शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनाअभावी धान पिके करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:15 IST

मूल तालुक्यातील गांगलवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर शेतजमिनीतील पिके सिंचनाअभावी नष्ट झाली असल्याने या सर्व शेतकऱ्यांपुढे संकट उभे ठाकले आहे. शासनाने मूल तालुका दुष्काळग्रस्त यादीतून वगळल्यामुळे व या शेतकऱ्यांना नापिकीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षण होण्याची शक्यता नसल्याने गांगलवाडी येथील आलेवाही, ........

ठळक मुद्देसर्वेक्षणाची मागणी : आलेवाही, नवेगाव शिवारातील पिके प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : मूल तालुक्यातील गांगलवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर शेतजमिनीतील पिके सिंचनाअभावी नष्ट झाली असल्याने या सर्व शेतकऱ्यांपुढे संकट उभे ठाकले आहे. शासनाने मूल तालुका दुष्काळग्रस्त यादीतून वगळल्यामुळे व या शेतकऱ्यांना नापिकीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षण होण्याची शक्यता नसल्याने गांगलवाडी येथील आलेवाही, नवेगाव तसेच गांगलवाडी साजामधील शेतकऱ्यांची अडवणूक होणार असल्याचे एकंदरीत चित्र दिसत आहे.मूल तालुक्यातील आलेवाही, नवेगाव तसेच गांगलवाडी शिवारामधील शेकडो हेक्टर शेतजमिनी पाटबंधारे विभागाच्या अखत्यारितील गोलाभुज या तलावाच्या पाण्यावर निर्भर आहेत. यंदा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित भुमिकेमुळे या जमिनीतील धान पिकाला सिंचनाची व्यवस्था न झाल्याने पिके हातची गेली आहेत. त्यामुळे हजारो रूपये खर्ची घालूनही हजार रूपयाचेही उत्पन्न या शेतीतून होत नसल्यामुळे शेतकरी बांधव विवंचनेत आहेत. त्यामुळे आलेवाही, नवेगाव व गांगलवाडी या शिवारातील नुकसानीचे सर्व्हेक्षण करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांनी केली आहे.याच शिवारातील काही शेतकऱ्यांनी हजारो रूपये खर्च करून खासगी बोर तसेच इंजिनद्वारा उपलब्ध असलेल्या पाण्याद्वारे आपली पिके वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे हे प्रयत्न यशस्वी न झाल्याने हा खर्चही व्यर्थ गेला आहे.पाणी वितरण समितीचे दुर्लक्षयंदा शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी पाणी वितरण समितीचे गठन करण्यात आले होते. परंतु ही समिती शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था करून देण्यात अपयशी ठरल्याने अशा समितीच्या भरवश्यावर सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी न राहता स्वत: उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून आवश्यकतेनुसार शेतकऱ्यांच्या शेतीला वेळीच सिंचनाची सुविधा निर्माण होईल, या दृष्टीने अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत आपले कर्तव्य पार पाडावे, अशी मागणीही गांगलवाडी तसेच आलेवाही, नवेगाव शिवारातील शेतकरी बांधवांनी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती