शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

पर्यटनदृष्ट्या पकडीगुड्डम प्रकल्प उपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 05:01 IST

कोरपना तालुक्यातील पकडीगुड्डम हा मध्यम सिंचन प्रकल्पात गणला जातो. मात्र या प्रकल्पाचे कार्यालय वनसडी किंवा कोरपना या जवळच्या ठिकाणी असणे गरजेचे असताना २० किलोमीटर अंतरावरील गडचांदूर येथे आहे. त्यामुळे येथून या प्रकल्पाचा कारभार सांभाळणे म्हणजे उंटावरून शेळ्या हाकलण्यासारखेच ठरत आहे. तसेच या प्रकल्पाला पूर्ण वेळ अभियंता नसल्याने एकाच अभियंत्याच्या भरोश्यावर अमलनाला व पकडीगुड्डम प्रकल्पाचा कारभार सुरू आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष : पर्यटन विकास केल्यास पडणार महसुलात भर

जयंत जेनेकर ।लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी असलेल्या कोरपना तालुक्यातील निसर्गरम्य पकडीगुडम सिंचन प्रकल्प शासनाच्या उदासीनतेमुळे विकासापासून दुर्लक्षित पडला आहे.कोरपना व जिवती तालुक्याच्या अगदी सीमारेषेवर असलेला हा सिंचन प्रकल्प दोन्ही तालुक्याच्या शेती सिंचन व पिण्याच्या पाण्याच्या सोयीच्या दृष्टीकोनातून वरदान आहे. मात्र या सिंचन प्रकल्पातील गाळ गेल्या अनेक वर्षांपासून उपसण्यात आला नाही. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गाळ साचला गेला आहे. या सिंचन प्रकल्प अंतर्गत दोन कालवे आहेत. मात्र दोन्ही कालवे अस्वच्छतेने बरबटले गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या बांधावर अनेकदा पाणी पोहोचतच नाही. वनसडीकडून लोणीकडे जाणारा कालवा गेल्या कित्येक वर्षांपासून बुजला व फुटला गेला आहे. परंतु त्याच्या दुरुस्ती व स्वच्छतेकडे आजगायत दुर्लक्ष होत आहे.सिंचन प्रकल्पाच्या वेस्टवेअरलाही बºयाच ठिकाणी छोटी-मोठी गळती लागली आहे. त्यावर त्वरित उपाययोजना होणे गरजेचे आहे. याठिकाणी कुठला सुरक्षारक्षकही तैनात नसल्याने प्रकल्प सुरक्षाही रामभरोसे पडली आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबतीत शासनाची उदासीनताच कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे. याकडे आता लक्ष देण्याची गरज आहे.प्रकल्प पकडीगुड्डमला; कार्यालय गडचांदूरलाकोरपना तालुक्यातील पकडीगुड्डम हा मध्यम सिंचन प्रकल्पात गणला जातो. मात्र या प्रकल्पाचे कार्यालय वनसडी किंवा कोरपना या जवळच्या ठिकाणी असणे गरजेचे असताना २० किलोमीटर अंतरावरील गडचांदूर येथे आहे. त्यामुळे येथून या प्रकल्पाचा कारभार सांभाळणे म्हणजे उंटावरून शेळ्या हाकलण्यासारखेच ठरत आहे. तसेच या प्रकल्पाला पूर्ण वेळ अभियंता नसल्याने एकाच अभियंत्याच्या भरोश्यावर अमलनाला व पकडीगुड्डम प्रकल्पाचा कारभार सुरू आहे. येथील कार्यालयीन कर्मचारी संख्याही बोटावर मोजण्याइतपतच आहे. त्यामुळे रिक्त पदे भरणेही आवश्यक आहे.विकास नाहीहा प्रकल्प माणिकगड पहाडाच्या अगदी लगत असल्याने, हा संपूर्ण भाग निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. या स्थळाचा पर्यटन दृष्टीने विकास केल्यास येथील पर्यटन फुलून विकास साधला जाईल. स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होईल. तसेच या माध्यमातून शासनालाही पर्यटनातून महसूल प्राप्त होईल.सदनिका दुर्लक्षितचपकडीगुड्डम सिंचन प्रकल्पातील अधिकारी व कर्मचाºयासाठी साधारणता २८ वर्षांपूर्वी चंद्रपूर- आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावर सोनुर्ली येथे सुसज्ज वसाहत तयार करण्यात आली. परंतु निर्मितीची अनेक वर्ष लोटूनसुद्धा आजपर्यंत वसाहतीत कुणीही वास्तव्यास आले नसल्याने सदर सदनिका आजही ओस पडल्या आहेत. इमारतीचीही बरीच नासधूस झाली आहे.

टॅग्स :tourismपर्यटनdam tourismधरण पर्यटन