शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

सहा महिन्यांपासून वेतन अडले, प्राध्यापकांचे काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2017 00:38 IST

बल्लारपूर इन्सिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हील इंजिनिअरिंग शाखेच्या

बीआयटीमधील प्रकार : ऐन परीक्षेच्या काळात संपाचे हत्यारचंद्रपूर : बल्लारपूर इन्सिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हील इंजिनिअरिंग शाखेच्या प्राध्यापकांनी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मागील सहा महिन्यांपासून वेतनच न झाल्याने हा मार्ग स्विकारावा लागला, असे या प्राध्यापकांचे म्हणणे आहे.मागील १७ मार्चपासून महाविद्यालयात हे आंदोलन सुरू असल्याने या विद्याशाखा विभागातील सर्वच शैक्षणिक कामे ठप्प पडली आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परिक्षेचा हा काळ असल्याने त्याचा परिणाम या परिक्षेवर पडत आहे. असे असले तरी अद्याप व्यवस्थापनाने या संदर्भात कसलीही दखल घेतली नसल्याचा आरोप प्राध्यापकांच्या गटाने केला आहे. सिव्हील इंजिनिअरिंग शाखेच्या सेक्रेटरीने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर-२०१६ पासून या प्राध्यापकांचे वेतन व्यवस्थापनाने अडविले आहेत. त्यामुळे आपले संसार चालवायचे तरी कसे, असा या प्राध्यापकांचा प्रश्न आहे. मागील सहा महिन्यापासून वेतन अदा न झाल्याची कल्पना संस्थाचालकांना आहे. या संदर्भात वारंवार विनंती करून आणि निवेदनेही संस्थाचालकांना देण्यात आली आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी पाच महिन्यानचे वेतन अडले असताना या प्राध्यापकांनी १५ दिवसांचा संप केला होता. यावेळी संपावर जाण्यापूर्वी एक दिवसांचा नोटीस देवून हे प्राध्यापक संपावर गेले आहेत. वेतनाच्या प्रश्नावर साफ दुर्लक्ष केल्याने कुटुंबाच्या पोषणासाठी नाईलाजाने हे पाऊल उचलावे लागल्याचे या प्राध्यापकांचे म्हणणे आहे. या संपाचा परिणाम शैक्षणिक कार्यावर पडल्याने ऐनवेळी अपात्र प्राध्यापकांंच्या नियमबाह्य नियुत्या करून काम ढकलण्याचा प्रकार संस्थेने केल्याचा प्राध्यापकांचा आरोप आहे. विद्यार्थ्यांची कसल्याही स्वरूपाची प्रात्यक्षिक परीक्षा न घेता अथवा प्रोजेक्ट्स पूर्ण करून न घेता विद्यार्थ्यांना सरसकट गुण दिले जात आहेत. हा प्रकार नियमबाह्य असून विद्यापिठाच्या डोळ्यात धुळ झोकणारा असल्याने या गंभीर प्रकाराची दखल मुख्यमंत्र्यांनी घेण्याची विनंती या प्राध्यापकांनी निवेदनातून केली आहे. आपला संप योग्य कारणासाठी असला तरी तो दडपण्याचा संस्थाचालकांचा प्रयत्न असल्याचा आरोप या प्राध्यापकांनी केला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)संपामुळे काम थांबलेले नाही, अन्य प्राध्यापकांकडून सुरु आहे. संबंधित प्राध्यापक नोटीस न देता कामावरून निघून गेले. शासनाचा निधी न मिळाल्याने वेतन देता आले नव्हते. मात्र आता निधीची व्यवस्था झाली आहे. त्यामुळे लवकरच वेतन देता येईल. त्यांनीही परीक्षकाळात संपावर जायला नको होते.- अ‍ॅड.बाबासाहेब वासाडे, सचिव, बल्लारपूर इन्सिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी