासाठी गावालगतच्या इरई नदीवरुन पाणी घेतले जात असून त्याचा पुरवठा ग्रा.पं. अंतर्गत येत असलेल्या चंदनखेडा, मक्ता, चरुर व बोरगाव या गावासाठी केला जातो. परंतु जलस्वराज योजनेत पाणीपुरवठा समितीच्या नियंत्रणात असतानाही नळ योजनेचे काम कमकुवत झाले. जवळपास अधिकाधिक काम दोषपूर्ण असताना देखील ही नळयोजना ग्रामपंचायतला हस्तांतरीत केली गेली. नदीवरील जलस्वराज्य योजनेच्या उघड्या विहिरीला झाकण नसल्याने पालापाचोळा पक्षी, प्राणी आत पडून कुजून पाणी दुषित होत आहे. यावर उपाययोजना म्हणून जुन्या टाकीद्वारा पाणी पुरवठा करण्यात येत आहे. परंतु सदर टाकीची क्षमता ही चार गावासाठी तोकडी पडत असून फक्त चंदनखेडा व मक्ता गावास थोड्याशा पाण्यावरच समाधान माणून वाढीव पाण्यासाठी भटकंती करावे लागत आहे. चरुर बोरगाव या गावास तीन दिवसापासून पाणीपुरवठा बंद असल्याने बोरगाव वासियांना बोअरवेलचा पर्याय शोधावा लागला. तर चरुर येथे गावालगतच्या शेतशिवारातील विहिरीतील दुषित पाणी पिण्यासाठी उपयोगात आणावे लागत आहे. त्यामुळे हगवण, अतिसार, कॉलरा, विषमज्वर, कावीळ आदी जलजन्य रोग बळावण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)सद्यस्थितीत पावसामुळे अनेक मासे नदीच्या पात्रात मृत्यू पावल्याने पाण्याची दुर्गंधी येत असून पाणी दूषित झाले आहे. गावकऱ्यांकडून सुटणे अनेक तक्रारी होत असून आरोग्याच्या दृष्टीने जलस्वराज्य योजनेचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. जुन्या टाकीची क्षमता कमी पडत असल्याने गत तीन दिवसापासून कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे.- नरेश धवने, ग्रामविकास अधिकारी, ग्रा.पं. चंदनखेडाचरुर येथील गावकऱ्यांना गावालगतच्या शेतशिवारातील विहिरीतील मेलेले श्वापद, कचरा असलेले दूषित पाणी नाईलाजास्तव पयावे लागत आहे. याबाबत ग्रामपंचायतीला विचारणा केली असता, समाधानकारक उत्तर मिळाले नाही.- विलास झाडे, चरुर ग्रामवासी