शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
6
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
7
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
8
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
9
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
10
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
11
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
12
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
13
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
14
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
15
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
16
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
17
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
18
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
19
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
20
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची वाढलेली गुणांची टक्केवारी चिंताजनक

By admin | Updated: July 27, 2014 00:03 IST

एकीकडे वेगाने वाढणारी इंग्रजी कॉन्व्हेंट संस्कृती तर दुसरीकडे मराठी माध्यमांच्या शाळातून विद्यार्थ्यांना पास करण्याची लागलेली शिक्षण विभागाची फसवी पैज, यामुळे दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांच्या

कुचना : एकीकडे वेगाने वाढणारी इंग्रजी कॉन्व्हेंट संस्कृती तर दुसरीकडे मराठी माध्यमांच्या शाळातून विद्यार्थ्यांना पास करण्याची लागलेली शिक्षण विभागाची फसवी पैज, यामुळे दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याशी अक्षरश: जीवघेणा खेळ सुरू आहे. यात राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य टांगणीला नव्हे तर उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. एकेकाळी हायर सेकंडर क्लास आणि फर्स्ट क्लास म्हणजे किमान ५५ ते ६० टक्के मार्क्स म्हणजे हुशारीचे लक्षण मानले जायचे. माात्र आता या टक्केवारीकडे कोणीच लक्ष देत नसून किमान ८० ते ९०-९५ टक्केच्या वर बोला असा प्रघात सुरू झााला आहे. गतवर्षीपासून इयत्ता १० व १२ वीच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी दिलेल्या हातच्या २० पैकी किमान १८ ते २० मार्क्सने पास होण्याचा मार्ग अगदी सोपा झाला असून शाळेचे निकालही ८० टक्क्यांचे वर पोहोचले आहे. विद्यार्थीही किमान ८० ते ९०-९५ टक्क्यांवर पोहोचले आहे. दहावीत अशी फुगलेली टक्केवारी मिळाली तेव्हा याच शैक्षणिक सत्रात सर्वांचा लोंढा विज्ञान विषयाच्या अकरावीकडे वळला असून अनेक नामवंत शाळांनी आपापल्या शिक्षण विभागाकडे ज्यादा तुकड्यांचा वाढीव प्रस्तावही टाकलेला आहे तर दुसरीकडे कला आणि वाणिज्य विषयाचे वर्ग तुटण्याच्या पातळीवर आले असून ते कनिष्ठ प्राध्यापक अतिरिक्त ठरणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.दहावी आणि बारावी परीक्षा टक्क्याने पास झाल्यावर पुढचे विज्ञान, पॉलिटेक्नीक किंवा इंजिनिअरिंग आणि मेडिकल या शाखांसाठीच्या वेगवेगळ्या प्रवेश परीक्षेत अनेकांना उजेड पाडताच आला नाही. नुकत्याच इंजिनिअरिंग साठीच्या जेईई परीक्षेत बसलेल्या चार लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ सात हजाार विद्यार्थीच पास झाले. शिवाय ज्यांनी अकरावी विज्ञान घेतले, त्यांचा फुगा बारावीत फुटला. पुढे शाखा बदलविता येत नसल्यामुळे ‘ते’ उदास विद्यार्थी परत दोन वर्ष वाया घालवून कला अथवा वाणिज्य शाखेकडे परत अकरावीसाठी वळतात. अशीच गमंत बारावी उत्तीर्णांचीही आहे. फुगवलेल्या मार्क्सलिटवरील गुणांच्या आधारे कित्येकांचे पुढचे गाडे फसले आहेत. या सर्व प्रकारामुळे शिक्षकांची मोठी गोची होत आहे. बीए, एमए होऊन सोबत बीएडची डिग्री घेऊन हे चाळीशीत प्राध्यापक होतात. अशातच आता कला- वाणिज्य शाखांचे वर्ग ओस पडत असल्याने या शिक्षकांवरही बेकारीचे संकट येत आहे. एकूणच या हाताचे गुणामुळे शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे जीवनच हातून जाण्याची वेळ आली असून हा शैक्षणिक बाजराचा खेळ संपवून क्वांटीटी ऐवजी क्वॉलीटीवर भर देणे गरजेचे झाले आहे. तरच शिक्षण पध्दती सुरळीत होईल. (प्रतिनिधी)