शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटू आपटू मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
4
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
5
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
6
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
7
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
8
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
9
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
10
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
11
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
12
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
13
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
14
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
15
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
16
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
17
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
18
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
19
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
20
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ

मोबाईल अन् मद्याने कालवले अनेकांच्या सुखी संसारात विष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 05:00 IST

कुठे पत्नी तर कुठे पती सतत मोबाइलमध्ये गुंतलेला असतो. त्यामुळे दोघांचाही तीळपापड होतो. यातूनच अनेक दाम्पत्यात वाद निर्माण होतात. काही प्रकरणात पती दररोज दारूच्या नशेत झिंगाट होऊन घरी येतो. त्यामुळे दररोज वाद होतात. काही ठिकाणी सासरच्या जाचातून सुनेचा छळ होतो. अशा नानाविध तक्रारींचा पाऊसच भरोसा सेलकडे येत आहे. मागील ११ महिन्यांत एकूण ८५१ तक्रारी भरोसा सेलकडे आल्या.

परिमल डोहणेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : संपूर्ण जग जवळ करणारा मोबाइलच पती-पत्नीच्या दुराव्याचे मुख्य कारण बनत असल्याचे चित्र भरोसा सेलकडे आलेल्या तक्रारीवरून दिसून येत आहे. सततचा मोबाइल वापर व मद्याने सुखी संसारात विष कालवल्याचे मागील वर्षभरात भरोसा सेलकडे आलेल्या तक्रारीवरून दिसून येते. भरोसा सेलने ११ महिन्यांत ८५१ तक्रारी आल्या. त्यापैकी ७७१ तक्रारींचा निपटारा करण्यात त्यांना यश आले आहे. कुठे पत्नी तर कुठे पती सतत मोबाइलमध्ये गुंतलेला असतो. त्यामुळे दोघांचाही तीळपापड होतो. यातूनच अनेक दाम्पत्यात वाद निर्माण होतात. काही प्रकरणात पती दररोज दारूच्या नशेत झिंगाट होऊन घरी येतो. त्यामुळे दररोज वाद होतात. काही ठिकाणी सासरच्या जाचातून सुनेचा छळ होतो. अशा नानाविध तक्रारींचा पाऊसच भरोसा सेलकडे येत आहे. मागील ११ महिन्यांत एकूण ८५१ तक्रारी भरोसा सेलकडे आल्या. भरोसा सेलच्या पोलीस उपनिरीक्षक अश्विनी वाकडे यांच्या नेतृत्वात दोघांचीही समजूत घालून समुपदेशनातून पुन्हा मेळ घालून दिला. त्यामुळे पूर्वी ‘तुझे माझे जमेना’ म्हणणारे दाम्पत्य आता ‘तुझ्यावाचून करमेना’ म्हणत आहेत.

चारित्र्यावर संशय हेही कारण

nसेलकडे येत असलेल्या तक्रारीमध्ये चारित्र्यावर संयश घेणे यासुद्धा तक्रारी मोठ्या प्रमाणात दिसून येतात. दारू पिऊन मारहाण करणे, सोशल मीडियाचा अतिवापर, व्हॉटस्ॲप चॅट पाहता येऊ नये म्हणून कोडवर्ड टाकणे यातून मोठ्या प्रमाणात वाद निर्माण होतात. किमान ४० टक्क्यांच्या जवळपास पती चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करतो, असे कारण नमूद आहे. 

समुपदेशनातून २६४ कुटुंबांत फुलले हास्य

पती-पत्नीचा वाद विकोपाला गेल्यानंतर त्याची तक्रार केली जाते. त्यानंतर हे प्रकरण भरोसा सेलकडे येते. जानेवारी ते नोव्हेंबर २०२१मध्ये भरोसा सेलकडे ८५१ तक्रारी आल्या. भरोसा सेलच्या पोलीस उपनिरीक्षक अश्विनी वाकडे यांनी स्वत: पती-पत्नीचे समुपदेशन करून २६४ कुटुंबांत हास्य फुलविले आहे. मागील वर्षी ६८ प्रकरणांत समझोते करण्यात आले होते. यंदा ही आकडेवारी वाढून २६४ कुटुंबांत समझोता करण्यात यश आले आहे. 

बायकोचा जाच वाढलामहिलांच्या तक्रारींचा ओघ अधिक असला तरी निवड प्रमाणात पुरुषांच्यादेखील पत्नीविरुद्ध तक्रारी आहेत. पहिली बरी होती. आता तिचा स्वभाव बदलला असून जाच वाढल्याचे काकुळतीने म्हणणारे पत्नीपीडित आहेत.

 

टॅग्स :liquor banदारूबंदीMobileमोबाइल