शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल अन् मद्याने कालवले अनेकांच्या सुखी संसारात विष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 05:00 IST

कुठे पत्नी तर कुठे पती सतत मोबाइलमध्ये गुंतलेला असतो. त्यामुळे दोघांचाही तीळपापड होतो. यातूनच अनेक दाम्पत्यात वाद निर्माण होतात. काही प्रकरणात पती दररोज दारूच्या नशेत झिंगाट होऊन घरी येतो. त्यामुळे दररोज वाद होतात. काही ठिकाणी सासरच्या जाचातून सुनेचा छळ होतो. अशा नानाविध तक्रारींचा पाऊसच भरोसा सेलकडे येत आहे. मागील ११ महिन्यांत एकूण ८५१ तक्रारी भरोसा सेलकडे आल्या.

परिमल डोहणेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : संपूर्ण जग जवळ करणारा मोबाइलच पती-पत्नीच्या दुराव्याचे मुख्य कारण बनत असल्याचे चित्र भरोसा सेलकडे आलेल्या तक्रारीवरून दिसून येत आहे. सततचा मोबाइल वापर व मद्याने सुखी संसारात विष कालवल्याचे मागील वर्षभरात भरोसा सेलकडे आलेल्या तक्रारीवरून दिसून येते. भरोसा सेलने ११ महिन्यांत ८५१ तक्रारी आल्या. त्यापैकी ७७१ तक्रारींचा निपटारा करण्यात त्यांना यश आले आहे. कुठे पत्नी तर कुठे पती सतत मोबाइलमध्ये गुंतलेला असतो. त्यामुळे दोघांचाही तीळपापड होतो. यातूनच अनेक दाम्पत्यात वाद निर्माण होतात. काही प्रकरणात पती दररोज दारूच्या नशेत झिंगाट होऊन घरी येतो. त्यामुळे दररोज वाद होतात. काही ठिकाणी सासरच्या जाचातून सुनेचा छळ होतो. अशा नानाविध तक्रारींचा पाऊसच भरोसा सेलकडे येत आहे. मागील ११ महिन्यांत एकूण ८५१ तक्रारी भरोसा सेलकडे आल्या. भरोसा सेलच्या पोलीस उपनिरीक्षक अश्विनी वाकडे यांच्या नेतृत्वात दोघांचीही समजूत घालून समुपदेशनातून पुन्हा मेळ घालून दिला. त्यामुळे पूर्वी ‘तुझे माझे जमेना’ म्हणणारे दाम्पत्य आता ‘तुझ्यावाचून करमेना’ म्हणत आहेत.

चारित्र्यावर संशय हेही कारण

nसेलकडे येत असलेल्या तक्रारीमध्ये चारित्र्यावर संयश घेणे यासुद्धा तक्रारी मोठ्या प्रमाणात दिसून येतात. दारू पिऊन मारहाण करणे, सोशल मीडियाचा अतिवापर, व्हॉटस्ॲप चॅट पाहता येऊ नये म्हणून कोडवर्ड टाकणे यातून मोठ्या प्रमाणात वाद निर्माण होतात. किमान ४० टक्क्यांच्या जवळपास पती चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करतो, असे कारण नमूद आहे. 

समुपदेशनातून २६४ कुटुंबांत फुलले हास्य

पती-पत्नीचा वाद विकोपाला गेल्यानंतर त्याची तक्रार केली जाते. त्यानंतर हे प्रकरण भरोसा सेलकडे येते. जानेवारी ते नोव्हेंबर २०२१मध्ये भरोसा सेलकडे ८५१ तक्रारी आल्या. भरोसा सेलच्या पोलीस उपनिरीक्षक अश्विनी वाकडे यांनी स्वत: पती-पत्नीचे समुपदेशन करून २६४ कुटुंबांत हास्य फुलविले आहे. मागील वर्षी ६८ प्रकरणांत समझोते करण्यात आले होते. यंदा ही आकडेवारी वाढून २६४ कुटुंबांत समझोता करण्यात यश आले आहे. 

बायकोचा जाच वाढलामहिलांच्या तक्रारींचा ओघ अधिक असला तरी निवड प्रमाणात पुरुषांच्यादेखील पत्नीविरुद्ध तक्रारी आहेत. पहिली बरी होती. आता तिचा स्वभाव बदलला असून जाच वाढल्याचे काकुळतीने म्हणणारे पत्नीपीडित आहेत.

 

टॅग्स :liquor banदारूबंदीMobileमोबाइल