शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

गरिबांचे जगणे झाले सुकर

By admin | Updated: May 21, 2015 01:21 IST

उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून एखाद्यावर मृत्यूला जवळ करण्याची वेळ येऊ नये म्हणून काँग्रेस आघाडी सरकारने सुरु केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमुळे ...

रुग्णांसाठी वरदान : राजीव गांधी जीवनदायी योजना राजकुमार चुनारकर खडसंगीउपचारासाठी पैसे नाहीत म्हणून एखाद्यावर मृत्यूला जवळ करण्याची वेळ येऊ नये म्हणून काँग्रेस आघाडी सरकारने सुरु केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यातील गरीब दारिद्र्यरेषेखालील अनेक रुग्णांचे प्राण वाचले आहे. या योजनेत शासन करोडो रुपये खर्च करीत आहे. या योजनेत काही त्रुट्या असल्यातरी या योजनेचा गोरगरीब रुग्णांना फायदा होत असल्याने योजनेने जिल्ह्यातील गरिबांचे जगणे सूकर केले आहे.दोन वर्षाअगोदर काँग्रेस सरकारने राज्यात सर्वप्रथम रायगड, सोलापूर, नांदेड, गडचिरोली, मुंबई व मुंबई उपनगर या जिल्ह्यात ही योजना सुरु केली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित २७ जिल्ह्यात २० नोव्हेंबर २०१३ पासून ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या रुग्णालयात रुग्णावर उपचार केला जातो. या योजनेमध्ये नॅशनल ईन्सुरन्स कंपनीकडून रुग्णालयाला रक्कम देण्यात येते. त्यामुळे या कंपनीचेसुद्धा योगदान आहे. या योजनेमधून कुटुंबातील एकाला दीड लाख रुपये खर्च देण्यात येतो. या व्यतिरिक्त कीडनी प्रत्यारोपनासाठी अडीच लाखांची तरतूद राज्य शासनाने केली आहे.राजीव गांधी जीवनदायी योजनेत ९७१ विविध आजारावर उपचार करता येतात. कार्डीयाल (हृदयरोग, हृदयविकार), कीडनी (मुत्रपींड), स्त्रीयांचे आजार, फुफ्फुस आदी मोठ्या आजारांचा यात समावेश आहे. कॅन्सर, कीडनी स्टोन, मेंदू हाडाचे विकार, भाजून जखमी, डोळ्यांचे विकार, लहान मुलांचे उपचार अशा आजाराचा या योजनेत समावेश आहे. जिल्ह्यात राजीव गांधी आरोग्य जीवनदायी योजनेअंतर्गतत चिमूर उपजिल्हा रुग्णालयामार्फत अंगणवाडी व शाळामधील शुन्य ते अठरा वयोगटातील सन २०१३-१४ व १४-१५ या वर्षात ४१ विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यामध्ये हृदय शस्त्रक्रिया- १३, हर्निया- १०, तिरळेपना- ३, दुंभगलेले ओठ- २, जन्मजात मोतीबिंदू ४, हायट्रोसीअल- ३, गाठीचे ५, आयडेन्डेटेस्ट- १ या आजाराच्या रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.