शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

गरिबांचे जगणे झाले सुकर

By admin | Updated: May 21, 2015 01:21 IST

उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून एखाद्यावर मृत्यूला जवळ करण्याची वेळ येऊ नये म्हणून काँग्रेस आघाडी सरकारने सुरु केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमुळे ...

रुग्णांसाठी वरदान : राजीव गांधी जीवनदायी योजना राजकुमार चुनारकर खडसंगीउपचारासाठी पैसे नाहीत म्हणून एखाद्यावर मृत्यूला जवळ करण्याची वेळ येऊ नये म्हणून काँग्रेस आघाडी सरकारने सुरु केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यातील गरीब दारिद्र्यरेषेखालील अनेक रुग्णांचे प्राण वाचले आहे. या योजनेत शासन करोडो रुपये खर्च करीत आहे. या योजनेत काही त्रुट्या असल्यातरी या योजनेचा गोरगरीब रुग्णांना फायदा होत असल्याने योजनेने जिल्ह्यातील गरिबांचे जगणे सूकर केले आहे.दोन वर्षाअगोदर काँग्रेस सरकारने राज्यात सर्वप्रथम रायगड, सोलापूर, नांदेड, गडचिरोली, मुंबई व मुंबई उपनगर या जिल्ह्यात ही योजना सुरु केली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित २७ जिल्ह्यात २० नोव्हेंबर २०१३ पासून ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या रुग्णालयात रुग्णावर उपचार केला जातो. या योजनेमध्ये नॅशनल ईन्सुरन्स कंपनीकडून रुग्णालयाला रक्कम देण्यात येते. त्यामुळे या कंपनीचेसुद्धा योगदान आहे. या योजनेमधून कुटुंबातील एकाला दीड लाख रुपये खर्च देण्यात येतो. या व्यतिरिक्त कीडनी प्रत्यारोपनासाठी अडीच लाखांची तरतूद राज्य शासनाने केली आहे.राजीव गांधी जीवनदायी योजनेत ९७१ विविध आजारावर उपचार करता येतात. कार्डीयाल (हृदयरोग, हृदयविकार), कीडनी (मुत्रपींड), स्त्रीयांचे आजार, फुफ्फुस आदी मोठ्या आजारांचा यात समावेश आहे. कॅन्सर, कीडनी स्टोन, मेंदू हाडाचे विकार, भाजून जखमी, डोळ्यांचे विकार, लहान मुलांचे उपचार अशा आजाराचा या योजनेत समावेश आहे. जिल्ह्यात राजीव गांधी आरोग्य जीवनदायी योजनेअंतर्गतत चिमूर उपजिल्हा रुग्णालयामार्फत अंगणवाडी व शाळामधील शुन्य ते अठरा वयोगटातील सन २०१३-१४ व १४-१५ या वर्षात ४१ विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यामध्ये हृदय शस्त्रक्रिया- १३, हर्निया- १०, तिरळेपना- ३, दुंभगलेले ओठ- २, जन्मजात मोतीबिंदू ४, हायट्रोसीअल- ३, गाठीचे ५, आयडेन्डेटेस्ट- १ या आजाराच्या रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.