शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

मोबाईलमुळे छायाचित्रकरांचा व्यवसाय डबघाईस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 11:42 PM

सतीश जमदाडे ।आॅनलाईन लोकमतआवाळपूर : पूर्वी छायाचित्रकाराने फोटो काढल्यानंतर चार-पाच दिवसानंतर तो हातात येई. यादरम्यान फोटो काढणाऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहचली असायची. आता आधुनिक जगात तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली. हातात सुसज्ज कॅमेरा असलेला मोबाईल आला. यामुळे छायाचित्रकरांचा व्यवसाय मात्र डबघाईस आला आहे.यामुळे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा तरी कसा, असा प्रश्न फोटोग्राफर ...

ठळक मुद्देउदरनिर्वाहाचा प्रश्न : कार्यक्रमांमध्ये मोबाईलचीच क्रेझ

सतीश जमदाडे ।आॅनलाईन लोकमतआवाळपूर : पूर्वी छायाचित्रकाराने फोटो काढल्यानंतर चार-पाच दिवसानंतर तो हातात येई. यादरम्यान फोटो काढणाऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहचली असायची. आता आधुनिक जगात तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली. हातात सुसज्ज कॅमेरा असलेला मोबाईल आला. यामुळे छायाचित्रकरांचा व्यवसाय मात्र डबघाईस आला आहे.यामुळे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा तरी कसा, असा प्रश्न फोटोग्राफर व्यावसायिकाला भेडसावत आहे. पूर्वी प्रत्येक कार्यक्रमात छायाचित्र टीपण्यासाठी फोटोग्राफरची आवश्यकता भासायची. त्याला या कामाची खास आर्डर दिली जायची. याशिवाय कुटुंबांचे फोटो, घरात लहान बाळ आले की त्याचे फोटो स्टुडीओत जाऊन काढले जात होते. परंतु आता फोटोग्राफरच्या कॅमेऱ्याची जागा स्मार्ट फोनने घेतली आहे. आता अनेक कार्यक्रमात फोटोग्राफरला तर बोलाविलेही जात नाही. मोबाईल फोननेच काम भागविले जाते.अत्याधुनिक स्मार्टफोनमधील वेगवेगळ्या फिचर्समुळे डिजिटल कॅमेऱ्याप्रमाणे मोबाईल फोटोग्राफीला गुणवत्ता मिळत आहे. फोटो अ‍ॅप्सच्या सहाय्याने हवे असेल तसे छायाचित्रे टिपता येतात. एक फोन फायदे अनेक असल्यामुळे स्मार्ट फोनची क्रेझ वाढली आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या फोटोग्राफीला हळूहळू लोक विसरत असल्याचे दिसून येत आहे.डिजिटल कॅमेऱ्याची किंमत अधिकडिजिटल कॅमेरा फोटोग्राफी योग्य आणि दर्जेदार फोटोसाठी ओळखला जातो. मात्र मोबाईल फोनच्या तुलनेत डिजिटल कॅमेरा अधिक महाग असल्याने नागरिक मोबाईल फोनलाच अधिक पसंती देत असल्याचे दिसून येत आहे.ग्रामीण भागातही सारखीच स्थितीमोबाईलमधील नवनवीन शोध आणि स्मार्ट फोनचा वाढता वापर, यामुळे व्यावसायिक स्टुडीओतील गर्दी कमी होऊ लागली आहे. शहरी भागानंतर ग्रामीण भागातही स्मार्ट फोन प्रत्येकाच्या हातात पोहचला आहे. पूर्वी गावखेड्यातील कार्यक्रमात शहरातून खास फोटोग्राफर बोलावला जायचा. मात्र आता खेडोपाडी फोटोसाठी मोबाईलचाच वापर केला जाताना दिसून येत आहे.केवळ लग्नसराईतच मागणीव्यावसायिक फोटोग्राफरला प्रत्येक कार्यक्रमात बोलविले जात नसले तरी लग्नसराईतून फोटोग्राफर अद्याप बाद झालेला नाही. लग्नसराईत मोबाईलवर काम भागविले जात नाही. तिथे मात्र फोटोग्राफरला आवर्जुन बोलाविले जाते. त्यामुळे लग्नसराईची या व्यावसायिकांना आतूरतेने प्रतीक्षा असते.मोबाईलच्या युगात मोजक्या कार्यक्रमाला आम्हाला बोलावणं असते. इतरवेळी मोबाईल काम करीत असते. केवळ लग्नसराईत व्यवसाय चालतो. इतर वेळेस हाताला काम नसते. त्यामुळे दुकान थाटून बसणे आता परवडण्यासारखे राहिले नाही.- राजू मोहितकर,फोटोग्राफर, नांदा