शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

नदी पात्रात पालिकेकडून नांगरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:54 IST

चिमूर शहराला उमा नदीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र त्या नदीत गाळ साचल्याने पात्र उथळ झाले. त्यामुळे नदीतील पाणी भूगर्भात झिरपत नाही. यावर तोडगा काढण्यासाठी चिमूर पालिकेने नदीतील बंधाऱ्याजवळच्या पात्रात चक्क ट्रॅक्टरने नांगरणी केली. नगरपरिषदेच्या अफलातून प्रकाराबाबत शहरामध्ये सर्वत्र चर्चा सुरु आहे.

ठळक मुद्देउमा नदीचे पात्र उथळ : विहिरीचा जलस्तर वाढविण्यासाठी अनोखी शक्कल

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर शहराला उमा नदीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र त्या नदीत गाळ साचल्याने पात्र उथळ झाले. त्यामुळे नदीतील पाणी भूगर्भात झिरपत नाही. यावर तोडगा काढण्यासाठी चिमूर पालिकेने नदीतील बंधाऱ्याजवळच्या पात्रात चक्क ट्रॅक्टरने नांगरणी केली. नगरपरिषदेच्या अफलातून प्रकाराबाबत शहरामध्ये सर्वत्र चर्चा सुरु आहे.चिमूर शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. पाण्याचे जलस्त्रोत कोरडे होत आहेत. परिणामी चिमूर शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा यंत्रणेवरील ताण वाढला आहे. त्यात भारनियमनाची भर पडली आहे. शहराला कायमस्वरूपी सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी उमा नदीवर बंधारा बांधण्यात आला. परंतू त्यानंतर नदीचे खोलीकरण केले नाही. त्यामुळे पुरातील वाळू, मातीमुळे नदीचे पात्र उथळ झाले आहे. पात्रात आता नावालासुद्धा वाळू दिसत नाही. पात्र जमिनीसारखे टणक झाले आहे. त्यामुळे पात्रातील पाणी भूगर्भात जिरत नाही. याचा परिणाम या स्त्रोतावर अवलंबून असलेल्या पाणी पुरवठा करणाºया विहिरीवर झाला आहे. तिथे आता अत्यल्पसाठा उपलब्ध आहे.शहरातील पाणी टंचाईची स्थिती बघता पात्राच्या खोलीकरणाची परवानगी उपविभागीय अधिकाऱ्यांना मागितली आहे. मात्र, परवानगीची प्रक्रिया किचकट असल्याने त्याला उशीर लागणार आहे. त्यामुळे पालिकेने पाण्याचे स्त्रोत वाढविण्यासाठी नवी शक्कल शोधली आणि नदीपात्रातील बंधाºयाच्या लगत जवळपास सात मीटर नांगरणी केली. या नांगरामुळे नदीतील गाळाचा मोठा थर बाजूला होईल. तेथील पाण्याची पातळी वाढण्यासाठी तलावाचे पाणी सोडण्याची विनंती चिमूर तहसीलदारांना केली आहे. तलावाचे सोडल्यानंतर नदी पात्रात ते जिरेल. यामुळे पाणीपुरवठा करणाºया विहिरीचा जलस्तर वाढेल, या आशेने चिमूर नगरपालिकेने नदी पात्रात नांगरणी केली. सदर प्रकार सर्वांनाच आश्यर्चकारक होता. त्यामुळे प्रकरणाची चिमूर शहरात दिवसभर चर्चा सुरु होती.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई