शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

पळसगावातील अनेक घरांची अंशत: पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 6:00 AM

घरांची पडझड होऊन लोकांचे धान्यसुद्धा पाण्याने ओले होऊन खराब झाले आहे. गावातील इतर लोक आपादग्रस्तांना मदत करीत आहेत. मात्र प्रशासनाचे एकही अधिकारी अजूनपर्यंत गावात फिरकले नाही.

ठळक मुद्देप्रशासन अद्यापही झोपेतच : आपादग्रस्त कुटुंबांना तात्पुरते इतरत्र हलविले

लोकमत न्यूज नेटवर्कमासळ बु.: चिमूर तालुक्यातील ताडोबा बफर झोनमध्ये येत असलेल्या सिंदेवाही मार्गावर असलेले पळसगाव जलमय झाले आहे. गावाच्या शेजारी असलेल्या बोडीची पाळ फुटून पाणी गावात शिरले. या पाण्याने गावातील महादेव गावतुरे, मारोती शेंडे, नामदेव झोडे, हरिश्चंद्र गुळधेसह ३० लोकांच्या घरांची पडझड झाली. त्यांना सध्या जिल्हा परिषद शाळा पळसगाव व ग्रामपंचायतमध्ये करण्यात आले आहे.पळसगावाकडे येणारे सर्व मार्ग पूर्णत: बंद झाले आहेत. सध्या तरी त्यांना प्रशासनातर्फे कोणतीही प्राथमिक सुविधा मिळत नाही. घरांची पडझड होऊन लोकांचे धान्यसुद्धा पाण्याने ओले होऊन खराब झाले आहे. गावातील इतर लोक आपादग्रस्तांना मदत करीत आहेत. मात्र प्रशासनाचे एकही अधिकारी अजूनपर्यंत गावात फिरकले नाही. जोपर्यंत आम्हाला आमचा हक्कच घर बांधून मिळत नाही, तोपर्यंत आमच्या निवासाची सोय प्रशासनाने करावी, अशी मागणी पूरग्रस्त व सरपंच गीता शेंडे, नामदेव गावतुरे, महानंदा गुळधे, अनिल सोनुले, गोकूळ सोनुले यांनी केली आहे.धानपिके वाहून गेलीनवरगाव : सिंदेवाही तालुक्यामध्ये मागील महिन्यापासून आतापर्यंत पाचवेळा जोरदार पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे धानपीक वाहून गेले तर अनेकांची घरे पडून इतरत्र राहण्याची वेळ आलेली आहे. मागील महिन्यापासून तालुक्यात सर्वत्र जोदार पावसाचे आगमन सुरू असून धानासाठी प्रसिद्ध असलेल्या तालुक्यात अनेकांचे धान पºहेच पाण्यामध्ये बुडून नष्ट झाले. तर काही शेतकऱ्यांनी इकडून तिकडून धान पºहे आणून कशीबशी रोवणी केली. मात्र पुराच्या पाण्यात सर्व पिके वाहून गेली. पुन्हा बुधवारला नवरगाव - रत्नापूर - सिंदवोहीसह सर्वत्र मुसळधार पाऊस झाला आणि परिसरातील सर्व मार्गावरून पाणी वाहू लागले. रत्नापूर, शिवणी, वासेरा, गडबोरी, कळमगाव, सिंदेवाही, मेंढा - सिंदेवाही, नवरगाव - गिरगाव, नवरगाव - नेरी व इतर मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने सर्व मार्ग बंद पडले. रस्त्याने चालणारी वाहतूक सेवा व बसेस बुधवारला ठप्प झाल्या. शिवाय तालुक्यात अनेक घरांची पडझड झाली असून त्याचेही पंचनामे व राहण्याचा गंभीर प्रश्न काही नागरिकांसमोर निर्माण झालेला आहे. बुधवारच्या पाण्यामुळे रत्नापूर येथील किशोर बैस यांचे घर पूर्णत: झुकल्याने धरातील पुर्ण सामान काढून रिकामे करण्यात आले. ते कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या मार्गावर असल्याने तेथील सरपंच सदाशिव मेश्राम व पोलीस पाटील नरेंद्र गहाणे यांनी त्यांची तात्पुरती व्यवस्था शाळेच्या इमारतीत केली.कालव्याच्या पाण्यात महिला वाहून गेलीसंततधार पावसामुळे डोंगरगाव-चारगाव प्रकल्प तुडूंब भरले आहे. या प्रकल्पाच्या कालव्यामधून जोरदार पाण्याचा विसर्ग होत आहे. दरम्यान, सिंदेवाही तालुक्यातील मेंढामाल येथील महिला सरिता ईश्वर परचाके (४२) ही चारगावजवळ असलेल्या आपल्या शेतात बुधवारी काम करीत होती. डोंगरगाव प्रकल्पातील पाणी वाहून कालव्याला अचानक पूर आला. या कालव्याचे पाणी सरिता परचाके यांच्या शेतात शिरले. अचानक शेतात पाणी वाढल्याने सरिता परचाके या महिलेने तिथून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्यातून मार्ग काढताना तिचा तोल जाऊन ती पाण्यात पडली व वाहून गेली. बुधवारी सायंकाळीच ५०० मीटर अंतरावर तिचा मृतदेह आढळून आला.रामपुरीत भिंत पडून ंिचमुकला ठारतळोधी : मेंडकीपासून पाच किमी अंतरावर असलेल्या रामपुरी गावात मागील अनेक दिवसांपासून पावसाची झड सुरू आहे. अशातच एका घराची भिंत कोसळून चार वर्षीय चिमुकला ठार झाला.सोहम सचिन वनस्कार असे मृतकाचे नाव आहे. सोहम खाटेवर निवांतपणे झोपून होता. दरम्यान, ओलाव्यामुळे घराची एक भिंत खाटेवरच कोसळली. या भिंतीखाली दबला गेला. लगेच गावकºयांनी त्याला मलब्याच्या बाहेर काढून मेंडकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे रामपुरी हळहळ व्यक्त केली जात आहे. उत्तरीय तपासणीकरिता ब्रम्हपुरीला रवाना करण्यात आले.

टॅग्स :Rainपाऊस