शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

नामांकनासाठी केवळ एकच दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 22:20 IST

लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रपूर मतदारसंघांमध्ये ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची सुरुवात सोमवारपासून झाली. मात्र आतापर्यंत केवळ दोनच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. २५ मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरची तारीख आहे. मात्र रविवारी सुटीचा दिवस असल्याने या दिवशी उमेदवारांना नामांकन दाखल करता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ सोमवार हा एकच दिवस शिल्लक आहे. या दिवशी उमेदवारांची अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी उसळणार आहे.

ठळक मुद्देयंत्रणा सज्ज : सोमवारी अर्जासाठी उसळणार गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रपूर मतदारसंघांमध्ये ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची सुरुवात सोमवारपासून झाली. मात्र आतापर्यंत केवळ दोनच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. २५ मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरची तारीख आहे. मात्र रविवारी सुटीचा दिवस असल्याने या दिवशी उमेदवारांना नामांकन दाखल करता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ सोमवार हा एकच दिवस शिल्लक आहे. या दिवशी उमेदवारांची अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी उसळणार आहे.मतदान प्रक्रिया १८ दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. १८ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करणे सुरू झाले. दरम्यान, सहा दिवसात केवळ दोनच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. यात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीकडून एक व बहुजन वंचित आघाडीकडून एक, अशा दोन अर्जांचा समावेश आहे. यासोबत आतापर्यंत ९९ नामांकन अर्ज प्राप्त केल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या कक्षालगत असणाºया २० कलमी सभागृहामध्ये अर्जाची प्राथमिक तपासणी करण्यात येईल व त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या कक्षामध्ये सदर अर्ज दाखल करता येईल.अर्ज दाखल करण्यासाठी २५ हजार रुपये अनामत रक्कम आवश्यक असून अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी ही रक्कम १२ हजार ५०० रुपये आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या मदत कक्षातून हा अर्ज उपलब्ध करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करताना उमेदवारांसोबत चारच व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार आहे.कर्मचाऱ्यांची होणार दमछाक२५ मार्च हा एकमेव दिवस अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना मिळणार असल्याने शेवटच्या दिवशी उमेदवारांची गर्दी होण्याची शक्यता आहे. अर्जाची प्राथमिक छाननी, अनामत रक्कम स्वीकारणे आणि नंतर अर्ज दाखल करणे या प्रक्रियेस काही कालावधी लागत असल्याने यंत्रणाही सज्ज झाली असली तरी कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होणार आहे. यासाठी सोमवारी जादा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.उमेदवारांसाठी सुटी; मात्र कामे सुरूचशनिवार आणि रविवार हे सुटीचे दिवस असल्याने इच्छुक उमेदवार व उमेदवारांच्या समर्थकांना या दोन दिवसात उमेदवारी अर्ज प्राप्त करणे व दाखल करण्यास मज्जाव होता. मात्र निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाºयांना मात्र शनिवार आणि रविवारी सुटी नाही. त्यामुळे कर्मचाºयांना शनिवारी कर्तव्यावर रुजू व्हावे लागले. रविवारीही कर्मचाºयांना निवडणूकसंबंधातील कामे करावी लागणार आहे.