शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
6
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
7
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
8
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
10
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
11
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
12
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
13
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
14
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
15
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
16
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
17
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
18
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
19
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
20
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...

सिंचनाअभावी धान पिके करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:15 IST

मूल तालुक्यातील गांगलवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर शेतजमिनीतील पिके सिंचनाअभावी नष्ट झाली असल्याने या सर्व शेतकऱ्यांपुढे संकट उभे ठाकले आहे. शासनाने मूल तालुका दुष्काळग्रस्त यादीतून वगळल्यामुळे व या शेतकऱ्यांना नापिकीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षण होण्याची शक्यता नसल्याने गांगलवाडी येथील आलेवाही, ........

ठळक मुद्देसर्वेक्षणाची मागणी : आलेवाही, नवेगाव शिवारातील पिके प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : मूल तालुक्यातील गांगलवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर शेतजमिनीतील पिके सिंचनाअभावी नष्ट झाली असल्याने या सर्व शेतकऱ्यांपुढे संकट उभे ठाकले आहे. शासनाने मूल तालुका दुष्काळग्रस्त यादीतून वगळल्यामुळे व या शेतकऱ्यांना नापिकीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षण होण्याची शक्यता नसल्याने गांगलवाडी येथील आलेवाही, नवेगाव तसेच गांगलवाडी साजामधील शेतकऱ्यांची अडवणूक होणार असल्याचे एकंदरीत चित्र दिसत आहे.मूल तालुक्यातील आलेवाही, नवेगाव तसेच गांगलवाडी शिवारामधील शेकडो हेक्टर शेतजमिनी पाटबंधारे विभागाच्या अखत्यारितील गोलाभुज या तलावाच्या पाण्यावर निर्भर आहेत. यंदा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित भुमिकेमुळे या जमिनीतील धान पिकाला सिंचनाची व्यवस्था न झाल्याने पिके हातची गेली आहेत. त्यामुळे हजारो रूपये खर्ची घालूनही हजार रूपयाचेही उत्पन्न या शेतीतून होत नसल्यामुळे शेतकरी बांधव विवंचनेत आहेत. त्यामुळे आलेवाही, नवेगाव व गांगलवाडी या शिवारातील नुकसानीचे सर्व्हेक्षण करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांनी केली आहे.याच शिवारातील काही शेतकऱ्यांनी हजारो रूपये खर्च करून खासगी बोर तसेच इंजिनद्वारा उपलब्ध असलेल्या पाण्याद्वारे आपली पिके वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे हे प्रयत्न यशस्वी न झाल्याने हा खर्चही व्यर्थ गेला आहे.पाणी वितरण समितीचे दुर्लक्षयंदा शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी पाणी वितरण समितीचे गठन करण्यात आले होते. परंतु ही समिती शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था करून देण्यात अपयशी ठरल्याने अशा समितीच्या भरवश्यावर सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी न राहता स्वत: उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून आवश्यकतेनुसार शेतकऱ्यांच्या शेतीला वेळीच सिंचनाची सुविधा निर्माण होईल, या दृष्टीने अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत आपले कर्तव्य पार पाडावे, अशी मागणीही गांगलवाडी तसेच आलेवाही, नवेगाव शिवारातील शेतकरी बांधवांनी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती