शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

गरिबांचे जगणे झाले सुकर

By admin | Updated: May 21, 2015 01:21 IST

उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून एखाद्यावर मृत्यूला जवळ करण्याची वेळ येऊ नये म्हणून काँग्रेस आघाडी सरकारने सुरु केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमुळे ...

रुग्णांसाठी वरदान : राजीव गांधी जीवनदायी योजना राजकुमार चुनारकर खडसंगीउपचारासाठी पैसे नाहीत म्हणून एखाद्यावर मृत्यूला जवळ करण्याची वेळ येऊ नये म्हणून काँग्रेस आघाडी सरकारने सुरु केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यातील गरीब दारिद्र्यरेषेखालील अनेक रुग्णांचे प्राण वाचले आहे. या योजनेत शासन करोडो रुपये खर्च करीत आहे. या योजनेत काही त्रुट्या असल्यातरी या योजनेचा गोरगरीब रुग्णांना फायदा होत असल्याने योजनेने जिल्ह्यातील गरिबांचे जगणे सूकर केले आहे.दोन वर्षाअगोदर काँग्रेस सरकारने राज्यात सर्वप्रथम रायगड, सोलापूर, नांदेड, गडचिरोली, मुंबई व मुंबई उपनगर या जिल्ह्यात ही योजना सुरु केली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित २७ जिल्ह्यात २० नोव्हेंबर २०१३ पासून ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या रुग्णालयात रुग्णावर उपचार केला जातो. या योजनेमध्ये नॅशनल ईन्सुरन्स कंपनीकडून रुग्णालयाला रक्कम देण्यात येते. त्यामुळे या कंपनीचेसुद्धा योगदान आहे. या योजनेमधून कुटुंबातील एकाला दीड लाख रुपये खर्च देण्यात येतो. या व्यतिरिक्त कीडनी प्रत्यारोपनासाठी अडीच लाखांची तरतूद राज्य शासनाने केली आहे.राजीव गांधी जीवनदायी योजनेत ९७१ विविध आजारावर उपचार करता येतात. कार्डीयाल (हृदयरोग, हृदयविकार), कीडनी (मुत्रपींड), स्त्रीयांचे आजार, फुफ्फुस आदी मोठ्या आजारांचा यात समावेश आहे. कॅन्सर, कीडनी स्टोन, मेंदू हाडाचे विकार, भाजून जखमी, डोळ्यांचे विकार, लहान मुलांचे उपचार अशा आजाराचा या योजनेत समावेश आहे. जिल्ह्यात राजीव गांधी आरोग्य जीवनदायी योजनेअंतर्गतत चिमूर उपजिल्हा रुग्णालयामार्फत अंगणवाडी व शाळामधील शुन्य ते अठरा वयोगटातील सन २०१३-१४ व १४-१५ या वर्षात ४१ विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यामध्ये हृदय शस्त्रक्रिया- १३, हर्निया- १०, तिरळेपना- ३, दुंभगलेले ओठ- २, जन्मजात मोतीबिंदू ४, हायट्रोसीअल- ३, गाठीचे ५, आयडेन्डेटेस्ट- १ या आजाराच्या रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.