शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
2
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल
3
१९९३ साली ज्योती रामदास कदमांनी स्वत:ला का जाळून घेतले, की...?; उद्धवसेनेचा खळबळजनक आरोप
4
Zubeen Garg Death: झुबीन गर्गला मॅनेजर, फेस्टिव्हल ऑर्गनायझरने दिलं विष? म्युझिक बँड सदस्याचा धक्कादायक दावा
5
Perplexity Comet AI ब्राउझर 'गुगल क्रोम'ला धक्का देणार! हे ५ प्रमुख फिचर आहेत जबरदस्त
6
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
7
Cough Syrup: कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा
8
Thane: पीएसआय स्नेहा करणाळे यांना ऑल इंडिया पोलीस बॉडीबिल्डिंग स्पर्धेत 'सुवर्ण'
9
ATP Masters 1000: वयाच्या ३८व्या वर्षीही नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सिंगापूरमधील एका हॉटेलमध्ये दोन सेक्स वर्करना बोलावले, रुममध्ये येताच दागिने, पैसे चोरले; दोन भारतीयांना शिक्षा सुनावली
11
Astro Tips: वैवाहिक सुखासाठी नवरा बायकोने दर शनिवारी लवंगीने दृष्ट कशी काढावी? वाचा 
12
Penny Stock देणार १० बोनस शेअर्स, कधी आहे रकॉर्ड डेट? ५ वर्षांत ११००% वधारला 'हा' शेअर
13
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
14
Nitish Reddy Flying Catch: नितीश रेड्डी बनला सुपरमॅन, सिराजच्या गोलंदाजीवर घेतला जबरदस्त कॅच!
15
या राज्यात धोकादायक कफ सिरपवरही बंदी; मुलांच्या मृत्यूनंतर लगेच कारवाई
16
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
17
शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात
18
टॅलेंट नाही, खरी समस्या 'इकडे' आहे... चीनपेक्षा इथे भारत पाच पट मागे का? पै यांनी सांगितलं खरं कारण
19
फाटलेले कपडे, चेहऱ्यावर भीती...अभिनेत्री डिंपलच्या पतीनं मोलकरणीसोबत फ्लॅटमध्ये असं काय केले?
20
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि ज्यू सैन्यावरही परिणाम

ओपीडीत रुग्णांची रीघ; मात्र डॉक्टर बोटावर मोजण्याइतके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:10 IST

चंद्रपूर औद्योगिक जिल्हा असल्यामुळे अलिकडच्या काळात विविध आजारांच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) दररोज दीड हजारांहून अधिक रुग्ण तपासणीसाठी येतात.

ठळक मुद्देतोंडी सांगण्यावरून उपचार : रुग्णांसाठी डॉक्टरांजवळ वेळच नाही

रवी जवळे/ परिमल डोहणे।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर औद्योगिक जिल्हा असल्यामुळे अलिकडच्या काळात विविध आजारांच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) दररोज दीड हजारांहून अधिक रुग्ण तपासणीसाठी येतात. सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंतच ओपीडी सुरू राहत असल्याने रुग्णांची रिघ लागली असते. मात्र त्यांची तपासणी करून उपचार करण्यासाठी विविध विभागाचे बोटावर मोजण्याइतकेच डॉक्टर उपलब्ध राहत असल्याने रुग्णांना प्रापर वेळ दिला जात नाही. रुग्णांची व्यथा ऐकून, त्याची तपासणी करून योग्य आणि दीर्घ काळ टिकणारा उपचार करण्याऐवजी ओपीडीच्या ठराविक वेळेत आलेल्या रुग्णांचा लोंढा ‘निपटवण्या’वरच भर दिला जात आहे.चंद्रपूरला मेडीकल कॉलेज झाले. त्या अनुषंगाने येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ बदलणे म्हणजे तो दर्जा येणे अपेक्षित होते. मात्र दुर्दैवाने तसे अद्यापही झालेले नाही. त्यामुळे आता रुग्णांना आरोग्य सेवा देताना अनेक समस्या निर्माण होत आहे. रुग्णालयातील ओपीडी म्हणजे सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा विभाग. रुग्ण आणि उपचार यामधील सर्वात पहिली पायरी हीच. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सकाळी ८ ते दुपारी १२, असा ओपीडीचा ठराविक वेळ आहे. रुग्ण अधिक असले तर कधी एखादा तास आणखी ओपीडी सुरू राहते. रुग्णालयातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार दररोज येथील ओपीडीमध्ये दीड हजारांहून अधिक रुग्ण तपासणी व उपचारासाठी येतात. या हजारो रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करणे, प्रसंगी अ‍ॅडमीट करणे, या सर्व गोष्टी ओपीडीच्या चार तासात कराव्या लागतात.वैद्यकशास्त्रानुसार रुग्णांचा त्रास जाणून घेणे, त्याची तपासणी करणे, संशयित आजाराबाबतचे लक्षणे जाणून घेत काही प्रश्नांचीही उत्तरेही समजून घेणे, हे सर्व करताना एका रुग्णामागे डॉक्टरांना १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागतो. डॉक्टरांना मेडीकलचा अभ्यासक्रम पूर्ण करताना असेच समिकरण शिकविले जाते. मात्र सामान्य रुग्णालयात येणाºया रुग्णांची संख्या अधिक आणि डॉक्टरांची उपलब्धता कमी असल्यामुळे रुग्णांना एवढा वेळ कधीच दिला जात नाही. इच्छा असूनही डॉक्टरांचा नाईलाज असतो, असे तेथीलच एका डॉक्टरने लोकमतशी बोलताना सांगितले.जिल्हा सामान्य रुग्णालयात जनरल मेडीसीन, सर्जरी, अस्थीरोग विभाग, कान, नाक, घसा विभाग, बालरोग विभाग, त्वचा रोग विभाग, स्त्री रोग विभाग, दंत रोग विभाग, नेत्र रोग विभाग, आयुष यासह इतर आणखी काही विभाग आहेत. ओपीडीत येणारे रुग्ण या विविध विभागाशी निगडित असतात. मात्र रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत ओपीडीसाठी या विविध विभागात कार्यरत डॉक्टरांची संख्या कमी आहे. त्यामुळे आलेल्या सर्व रुग्णांची तपासणी करता यावी म्हणून रुग्णाला दोन-तीन मिनिटातच तपासणी करून मोकळे केले जाते.काही रुग्ण प्रथमदर्शिनी किरकोळ आजाराचे दिसत असतील तर त्याला एका मिनिटाच्या आतच उरकविले जाते. या सर्व भानगडीत रुग्णांना त्याच्या आजाराशी संबंधित दीर्घ काळ टिकणारा उपचार मिळत नाही. कधी तर त्याला होणारा त्रासही पूर्णपणे ऐकून घेतला जात नाही. या सर्व प्रकारामुळे रुग्णांना पुन्हा वारंवार रुग्णालयात यावे लागते अथवा नाईलाजाने खासगी रुग्णालयात जाऊन उपचार करावा लागतो.ग्रामीण भागासारखी सायंकाळी ओपीडी का नाही ?चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्णालयातील ओपीडी सकाळी आणि सायंकाळी अशा दोन वेळात सुरू राहते. सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते ६ असा वेळ असतो. मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयात ओपीडी केवळ सकाळी चार तासच सुरू राहते. वास्तविक ग्रामीण भागात रुग्णांची संख्या कमी असते. तरीही तिथे दोन वेळा ओपीडी सुरू ठेवली जाते. त्या तुलनेत सामान्य रुग्णालयात रुग्णांची संख्या लक्षणीय असताना ओपीडीचा वेळ केवळ सकाळी एकदाच का, असा प्रश्न उपस्थित होतो. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सायंकाळीदेखील काही वेळासाठी ओपीडी सुरू ठेवण्याची गरज व्यक्त होणे स्वाभाविक आहे.वक्तशीरपणाचाअभावबाह्य रुग्ण विभागात आलेल्या रुग्णांना त्यांना जडलेल्या आजारानुसार संबंधित विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे वर्ग केले जाते. मात्र येथील काही विभागातील डॉक्टर ओपीडी सुरू झाल्यानंतर तब्बल एक-दीड तासांनी ओपीडीत येतात, असेही लोकमतच्या पाहणीत आढळून आले. त्यामुळे आधीच ओपीडीसाठी वेळ कमी असताना रुग्णांना डॉक्टरांची प्रतीक्षा करीत ताटकळत रहावे लागते.