शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

घरकुलासाठी केवळ तीन हजार कुटुंब पात्र

By admin | Updated: December 15, 2014 22:53 IST

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून इंदिरा आवास योजना राबवली जाते. ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबाला हक्काचा निवारा दिला जातो. मात्र या योजनेत २०१४-१५ या वर्षात अनुसूचित जमाती,

अनेकश्वर मेश्राम - बल्लारपूरजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून इंदिरा आवास योजना राबवली जाते. ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबाला हक्काचा निवारा दिला जातो. मात्र या योजनेत २०१४-१५ या वर्षात अनुसूचित जमाती, अपंग व अल्पसंख्याकांना अनुशेष नसल्याच्या कारणावरुन वगळण्यात आल्याचे वास्तव समोर आले आहे. या वर्षात केवळ तीन हजार २७० कुटुंबाला घरकुलासाठी पात्र ठरविण्यात आले. इंदिरा आवास योजनेसाठी ग्रामपंचायत पातळीवर २००२-०७ या वर्षातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबाला कच्च्या घराच्या यादीत समावेश करण्यात आला होता. त्यानुसार योजनेतील लाभार्थ्यांना घरकुलासठी अनुदान दिले जाते. आजघडीला ग्रामीण भागात अनुसूचित जमाती, अपंग व अल्पसंख्याची कित्येकांकडे स्वत:चा निवारा नाही. कित्येक कुटुंबाचे दारिद्रय रेषेखालील यादीत नाव नाही. परिणामी हजारोंवर कुटुंब इंदिरा आवास योजनेच्या घरकुलापासून वंचित असल्याचे चित्र जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आहे.घरकुलासाठी २०१४-१५ या आर्थिक वर्षात जिल्हाभरातील ८४७ ग्रामपंचायतीपैकी केवळ १११ ग्रामपंचायतींच्या समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील दोन हजार ३९३ व इतर मागास प्रवर्गातील ८७७ एकूण तीन २७० घरकुल लाभार्थ्यांना सन १९९७-९८ व २००२-०७ च्या दारिद्रय रेषेखालील सर्वेक्षणानुसार पात्र ठरविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याला प्रतीक्षा यादीचा आधार घेतला जात आहे.घरकूल बांधकामासाठी लाभार्थ्यांकडे २६९ चौरस फुट जागा असणे आवश्यक असून ग्रामपंचायतीचा नमूना आठ आवश्यक आहे. आजघडीला घरकूल लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप पंचायत समिती स्तरावर संवर्ग विकास अधिकारी यांच्या मार्फत दिले जाते. या योजनेत लाभार्थ्यांने घरकूल बांधकामासोबत शौचालयाचे बांधकाम करण्याची अट घातली आहे. यासाठी शासनाकडून एक लाख रुपयांचा निधी दिला जाते. तीन टप्प्यात लाभार्थ्यांला निधीचे वाटप करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. यावर्षी इंदिरा आवास योजनेच्या लाभार्थ्यांत बल्लारपूर तालुक्यातील केवळ कळमना व कोठारी या दोन ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला आहे. अनुसूचित जातीचे ४९ व इतर मागास प्रवर्ग वर्गातील २३ असे एकूण ७२ घरकूल धारकांना लाभ देण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये अनुसूचित जमाती, अपंग व अल्पसंख्याक लाभार्थ्यांना वगळण्यात आले आहे.