शहरं
Join us  
Trending Stories
1
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
2
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
3
मुख्यमंत्र नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
4
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया
5
खुनी सोनम रघुवंशीवर लवकरच येणार चित्रपट? बॉलिवूडमधल्या 'या' टॉप अभिनेत्याची बारीक नजर
6
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
7
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
8
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
9
कास्टिंग काऊचची सुरुवात नक्की कशी होते? मराठी अभिनेत्रीने केली इंडस्ट्रीची पोलखोल
10
अखेर 'ते' ब्रिटिश लढाऊ विमान दुरुस्त झाले; केरळहून ब्रिटनच्या दिशेने रवाना
11
आईच्या अपमानाचा बदला! दहा वर्षे घेतला आरोपीचा शोध, समोर येताच केले ठार; सोशल मीडिया पोस्टमुळे सापडले
12
धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
13
FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट
14
IND vs ENG : इंग्लंडनं खेळली टीम इंडियासारखी 'चाल'; कसोटी क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
15
"मी लघवी स्वत:च प्यायलो, त्यांना दिली नाही म्हणून...", ट्रोल करणाऱ्यांना परेश रावल यांची सणसणीत चपराक
16
'सैय्यारा'से आशिकी हो गयी है मुझे! 'आशिकी गर्ल' श्रद्धा कपूरने सिनेमा पाहून दिली प्रतिक्रिया
17
हुंडा मागतो, दारू पिऊन नवरा मारतो...; हरियाणाच्या डान्सर सपनाचा सासरच्यांवर गंभीर आरोप
18
जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वी निवृत्तीवर भाष्य केले; आता अचानक राजीनामा का दिला..?
19
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला एक दिवा पितरांसाठी ठेवायला विसरू नका, कारण...
20
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागचं कोडं उलगडेना; विरोधी पक्ष हैराण पण भाजपाही संभ्रमात?

धरणांमध्ये फक्त 20.71 टक्के जलसाठा मॉन्सून लांबल्यास हंगाम खोळंबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 05:00 IST

चंद्रपूर पाटबंधारे विभागअंतर्गत येणाऱ्या मोठ्या, मध्यम, लघू व मामा तलावांच्या बांधबंदिस्ती व दुरुस्तीची कामे गतवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पूर्ण करण्यात आली होती. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कार्यकारी अभियंता काळे यांनी  या कामांकडे प्राधान्याने लक्ष दिले. परिणामी, आसोलामेंढा हा मोठा प्रकल्प व मध्यम प्रकल्पात येणाऱ्या घोडाझरी, नलेश्वर, चंदई, चारगाव, अमलनाला, लभानसराड, पकडीगुड्डम, डोंगरगाव तसेच १६ लघुप्रकल्पांतील कामेही विहित कालावधीतच पूर्ण होऊ शकली.

ठळक मुद्देधरणांनी गाठला तळ : २७.६२९ दलघमी उपयुक्त जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर :  जिल्ह्यातील एक मोठा व आठ मध्यम धरणांची बांधबंदिस्ती  उत्तम असताना बुधवार (दि. १९)पर्यंत केवळ २०.७१ टक्के जलसाठा  शिल्लक राहिला आहे. विशेष म्हणजे गतवर्षी याच दिवसापर्यंत धरणांमध्ये ३६.३ टक्के जलसाठा उपलब्ध होता. त्यामुळे  यंदा मान्सून लांबल्यास यंदाच्या खरीप हंगामावर अनिष्ट परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.चंद्रपूर पाटबंधारे विभागअंतर्गत येणाऱ्या मोठ्या, मध्यम, लघू व मामा तलावांच्या बांधबंदिस्ती व दुरुस्तीची कामे गतवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पूर्ण करण्यात आली होती. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कार्यकारी अभियंता काळे यांनी  या कामांकडे प्राधान्याने लक्ष दिले. परिणामी, आसोलामेंढा हा मोठा प्रकल्प व मध्यम प्रकल्पात येणाऱ्या घोडाझरी, नलेश्वर, चंदई, चारगाव, अमलनाला, लभानसराड, पकडीगुड्डम, डोंगरगाव तसेच १६ लघुप्रकल्पांतील कामेही विहित कालावधीतच पूर्ण होऊ शकली. पावसाळा सुरू झाल्यानंतर या धरणांमध्ये जलसाठा उपलब्ध होऊ शकला. शिवाय, संभाव्य गळतीलाही आळा बसला. मात्र, गतवर्षी जिल्ह्यात पुरेसा पाऊसच पडला नाही. त्यामुळे मागील वर्षातील मृत साठा, एकूण साठा आणि उपयुक्त  उपलब्ध जलसाठ्याची आजच्या स्थितीशी तुलना केल्यास बरीच तफावत दिसून येते. धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही बाब चिंता निर्माण करणारीच आहे. 

आसोलमेंढा प्रकल्प दिलासादायी आसोलामेंढा प्रकल्पाचा संकल्पीय साठा ५२.३३० द.ल.घ.मी. आहे.  सद्य:स्थितीत ३७.२२० द.ल.घ.मी. (७१. १३ टक्के) उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी याच कालावधीत या धरणात ८२.१ टक्के जलसाठा उपलब्ध होता. मध्यम प्रकल्पाच्या तुलनेत या मोठ्या धरणाची स्थिती दिलासा देणारी आहे.

चंद्रपूर पाटबंधारे विभाग अलर्टपावसाळ्यात धरणांची स्थिती सक्षम राहावी, यासाठी दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली. बरीच कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. सिंचन प्रकल्प क्षेत्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये पाणीवापर संस्थांनाही सक्रिय करण्यात आल्या. खरीप हंगामात धरणातील पाण्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी चंद्रपूर पाटबंधारे विभाग सतर्क झाला आहे. 

 

टॅग्स :DamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प