शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

विद्यार्थ्यांची वाढलेली गुणांची टक्केवारी चिंताजनक

By admin | Updated: July 27, 2014 00:03 IST

एकीकडे वेगाने वाढणारी इंग्रजी कॉन्व्हेंट संस्कृती तर दुसरीकडे मराठी माध्यमांच्या शाळातून विद्यार्थ्यांना पास करण्याची लागलेली शिक्षण विभागाची फसवी पैज, यामुळे दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांच्या

कुचना : एकीकडे वेगाने वाढणारी इंग्रजी कॉन्व्हेंट संस्कृती तर दुसरीकडे मराठी माध्यमांच्या शाळातून विद्यार्थ्यांना पास करण्याची लागलेली शिक्षण विभागाची फसवी पैज, यामुळे दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याशी अक्षरश: जीवघेणा खेळ सुरू आहे. यात राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य टांगणीला नव्हे तर उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. एकेकाळी हायर सेकंडर क्लास आणि फर्स्ट क्लास म्हणजे किमान ५५ ते ६० टक्के मार्क्स म्हणजे हुशारीचे लक्षण मानले जायचे. माात्र आता या टक्केवारीकडे कोणीच लक्ष देत नसून किमान ८० ते ९०-९५ टक्केच्या वर बोला असा प्रघात सुरू झााला आहे. गतवर्षीपासून इयत्ता १० व १२ वीच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी दिलेल्या हातच्या २० पैकी किमान १८ ते २० मार्क्सने पास होण्याचा मार्ग अगदी सोपा झाला असून शाळेचे निकालही ८० टक्क्यांचे वर पोहोचले आहे. विद्यार्थीही किमान ८० ते ९०-९५ टक्क्यांवर पोहोचले आहे. दहावीत अशी फुगलेली टक्केवारी मिळाली तेव्हा याच शैक्षणिक सत्रात सर्वांचा लोंढा विज्ञान विषयाच्या अकरावीकडे वळला असून अनेक नामवंत शाळांनी आपापल्या शिक्षण विभागाकडे ज्यादा तुकड्यांचा वाढीव प्रस्तावही टाकलेला आहे तर दुसरीकडे कला आणि वाणिज्य विषयाचे वर्ग तुटण्याच्या पातळीवर आले असून ते कनिष्ठ प्राध्यापक अतिरिक्त ठरणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.दहावी आणि बारावी परीक्षा टक्क्याने पास झाल्यावर पुढचे विज्ञान, पॉलिटेक्नीक किंवा इंजिनिअरिंग आणि मेडिकल या शाखांसाठीच्या वेगवेगळ्या प्रवेश परीक्षेत अनेकांना उजेड पाडताच आला नाही. नुकत्याच इंजिनिअरिंग साठीच्या जेईई परीक्षेत बसलेल्या चार लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ सात हजाार विद्यार्थीच पास झाले. शिवाय ज्यांनी अकरावी विज्ञान घेतले, त्यांचा फुगा बारावीत फुटला. पुढे शाखा बदलविता येत नसल्यामुळे ‘ते’ उदास विद्यार्थी परत दोन वर्ष वाया घालवून कला अथवा वाणिज्य शाखेकडे परत अकरावीसाठी वळतात. अशीच गमंत बारावी उत्तीर्णांचीही आहे. फुगवलेल्या मार्क्सलिटवरील गुणांच्या आधारे कित्येकांचे पुढचे गाडे फसले आहेत. या सर्व प्रकारामुळे शिक्षकांची मोठी गोची होत आहे. बीए, एमए होऊन सोबत बीएडची डिग्री घेऊन हे चाळीशीत प्राध्यापक होतात. अशातच आता कला- वाणिज्य शाखांचे वर्ग ओस पडत असल्याने या शिक्षकांवरही बेकारीचे संकट येत आहे. एकूणच या हाताचे गुणामुळे शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे जीवनच हातून जाण्याची वेळ आली असून हा शैक्षणिक बाजराचा खेळ संपवून क्वांटीटी ऐवजी क्वॉलीटीवर भर देणे गरजेचे झाले आहे. तरच शिक्षण पध्दती सुरळीत होईल. (प्रतिनिधी)