जिवती : तालुक्यातील परमडोली ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच यांची मंगळवारी निवड करण्यात आली. या ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाने आपला झेंडा फडकाविला आहे.
जिवती तालुक्यातील महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर परमडोली ग्रामपंचायत असून, येथे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नऊ उमेदवार निवडून आले आहेत. निवडणूक झाल्यानंतर कोणाचा उमेदवार सरपंच होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र भाजपने नऊपैकी लीनाबाई भारत बिऱ्हाड़े, ललिता ईश्वर आडे, धरमू किसन सोनकांबळे, संगीता व्यंकटी कोटंबे आणि माधव शेषराव तेलंगे या पाच उमेदवारांना आपल्याकडे ओढले होते आणि आज झालेल्या सरपंच आणि उपसरपंच निवडणुकीत आपले वर्चस्व दाखविले. सरपंचपद हे सर्वसाधारण महिला राखीव असल्यामुळे सरपंचपदी लीनाबाई भारत बिऱ्हाडे यांची निवड करण्यात आली, तर उपसरपंच म्हणून ललिता ईश्वर आडे यांची निवड करण्यात आली आहे.