शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
2
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
3
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
4
Cough Syrup : "लेकाच्या उपचारासाठी रिक्षा विकली, डायलिसिससाठी नव्हते पैसे, ३ लाखांचा खर्च"; वडिलांचा टाहो
5
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
6
विमानात बिघाड झाल्यानंतर सक्रिय होणारा 'RAT' नेमका आहे काय? काय आहे त्यात विशेष? जाणून घ्या...
7
दहा वर्षांपासून मुलांना Coldrif सिरप देतोय; 'त्या' मृत मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची प्रतिक्रिया
8
Coldrif Cough Syrup: मुलांच्या जीवावर उठलं कफ सिरप; कंपनीची १६ वर्षांपासून ना झाली वार्षिक बैठक, ना बॅलन्स शीटही झाली अपडेट
9
४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले...
10
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! टाटा-रिलायन्ससारख्या २४० दिग्गज कंपन्यांत पैसे लावा; कोणी आणली ऑफर?
11
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' सरकारी बँकेचे आणखी शेअर खरेदी केले, LIC चाही मोठा डाव; करतोय मालामाल!
13
गाझा युद्धविराम योजना: ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात फोनवर तुफान वाद! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर संतापले इस्रायलचे पंतप्रधान
14
Cough Syrup : "कफ सिरपने मुलाचा जीव घेतला, उपचारासाठी जमीन गहाण ठेवून ४ लाखांचं कर्ज, पण... "
15
'या' अभिनेत्रीला आदर्श मानते 'सैयारा' गर्ल अनीत पड्डा; म्हणाली, "रिलीजनंतर १० मिनिटं तिच्याशी..."
16
भारतीय नौदलाची ताकद वाढणार! आज अँड्रोथ युद्धनौका मिळणार, जाणून काय आहे खास?
17
VIRAL : 'सर डोकं दुखतंय...', कर्मचारी आजारी तरीही मॅनेजर सुट्टी देईना! संतापलेल्या तरुणानं काय केलं बघाच  
18
"मी माझ्या भावाचा मृतदेह स्वतःच्या हाताने बाहेर काढला", प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
19
हरमनप्रीत कौरचे तेवर! नजरेने धाक दाखवणारी पाकिस्तानी खेळाडू खाली मान घालून पळाली (VIDEO)
20
Mumbai Accident: दादरमध्ये अपघात, 'बेस्ट बस'ला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक; एक ठार, चार जखमी

पंचायत समित्याच घाणीच्या विळख्यात

By admin | Updated: November 12, 2014 22:40 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियान सुरु करुन स्वच्छतेचा कानमंत्र दिला आहे. त्यांच्या आदेशानुसार देशभर स्वच्छता अभियान धडाक्यात राबविले जात आहे. या अभियानात

दिव्याखाली अंधार चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियान सुरु करुन स्वच्छतेचा कानमंत्र दिला आहे. त्यांच्या आदेशानुसार देशभर स्वच्छता अभियान धडाक्यात राबविले जात आहे. या अभियानात सरकारी कार्यालयेही सहभागी आहेत. मात्र, ज्या विभागांवर स्वच्छता अभियान यशस्वी करण्याची जबाबदारी आहे, तेच कार्यालये घाणीच्या विळख्यात सापडले आहेत. पंचायत समिती कार्यालयांची स्वच्छता नेमकी कुठपर्यंत आली आहे, हे पाहण्यासाठी आज लोकमत चमूने भेटी देऊन तेथील स्वच्छतागृह, परिसराची परिस्थिती जाणली. मात्र, पंचायत समित्यांत दिव्याखालीच अंधार असल्याचे अतिशय विदारक चित्र जिल्ह्यातील पंचायत समिती कार्यालयांत लोकमतच्या स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसून आले आहे. कार्यालयातील कर्मचारीही अस्वच्छतेमुळे त्रस्त आहेत. परंतु स्वत: स्वच्छता करण्याची त्यांची तयारी नसल्याचे स्पष्टपणे दिसून आले.जिवती पंचायत समितीत कागदावर स्वच्छतापाच हजार लोकसंख्येच्या जिवती पंचायत समितीत दुपारी १.३० वाजताच्या सुमारास भेट दिली असता, स्वच्छता अभियान केवळ कागदावर दिसून आले. फलक लावून जनजागृतीचा संदेश देणाऱ्या कार्यालयातच स्वच्छतेचे ंिधंडवडे निघाले असून स्वच्छतागृहे तंबाखू, खर्रा, गुटख्याने रंगलेली आहेत. तर मुत्रीघरात पाण्याची सुविधा नसल्याने येथे सर्वत्र दुर्गधी पसरली आहे. कार्यालय परिसरात कचरा कुंडी नसल्याने कचरा सर्वत्र पसरलेला दिसून आला. असाच प्रकार इतरही कार्यालयात दिसून आला. त्यामुळे शासकीय कार्यालयात स्वच्छतेसाठी कोणत्या उपाययोजना राबविल्या जात आहे, हे स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून दिसून आले.राजुरा पंचायत समितीत स्वच्छतेचे तीन-तेराराजुरा येथील पंचायत समितीत स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहे. आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली असता, स्वच्छतेचे अतिशय विदारक चित्र दिसून आले. शौचालयाची स्वच्छता गेल्या अनेक दिवसांपासून केलेली नाही. त्यामुळे सीट काळीकु ठं झाली आहे. परिसरात असलेला हातपंप गेल्या अनेक दिवसांपासून बंद असून हातपंपाजवळ कचऱ्याचे ढिग जमा झाले आहे. कृषी विभाग कार्यालयाच्या मागच्या बाजुला शेतकऱ्यांना वाटण्यासाठी बैलबंडी ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला आहे. तर कार्यालयातच महत्वाच्या कामाच्या फाईली अस्ताव्यस्त ठेवलेल्या दिसून आल्या.