शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

केवळ होर्डिंग लावून प्लॅस्टिक बंदीचा दिखावा! शहरात खुलेआम होतोय प्लॅस्टिक पिशवीचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 12:11 IST

Chandrapur : नगरपालिकेकडून कारवाईच होत नसल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : शहरात बंदी असलेल्या ७५ मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक व प्लॅस्टिक कॅरिबॅगचा शहरात खुलेआम वापर सुरू आहे. बाजारपेठेत विक्रेते या प्लॅस्टिक पिशवीचा वापर करताना दिसत आहे. मात्र यावर नगरपालिकेने कोणतीही कारवाईची मोहीम राबवली नाही. केवळ न.प.ने प्लॅस्टिकबंदीचे होर्डिंग लावूनच दिखावा केल्याचे दिसून येत आहे.

शहरातील बुधवारी आठवडी बाजारात फळविक्रेते, भाजीविक्रेते, चिकन-मटन विक्रेता, खाद्यपदार्थांसह इतर दुकानात बंदी असणाऱ्या प्लॅस्टिकचा सर्रास वापर केला जात आहे. या प्लॅस्टिक पिशव्या ग्राहकांमार्फत घरोघरी गेल्याने या प्लॅस्टिक कचऱ्याचे ढिगारे होताना दिसत आहे. कचऱ्याचे प्रदूषण वाढले आहे.

मात्र या प्रकाराकडे नगरपरिषदेचे पूर्णता दुर्लक्ष असल्याने या विक्रेत्यांवर नगरपालिकेचा अंकुश आता राहिलेला नाही. परिणामी व्यावसायिकांना प्लॅस्टिक वापराबाबत कोणतीही भीती राहिलेली नाही. कारवाई होतच नाही, असा त्यांचा समज झालेला दिसून येत आहे. त्यामुळे दररोज या प्लॅस्टिकचा वापर केला जात असल्याने भद्रावतीकरांच्या आरोग्याबाबत दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

स्वच्छ सर्वेक्षण अभियान गेले कुठे?नगरपरिषद भद्रावतीमार्फत माझी वसुंधरा अभियान स्वच्छ सर्वेक्षणाचे मोठे होर्डिंग लागले आहे. त्यामध्ये सिंगल यूज प्लॅस्टिकबंदी ७५ मायक्रोनपेक्षा कमी प्लॅस्टिक व प्लॅस्टिक कॅरिबॅगवर बंदी असल्याचे तसेच उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक केल्यास पाच हजार रुपये दंड व फौजदारी कारवाई अशा सूचना होर्डिंगवर करण्यात आल्या आहे. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून शहरात या प्लॅस्टिकचा खुला वापर केला जात आहे. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षण अभियान गेले कुठे, असा प्रश्न पडतो. नगरपालिका यावर कोणतीही कारवाई न करता केवळ होर्डिंगच्या माध्यमातून प्लॅस्टिक कॅरिबॅगचा वापर करणाऱ्यावर अंकुश आणेल काय हा भद्रावतीकरांसाठी चिंतनाचा विषय आहे.

५ हजार रुपये दंडाची होते प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाईप्लास्टिक पिशव्यांचे निर्मुलन होत नाही. त्यामुळे पर्यावरणावर याचा परिणाम होतो. याशिवाय हे प्लास्टिक वापर झाल्यानंतर कुठेही फेकले जातात. कधी त्यात खाद्यपदार्थही असते. त्यामुळे ते जनावरांच्या पोटात जातात.

"दिवसेंदिवस शहरात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. प्लॅस्टिक नष्ट होत नाही. त्यामुळे याचा पर्यावरणावर तसेच मानवी जीवनावर परिणाम होतो. त्यामुळे या प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यावर नगरपालिकेने कारवाई करावी."- डॉ. किशोर शिंदे, भद्रावती

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीchandrapur-acचंद्रपूर