शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

धरणांमध्ये फक्त 20.71 टक्के जलसाठा मॉन्सून लांबल्यास हंगाम खोळंबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 05:00 IST

चंद्रपूर पाटबंधारे विभागअंतर्गत येणाऱ्या मोठ्या, मध्यम, लघू व मामा तलावांच्या बांधबंदिस्ती व दुरुस्तीची कामे गतवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पूर्ण करण्यात आली होती. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कार्यकारी अभियंता काळे यांनी  या कामांकडे प्राधान्याने लक्ष दिले. परिणामी, आसोलामेंढा हा मोठा प्रकल्प व मध्यम प्रकल्पात येणाऱ्या घोडाझरी, नलेश्वर, चंदई, चारगाव, अमलनाला, लभानसराड, पकडीगुड्डम, डोंगरगाव तसेच १६ लघुप्रकल्पांतील कामेही विहित कालावधीतच पूर्ण होऊ शकली.

ठळक मुद्देधरणांनी गाठला तळ : २७.६२९ दलघमी उपयुक्त जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर :  जिल्ह्यातील एक मोठा व आठ मध्यम धरणांची बांधबंदिस्ती  उत्तम असताना बुधवार (दि. १९)पर्यंत केवळ २०.७१ टक्के जलसाठा  शिल्लक राहिला आहे. विशेष म्हणजे गतवर्षी याच दिवसापर्यंत धरणांमध्ये ३६.३ टक्के जलसाठा उपलब्ध होता. त्यामुळे  यंदा मान्सून लांबल्यास यंदाच्या खरीप हंगामावर अनिष्ट परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.चंद्रपूर पाटबंधारे विभागअंतर्गत येणाऱ्या मोठ्या, मध्यम, लघू व मामा तलावांच्या बांधबंदिस्ती व दुरुस्तीची कामे गतवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पूर्ण करण्यात आली होती. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कार्यकारी अभियंता काळे यांनी  या कामांकडे प्राधान्याने लक्ष दिले. परिणामी, आसोलामेंढा हा मोठा प्रकल्प व मध्यम प्रकल्पात येणाऱ्या घोडाझरी, नलेश्वर, चंदई, चारगाव, अमलनाला, लभानसराड, पकडीगुड्डम, डोंगरगाव तसेच १६ लघुप्रकल्पांतील कामेही विहित कालावधीतच पूर्ण होऊ शकली. पावसाळा सुरू झाल्यानंतर या धरणांमध्ये जलसाठा उपलब्ध होऊ शकला. शिवाय, संभाव्य गळतीलाही आळा बसला. मात्र, गतवर्षी जिल्ह्यात पुरेसा पाऊसच पडला नाही. त्यामुळे मागील वर्षातील मृत साठा, एकूण साठा आणि उपयुक्त  उपलब्ध जलसाठ्याची आजच्या स्थितीशी तुलना केल्यास बरीच तफावत दिसून येते. धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही बाब चिंता निर्माण करणारीच आहे. 

आसोलमेंढा प्रकल्प दिलासादायी आसोलामेंढा प्रकल्पाचा संकल्पीय साठा ५२.३३० द.ल.घ.मी. आहे.  सद्य:स्थितीत ३७.२२० द.ल.घ.मी. (७१. १३ टक्के) उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी याच कालावधीत या धरणात ८२.१ टक्के जलसाठा उपलब्ध होता. मध्यम प्रकल्पाच्या तुलनेत या मोठ्या धरणाची स्थिती दिलासा देणारी आहे.

चंद्रपूर पाटबंधारे विभाग अलर्टपावसाळ्यात धरणांची स्थिती सक्षम राहावी, यासाठी दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली. बरीच कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. सिंचन प्रकल्प क्षेत्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये पाणीवापर संस्थांनाही सक्रिय करण्यात आल्या. खरीप हंगामात धरणातील पाण्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी चंद्रपूर पाटबंधारे विभाग सतर्क झाला आहे. 

 

टॅग्स :DamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प