शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकांनी गिळंकृत केला बसथांबा, प्रवासी वाहन थांबत नसल्याने नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2022 18:38 IST

चंद्रपूर : मागील दोन महिन्यांपासून एसटी सेवा बस बंद असल्याने प्रवासी त्रस्त आहेत. त्यातच ट्रक चालक आपले वाहन विसापूर ...

चंद्रपूर : मागील दोन महिन्यांपासून एसटी सेवा बस बंद असल्याने प्रवासी त्रस्त आहेत. त्यातच ट्रक चालक आपले वाहन विसापूर फाट्यावरील बस थांब्यावर अगदी लागून पार्क करतात. त्यामुळे प्रवासी वाहनांना प्रवासी दिसत नसल्याने कोणतेच वाहन बस थांब्यावर थांबत नाही. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

विसापूर येथील नागरिक, विद्यार्थी, प्रवाशांना काही ना काही कामानिमित्त चंद्रपूर किंवा बल्लारपूर शहरात जावे लागते, परंतु विलीनीकरण करण्याच्या मागणीकरिता एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असल्याने, त्यांना केवळ खासगी वाहनाचा आधार आहे. प्रवाशांना वाहनाची प्रतीक्षा करण्यासाठी बसथांबा निवाऱ्याचा आसरा घ्यावा लागतो, परंतु अनेक दिवसांपासून ट्रक चालक आपले वाहन बस थांब्याच्या जागेसमोर पार्क करतात. परिणामी, प्रवासी वाहनांना बस थांब्यावर उभा असलेला प्रवासी दिसत नाही. परिणामी, ते वाहन चालक सरळ निघून जातात. त्यामुळे प्रवाशांना तेथेच ताटकळत राहावे लागते. यामुळे त्यांना कमालीच्या त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन बस थांब्याच्या परिसरात वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

बाजूलाच आहे टोल नाका

बस थांब्याच्या बाजूलाच टोल नाका आहे. त्यामु्ळे ते आपल्या परिसरात ट्रक पार्क करू देत नाही. परिणामी, हे ट्रक चालक बस थांब्याच्या समोरच ट्रक पार्क करतात. मात्र, प्रवाशांना उभे राहण्यासाठी तेथे जागाच नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याची जाण ठेऊन टोल नाकाधारकांनी या थांब्यावर पार्क होत असलेल्या ट्रक चालकांना गाड्या उभ्या ठेवण्यापासून बंदी घालवी, तसेच दुसऱ्या जागेची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

टॅग्स :Public Transportसार्वजनिक वाहतूकSocialसामाजिक