शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
3
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
4
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
5
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
6
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
7
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
8
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
9
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
10
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
11
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
12
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
13
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
14
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
15
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
16
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
17
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
18
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
19
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
20
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या

नामांकनासाठी केवळ एकच दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 22:20 IST

लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रपूर मतदारसंघांमध्ये ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची सुरुवात सोमवारपासून झाली. मात्र आतापर्यंत केवळ दोनच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. २५ मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरची तारीख आहे. मात्र रविवारी सुटीचा दिवस असल्याने या दिवशी उमेदवारांना नामांकन दाखल करता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ सोमवार हा एकच दिवस शिल्लक आहे. या दिवशी उमेदवारांची अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी उसळणार आहे.

ठळक मुद्देयंत्रणा सज्ज : सोमवारी अर्जासाठी उसळणार गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रपूर मतदारसंघांमध्ये ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची सुरुवात सोमवारपासून झाली. मात्र आतापर्यंत केवळ दोनच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. २५ मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरची तारीख आहे. मात्र रविवारी सुटीचा दिवस असल्याने या दिवशी उमेदवारांना नामांकन दाखल करता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ सोमवार हा एकच दिवस शिल्लक आहे. या दिवशी उमेदवारांची अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी उसळणार आहे.मतदान प्रक्रिया १८ दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. १८ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करणे सुरू झाले. दरम्यान, सहा दिवसात केवळ दोनच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. यात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीकडून एक व बहुजन वंचित आघाडीकडून एक, अशा दोन अर्जांचा समावेश आहे. यासोबत आतापर्यंत ९९ नामांकन अर्ज प्राप्त केल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या कक्षालगत असणाºया २० कलमी सभागृहामध्ये अर्जाची प्राथमिक तपासणी करण्यात येईल व त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या कक्षामध्ये सदर अर्ज दाखल करता येईल.अर्ज दाखल करण्यासाठी २५ हजार रुपये अनामत रक्कम आवश्यक असून अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी ही रक्कम १२ हजार ५०० रुपये आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या मदत कक्षातून हा अर्ज उपलब्ध करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करताना उमेदवारांसोबत चारच व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार आहे.कर्मचाऱ्यांची होणार दमछाक२५ मार्च हा एकमेव दिवस अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना मिळणार असल्याने शेवटच्या दिवशी उमेदवारांची गर्दी होण्याची शक्यता आहे. अर्जाची प्राथमिक छाननी, अनामत रक्कम स्वीकारणे आणि नंतर अर्ज दाखल करणे या प्रक्रियेस काही कालावधी लागत असल्याने यंत्रणाही सज्ज झाली असली तरी कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होणार आहे. यासाठी सोमवारी जादा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.उमेदवारांसाठी सुटी; मात्र कामे सुरूचशनिवार आणि रविवार हे सुटीचे दिवस असल्याने इच्छुक उमेदवार व उमेदवारांच्या समर्थकांना या दोन दिवसात उमेदवारी अर्ज प्राप्त करणे व दाखल करण्यास मज्जाव होता. मात्र निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाºयांना मात्र शनिवार आणि रविवारी सुटी नाही. त्यामुळे कर्मचाºयांना शनिवारी कर्तव्यावर रुजू व्हावे लागले. रविवारीही कर्मचाºयांना निवडणूकसंबंधातील कामे करावी लागणार आहे.