शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

झाडे लावली अन् तोडलीही

By admin | Updated: May 10, 2014 00:06 IST

महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसने ‘हिरवं शहर, स्वच्छ शहर’ असे आश्वासन मतदारांना दिले होते. आज दोन वर्षाचा काळ ...

 चंद्रपूर : महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसने ‘हिरवं शहर, स्वच्छ शहर’ असे आश्वासन मतदारांना दिले होते. आज दोन वर्षाचा काळ लोटला तरी या आश्वासनाचा पत्ता नाही. उलट शोभेची लावलेली झाडेदेखील आता सुकली आहेत. लाखो रुपयांचा हा खर्च वाया गेला आहे. ६०० पैकी केवळ २५ ते ३० झाडे सध्या जिवंत आहेत. चंद्रपूरला महानगरचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसला सत्ता मिळाली. ही सत्ता मिळविण्यासाठी ज्या घोषणा देण्यात आल्या. त्यामध्ये हिरव्या शहराची घोषणा होती. शहरात झाडे नसल्याचे तापमानही खूप वाढत असते. त्या दृष्टीने काँग्रेसने महत्त्वाची घोषणा केल्याने लोकांनीही प्रतिसाद दिला. या घोषणेची पूर्तता करण्यासाठी म्हणून महानगरपालिकेने शहरातील प्रमुख मार्गावर पाम प्रजातीची झाडे लावण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ४०० पाम झाडे आणि ७०० ट्री गार्ड खरेदी केले. यासाठी १० लाख रुपयांचा खर्च केला. मुख्य असलेल्या गांधी आणि कस्तुरबा या दोन मार्गावर ही झाडे मागील वर्षी लावण्यात आली. मात्र त्यांचे नीट संगोपन नसल्याने अवघ्या वर्षभरात ही झाडे सुकून गेली. अनेक झाडे रस्ता बांधकामात उखडण्यात आली. रस्त्याच्या कडेला ‘पेवर ब्लॉक’ टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठीसुद्धा ही झाडे काढून फेकण्यात आली. आधीच चंद्रपुरात झाडे नाहीत आणि जी लावली ती टिकवण्याचा प्रयत्नही झाला नाही. त्यामुळे हिरव्या शहराची घोषणा ही फसवीच निघाली. खासगी उद्योगांना वृक्षारोपण सक्तीचे आहे. पण, तेही कधी वृक्षारोपण करीत नाहीत. नेत्यांना तर मलिदा खाणे, एवढेच माहिती आहे. त्यामुळे उद्योगांवर त्यांचाही अंकुश राहिलेला नाही. आता महापालिकेनेही तेच केले. खर्च करून लावलेल्या झाडांचेही संगोपन करता येत नसेल, तर अशा प्रकल्पांवर खर्च करायचाच कशाला, हे शहाणपण कुणालाही सुचले नाही. नागरिकांनी जबाबदारी घ्यावी आणि संगोपन करावे, असा उलट सल्ला महापालिका देत आहे. (शहर प्रतिनिधी)