शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
4
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
5
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
6
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
7
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
8
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
9
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
10
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
11
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
12
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
13
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
14
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
15
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
16
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
17
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
18
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
19
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
20
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड

केवळ होर्डिंग लावून प्लॅस्टिक बंदीचा दिखावा! शहरात खुलेआम होतोय प्लॅस्टिक पिशवीचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 12:11 IST

Chandrapur : नगरपालिकेकडून कारवाईच होत नसल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : शहरात बंदी असलेल्या ७५ मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक व प्लॅस्टिक कॅरिबॅगचा शहरात खुलेआम वापर सुरू आहे. बाजारपेठेत विक्रेते या प्लॅस्टिक पिशवीचा वापर करताना दिसत आहे. मात्र यावर नगरपालिकेने कोणतीही कारवाईची मोहीम राबवली नाही. केवळ न.प.ने प्लॅस्टिकबंदीचे होर्डिंग लावूनच दिखावा केल्याचे दिसून येत आहे.

शहरातील बुधवारी आठवडी बाजारात फळविक्रेते, भाजीविक्रेते, चिकन-मटन विक्रेता, खाद्यपदार्थांसह इतर दुकानात बंदी असणाऱ्या प्लॅस्टिकचा सर्रास वापर केला जात आहे. या प्लॅस्टिक पिशव्या ग्राहकांमार्फत घरोघरी गेल्याने या प्लॅस्टिक कचऱ्याचे ढिगारे होताना दिसत आहे. कचऱ्याचे प्रदूषण वाढले आहे.

मात्र या प्रकाराकडे नगरपरिषदेचे पूर्णता दुर्लक्ष असल्याने या विक्रेत्यांवर नगरपालिकेचा अंकुश आता राहिलेला नाही. परिणामी व्यावसायिकांना प्लॅस्टिक वापराबाबत कोणतीही भीती राहिलेली नाही. कारवाई होतच नाही, असा त्यांचा समज झालेला दिसून येत आहे. त्यामुळे दररोज या प्लॅस्टिकचा वापर केला जात असल्याने भद्रावतीकरांच्या आरोग्याबाबत दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

स्वच्छ सर्वेक्षण अभियान गेले कुठे?नगरपरिषद भद्रावतीमार्फत माझी वसुंधरा अभियान स्वच्छ सर्वेक्षणाचे मोठे होर्डिंग लागले आहे. त्यामध्ये सिंगल यूज प्लॅस्टिकबंदी ७५ मायक्रोनपेक्षा कमी प्लॅस्टिक व प्लॅस्टिक कॅरिबॅगवर बंदी असल्याचे तसेच उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक केल्यास पाच हजार रुपये दंड व फौजदारी कारवाई अशा सूचना होर्डिंगवर करण्यात आल्या आहे. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून शहरात या प्लॅस्टिकचा खुला वापर केला जात आहे. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षण अभियान गेले कुठे, असा प्रश्न पडतो. नगरपालिका यावर कोणतीही कारवाई न करता केवळ होर्डिंगच्या माध्यमातून प्लॅस्टिक कॅरिबॅगचा वापर करणाऱ्यावर अंकुश आणेल काय हा भद्रावतीकरांसाठी चिंतनाचा विषय आहे.

५ हजार रुपये दंडाची होते प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाईप्लास्टिक पिशव्यांचे निर्मुलन होत नाही. त्यामुळे पर्यावरणावर याचा परिणाम होतो. याशिवाय हे प्लास्टिक वापर झाल्यानंतर कुठेही फेकले जातात. कधी त्यात खाद्यपदार्थही असते. त्यामुळे ते जनावरांच्या पोटात जातात.

"दिवसेंदिवस शहरात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. प्लॅस्टिक नष्ट होत नाही. त्यामुळे याचा पर्यावरणावर तसेच मानवी जीवनावर परिणाम होतो. त्यामुळे या प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यावर नगरपालिकेने कारवाई करावी."- डॉ. किशोर शिंदे, भद्रावती

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीchandrapur-acचंद्रपूर