शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

पळसगावातील अनेक घरांची अंशत: पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 06:00 IST

घरांची पडझड होऊन लोकांचे धान्यसुद्धा पाण्याने ओले होऊन खराब झाले आहे. गावातील इतर लोक आपादग्रस्तांना मदत करीत आहेत. मात्र प्रशासनाचे एकही अधिकारी अजूनपर्यंत गावात फिरकले नाही.

ठळक मुद्देप्रशासन अद्यापही झोपेतच : आपादग्रस्त कुटुंबांना तात्पुरते इतरत्र हलविले

लोकमत न्यूज नेटवर्कमासळ बु.: चिमूर तालुक्यातील ताडोबा बफर झोनमध्ये येत असलेल्या सिंदेवाही मार्गावर असलेले पळसगाव जलमय झाले आहे. गावाच्या शेजारी असलेल्या बोडीची पाळ फुटून पाणी गावात शिरले. या पाण्याने गावातील महादेव गावतुरे, मारोती शेंडे, नामदेव झोडे, हरिश्चंद्र गुळधेसह ३० लोकांच्या घरांची पडझड झाली. त्यांना सध्या जिल्हा परिषद शाळा पळसगाव व ग्रामपंचायतमध्ये करण्यात आले आहे.पळसगावाकडे येणारे सर्व मार्ग पूर्णत: बंद झाले आहेत. सध्या तरी त्यांना प्रशासनातर्फे कोणतीही प्राथमिक सुविधा मिळत नाही. घरांची पडझड होऊन लोकांचे धान्यसुद्धा पाण्याने ओले होऊन खराब झाले आहे. गावातील इतर लोक आपादग्रस्तांना मदत करीत आहेत. मात्र प्रशासनाचे एकही अधिकारी अजूनपर्यंत गावात फिरकले नाही. जोपर्यंत आम्हाला आमचा हक्कच घर बांधून मिळत नाही, तोपर्यंत आमच्या निवासाची सोय प्रशासनाने करावी, अशी मागणी पूरग्रस्त व सरपंच गीता शेंडे, नामदेव गावतुरे, महानंदा गुळधे, अनिल सोनुले, गोकूळ सोनुले यांनी केली आहे.धानपिके वाहून गेलीनवरगाव : सिंदेवाही तालुक्यामध्ये मागील महिन्यापासून आतापर्यंत पाचवेळा जोरदार पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे धानपीक वाहून गेले तर अनेकांची घरे पडून इतरत्र राहण्याची वेळ आलेली आहे. मागील महिन्यापासून तालुक्यात सर्वत्र जोदार पावसाचे आगमन सुरू असून धानासाठी प्रसिद्ध असलेल्या तालुक्यात अनेकांचे धान पºहेच पाण्यामध्ये बुडून नष्ट झाले. तर काही शेतकऱ्यांनी इकडून तिकडून धान पºहे आणून कशीबशी रोवणी केली. मात्र पुराच्या पाण्यात सर्व पिके वाहून गेली. पुन्हा बुधवारला नवरगाव - रत्नापूर - सिंदवोहीसह सर्वत्र मुसळधार पाऊस झाला आणि परिसरातील सर्व मार्गावरून पाणी वाहू लागले. रत्नापूर, शिवणी, वासेरा, गडबोरी, कळमगाव, सिंदेवाही, मेंढा - सिंदेवाही, नवरगाव - गिरगाव, नवरगाव - नेरी व इतर मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने सर्व मार्ग बंद पडले. रस्त्याने चालणारी वाहतूक सेवा व बसेस बुधवारला ठप्प झाल्या. शिवाय तालुक्यात अनेक घरांची पडझड झाली असून त्याचेही पंचनामे व राहण्याचा गंभीर प्रश्न काही नागरिकांसमोर निर्माण झालेला आहे. बुधवारच्या पाण्यामुळे रत्नापूर येथील किशोर बैस यांचे घर पूर्णत: झुकल्याने धरातील पुर्ण सामान काढून रिकामे करण्यात आले. ते कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या मार्गावर असल्याने तेथील सरपंच सदाशिव मेश्राम व पोलीस पाटील नरेंद्र गहाणे यांनी त्यांची तात्पुरती व्यवस्था शाळेच्या इमारतीत केली.कालव्याच्या पाण्यात महिला वाहून गेलीसंततधार पावसामुळे डोंगरगाव-चारगाव प्रकल्प तुडूंब भरले आहे. या प्रकल्पाच्या कालव्यामधून जोरदार पाण्याचा विसर्ग होत आहे. दरम्यान, सिंदेवाही तालुक्यातील मेंढामाल येथील महिला सरिता ईश्वर परचाके (४२) ही चारगावजवळ असलेल्या आपल्या शेतात बुधवारी काम करीत होती. डोंगरगाव प्रकल्पातील पाणी वाहून कालव्याला अचानक पूर आला. या कालव्याचे पाणी सरिता परचाके यांच्या शेतात शिरले. अचानक शेतात पाणी वाढल्याने सरिता परचाके या महिलेने तिथून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्यातून मार्ग काढताना तिचा तोल जाऊन ती पाण्यात पडली व वाहून गेली. बुधवारी सायंकाळीच ५०० मीटर अंतरावर तिचा मृतदेह आढळून आला.रामपुरीत भिंत पडून ंिचमुकला ठारतळोधी : मेंडकीपासून पाच किमी अंतरावर असलेल्या रामपुरी गावात मागील अनेक दिवसांपासून पावसाची झड सुरू आहे. अशातच एका घराची भिंत कोसळून चार वर्षीय चिमुकला ठार झाला.सोहम सचिन वनस्कार असे मृतकाचे नाव आहे. सोहम खाटेवर निवांतपणे झोपून होता. दरम्यान, ओलाव्यामुळे घराची एक भिंत खाटेवरच कोसळली. या भिंतीखाली दबला गेला. लगेच गावकºयांनी त्याला मलब्याच्या बाहेर काढून मेंडकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे रामपुरी हळहळ व्यक्त केली जात आहे. उत्तरीय तपासणीकरिता ब्रम्हपुरीला रवाना करण्यात आले.

टॅग्स :Rainपाऊस