शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जीवनदायी उपचारासाठी रुग्णांना मनस्ताप

By admin | Updated: October 18, 2014 23:23 IST

गरीब गरजु नागरिकांना विविध आजारांवर मोफत उपचार मिळावेत, यासाठी सुरू करण्यात आलेली राजीव गांधी जीवनदायी योजना रुग्णांसाठी जीवनदायी नव्हे तर वेदनादायी ठरत आहे.

टेमुर्डा : गरीब गरजु नागरिकांना विविध आजारांवर मोफत उपचार मिळावेत, यासाठी सुरू करण्यात आलेली राजीव गांधी जीवनदायी योजना रुग्णांसाठी जीवनदायी नव्हे तर वेदनादायी ठरत आहे. या योजनेचा लाभ घेताना रुग्णांना विविध अटीची पूर्तता करावी लागत असल्याने मरण यातना ही सहन कराव्या लागत आहे.या योजनेंतर्गत राज्यभरात निवड झालेल्या कोणत्याही दवाखान्यात योजनेत समाविष्ट असलेल्या आजारांवर उपचार केले जातात. जिल्ह्यातील अनेक दवाखान्यांत ही योजना सुरू आहे. शस्त्रक्रिया, औषधांसह विविध प्रकारचा खर्चाचा त्यामध्ये समावेश असतानाही दवाखान्याकडून शस्त्रक्रियेव्यतिरिक्त अनेक प्रकारचा खर्च दाखवून रुग्णांकडून पैसे उकळण्याचा उद्योग सुरू आहे. रुग्णाला मोठ्या आजाराची भीती दाखवून दवाखान्यात दाखल करून मोफत उपचार करणार असल्याचे सांगून शस्त्रक्रियेनंतर औषधे व विविध प्रकारच्या चाचण्यांचा खर्च दाखवून मोठ्या प्रमाणात रुग्णांची आर्थिक लूट सुरू आहे. जीवनदायी योजनेतील सर्व काम आॅनलाईन चालते. ही योजना रुग्णांसाठी फायद्याची आहे. पण यात रुग्णांच्या आॅनलाईन नोंदणीत संबंधित रुग्णाच्या उपचारासाठीची रक्कम मान्य होईपर्यंतचा आॅनलाईनचा प्रवास इतका खडतर आहे की अनेक रुग्णांची नोंद होतच नाही. नशिबाने एखाद्या रुग्णाची नोंद झालीच तर रुग्णाच्या सर्व माहितीचा एक लांबलचक फॉर्म भरावा लागतो. तो पाठविल्यानंतर स्वीकारण्यासाठी किमान १८ तासांचा कालावधी उलटून जातो. गंभीर रुग्णांच्या उपचाराची हमी देणाऱ्या योजनेत वेळेचा एवढा अपव्यय कसा चालणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. योजनेची रचना गंभीर रुग्णांना योजनेचे गाजर दाखविल्यासारखी आहे की, नोंदणी करण्याचा फॉर्म इतका मोठा व सविस्तर आहे की, उपचार करणारा डॉक्टर सोडून तो कुणी भरूच शकत नाही. व्यवस्थापनासाठी मनुष्यबळ नेमूनही हे आॅनलाईन फॉर्म भरणे अशक्य आहे. त्यामुळे डॉक्टरने फार्म भरायचा की, उपचार करायचा हा प्रश्न आहे. त्यातच उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या बेडवर झोपलेला फोटो, रोज त्याच्या प्रकृतीचा तपशील, रुग्णालयातून जाताना त्याच्या हातात प्रवासाचे पैसे देतानाचे फोटो आदी निरर्थक बाबीच्या पूर्ततेच्या अटी टाकूनही योजना डॉक्टरांना राबविताच येऊ नये, अशी शासनाने पुरेपूर काळजी घेतली आहे, असे दिसून येत आहे. राजीव गांधी जीवनदायी योजनेचा शासनस्तरावर मोठा गवगवा होत असला तरी प्रत्यक्षात मात्र या योजनेतून उपचार घेण्यासाठी अप्रुव्हल मिळविणे डोकेदुखीच आहे. याच त्रासापाई डॉक्टर व हॉस्पिटलने जीवनदायी योजना राबविण्यास नकार दिला. अनेक रुग्णांची आर्थिक क्षमता नसताना डॉक्टर मानवी दृष्टिकोनातून रुग्णावर उपचार करीत आहे, असे डॉक्टर सांगतात. मात्र नेहमीच गरज असलेल्या रुग्णालाच जीवनदायीच्या लाभाचे अप्रुव्हल मिळत नाही. यामुळे बरेच रुग्ण व उपचार करणारा डॉक्टर हे दोघेही आर्थिक अडचणीत सापडतात. योजनेच्या लाभासाठी रुग्णांना आरोग्य कार्ड दिले आहेत. मात्र त्याचा उपयोग होतच नाही. लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड व रुग्णाचे ओळखपत्र आॅनलाईन नोंदणी करून घ्यावे लागते. ही नोंदणी झाल्यानंतर बरेच रुग्ण आपणास लाभ मिळणार असे समजून थेट रुग्णालयात दाखल होतात. तेव्हाच बऱ्याच रुग्णाची प्रकृती गंभीर असते. तेव्हा डॉक्टर याला जीवनदायीतून मंजुरी मिळणार की नाही, या विचाराच्या मानसिकतेत राहातच नाही. तेव्हा रुग्णाची आर्थिक क्षमता न पाहता मानवी दृष्टिकोनातून त्यांच्यावर उपचार केला जातो. तेव्हा प्रत्यक्षात जेव्हा अप्रुव्हलसाठी कागदपत्रे पाठवले जातात तेव्हा मंजुरी नाकारली जाते. अशा वेळी रुग्णावर झालेल्या उपचाराचा खर्च घ्यायचा कुणाकडून असा प्रश्न डॉक्टरांना पडला आहे. शिवाय या योजनेतून संपुर्ण कुटुंबासाठी दीड लाख रुपयाची तरतूद केली आहे. (वार्ताहर)