शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
3
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
5
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
6
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
7
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
8
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
9
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
10
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
11
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
13
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
14
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
15
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
16
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
17
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
18
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
19
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
20
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी

पंचायत राज समितीसमोर होणार अधिकाऱ्यांची अग्निपरीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:30 IST

चंद्रपूर : घटनात्मक दर्जा असलेल्या महाराष्ट्र विधानमंडळ गठित २९ आमदारांच्या पंचायत राज समितीचे आज (दि. ९) सकाळी नऊ ...

चंद्रपूर : घटनात्मक दर्जा असलेल्या महाराष्ट्र विधानमंडळ गठित २९ आमदारांच्या पंचायत राज समितीचे आज (दि. ९) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास येथील शासकीय विश्रामगृहात आगमन होणार आहे. ही समिती तीन दिवस (दि. ११ फेब्रुवारी) जिल्हास्थळी मुक्कामी राहणार आहे. दोन आठवड्यांपासून हाेमवर्क करणाऱ्या अधिकाऱ्यांना पंचायत राज समितीच्या अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. समितीच्या सरबराईसाठी जि. प. ने तातडीने १५ लाखांची तरतूद केली. शिवाय, कुठेही कमी पडू नये, याचीही डोळ्यात तेल घालून खबरदारी घेतल्याचे सोमवारी दिसून आले.

कल्याणकारी राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणणे व राज्यघटनेत अंतर्भूत असलेली न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्त्वे गावपातळीवर आचरणात आणण्यासाठी सत्तेचे विक्रेंदीकरण करणे गरजेचे आहे. ग्रामीण जनतेला शासनाच्या कामकाजात सहभागी होता यावे, या उद्देशाने पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी १९५६ मध्ये बलवंतराव मेहता समिती स्थापन केली. या समितीने २ ऑक्टोबर १९५९ राेजी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत अशी त्रिस्तरीय पद्धती असावी, असा अहवाल शासनाला सादर केला. त्यानुसार महाराष्ट्रात १९६२ मध्ये जिल्हा परिषदा अस्तित्वात आल्या. जि. प. च्या कारभारावर विधिमंडळाचे नियंत्रण ठेवण्यासाठी २८ मार्च १९७३ रोजी विधानसभेत ठराव मंजूर करून विधानसभा व विधानपरिषद या दोनही सभागृहातील एकल संक्रमण मतदान व प्रमाणशीर प्रतिनिधीत्वाच्या तत्त्वानुसार पंचायत राज समिती गठित करण्यात आली. मंगळवारी जिल्ह्यात आगमन होणाऱ्या समितीत २९ सदस्यांचा समावेश असून, आमदार संजय रायमुलकर हे समितीप्रमुख आहे.

समितीच्या कामाची गोपनीयता

पंचायत राज समितीचे कार्य गोपनीय असते. त्यामुळे त्या कामाचा अहवाल विधिमंडळ सभागृहात सादर होईपर्यंत उघड करता येत नाही. त्याबाबत सदस्यांना सभागृहात प्रश्नदेखील विचारता येत नाही. तपासणी संबंधात आवश्यक व्यक्तींना बोलाविण्याचा व त्याबाबत कागदपत्र, अभिलेख मागण्याचा अधिकार समितीला आहे. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार व अनियमितता, नियमांचे उल्लंघन आदींशी संबंधित जि. प. चे तत्कालीन अधिकारीही सोमवारी दाखल झाले आहेत.

हक्कभंग, अवमान तरतुदींमुळे अधिकारी धास्तावले

महाराष्ट्र विधानसभा नियमांच्या तरतुदींच्या अधीन राहूनच समितीप्रमुख व समितीसमोर साक्षीदारांनी साक्ष नोंदवावी लागणार आहे. यासाठी साक्षीदारांनी आपल्या जागेवर बसताना किंवा जागेवरून उठताना वाकून आदर केला नाही तर अन्यथा हक्कभंग व अवमान होतो, अशी तरतूद आहे. त्यामुळे अधिकारी चांगलेच धास्तावले आहेत.