शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

धरणांमध्ये फक्त 20.71 टक्के जलसाठा मॉन्सून लांबल्यास हंगाम खोळंबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 05:00 IST

चंद्रपूर पाटबंधारे विभागअंतर्गत येणाऱ्या मोठ्या, मध्यम, लघू व मामा तलावांच्या बांधबंदिस्ती व दुरुस्तीची कामे गतवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पूर्ण करण्यात आली होती. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कार्यकारी अभियंता काळे यांनी  या कामांकडे प्राधान्याने लक्ष दिले. परिणामी, आसोलामेंढा हा मोठा प्रकल्प व मध्यम प्रकल्पात येणाऱ्या घोडाझरी, नलेश्वर, चंदई, चारगाव, अमलनाला, लभानसराड, पकडीगुड्डम, डोंगरगाव तसेच १६ लघुप्रकल्पांतील कामेही विहित कालावधीतच पूर्ण होऊ शकली.

ठळक मुद्देधरणांनी गाठला तळ : २७.६२९ दलघमी उपयुक्त जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर :  जिल्ह्यातील एक मोठा व आठ मध्यम धरणांची बांधबंदिस्ती  उत्तम असताना बुधवार (दि. १९)पर्यंत केवळ २०.७१ टक्के जलसाठा  शिल्लक राहिला आहे. विशेष म्हणजे गतवर्षी याच दिवसापर्यंत धरणांमध्ये ३६.३ टक्के जलसाठा उपलब्ध होता. त्यामुळे  यंदा मान्सून लांबल्यास यंदाच्या खरीप हंगामावर अनिष्ट परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.चंद्रपूर पाटबंधारे विभागअंतर्गत येणाऱ्या मोठ्या, मध्यम, लघू व मामा तलावांच्या बांधबंदिस्ती व दुरुस्तीची कामे गतवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पूर्ण करण्यात आली होती. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कार्यकारी अभियंता काळे यांनी  या कामांकडे प्राधान्याने लक्ष दिले. परिणामी, आसोलामेंढा हा मोठा प्रकल्प व मध्यम प्रकल्पात येणाऱ्या घोडाझरी, नलेश्वर, चंदई, चारगाव, अमलनाला, लभानसराड, पकडीगुड्डम, डोंगरगाव तसेच १६ लघुप्रकल्पांतील कामेही विहित कालावधीतच पूर्ण होऊ शकली. पावसाळा सुरू झाल्यानंतर या धरणांमध्ये जलसाठा उपलब्ध होऊ शकला. शिवाय, संभाव्य गळतीलाही आळा बसला. मात्र, गतवर्षी जिल्ह्यात पुरेसा पाऊसच पडला नाही. त्यामुळे मागील वर्षातील मृत साठा, एकूण साठा आणि उपयुक्त  उपलब्ध जलसाठ्याची आजच्या स्थितीशी तुलना केल्यास बरीच तफावत दिसून येते. धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही बाब चिंता निर्माण करणारीच आहे. 

आसोलमेंढा प्रकल्प दिलासादायी आसोलामेंढा प्रकल्पाचा संकल्पीय साठा ५२.३३० द.ल.घ.मी. आहे.  सद्य:स्थितीत ३७.२२० द.ल.घ.मी. (७१. १३ टक्के) उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी याच कालावधीत या धरणात ८२.१ टक्के जलसाठा उपलब्ध होता. मध्यम प्रकल्पाच्या तुलनेत या मोठ्या धरणाची स्थिती दिलासा देणारी आहे.

चंद्रपूर पाटबंधारे विभाग अलर्टपावसाळ्यात धरणांची स्थिती सक्षम राहावी, यासाठी दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली. बरीच कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. सिंचन प्रकल्प क्षेत्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये पाणीवापर संस्थांनाही सक्रिय करण्यात आल्या. खरीप हंगामात धरणातील पाण्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी चंद्रपूर पाटबंधारे विभाग सतर्क झाला आहे. 

 

टॅग्स :DamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प