शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

एक गाव २४ तास पाणी देणारे !

By admin | Updated: June 8, 2014 23:46 IST

उन्हाळा आला की ग्रामीण भागात काही प्रमाणात पाण्याची टंचाई भासत असते, हे पोंभुर्णा तालुक्याचे समीकरण आहे. थेंब-थेंब पाण्यासाठी कोसोदूर पायपीट करण्याची पाळी नेहमीच मायमाऊलींच्या नशिबी कोरलेली.

नीळकंठ नैताम- देवाडा(खुर्द)उन्हाळा आला की ग्रामीण भागात काही प्रमाणात पाण्याची टंचाई भासत असते, हे पोंभुर्णा तालुक्याचे समीकरण आहे.  थेंब-थेंब पाण्यासाठी कोसोदूर पायपीट करण्याची पाळी नेहमीच मायमाऊलींच्या नशिबी कोरलेली. दरवर्षी लाखोंचा खर्च होऊनही पाणी टंचाई कायमच. मात्र या प्रकाराला जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यातील चेकहत्तीबोडी गाव अपवाद ठरत आहे. ही किमया साधली आहे, सौर ऊज्रेने. या ऊज्रेचा वापर करीत गावकर्‍यांनी नियोजनबद्धरीत्या पाणी प्रश्न मिटविला. आता या गावात २४ तास पाणी मिळत असून स्थानिक मायमाऊलींची पाण्यासाठी होणारी ससेहोलपटही थांबली आहे.पोंभूर्णा तालुक्यातील चेक हत्तीबोडी हे गाव लोकसंख्येच्या विस्ताराने फार लहान असून याठिकाणी ३८५ नागरिक वास्तव्यास राहतात. येथे दोन विहिरी व एक हातपंप अशी पाण्याची व्यवस्था होती. मात्र विहिर व हातपंपांच्या पाण्याची पातळी एप्रिल महिन्यापासून खोल जायची आणि स्थानिक नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. अशातच ही पाणी टंचाई दूर करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने या ठिकाणी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाण्याची सुविधा निर्माण केली. या योजनेमुळे काही प्रमाणात पाण्याचा प्रश्न मिटला असला तरी दरवर्षीच्या वाढत्या लोकसंख्येमुळे परत पाण्याची कमतरता भासत गेली. या परिस्थितीवर कशी मात करावी, हाच प्रश्न गावात चचर्िेला जाऊ लागला. अखेर चकहत्तीबोडी गावात एका हातपंपावर मोटरपंप बसविण्यात आले व त्याला सौरऊज्रेने जोडण्यात आले. त्यावरुन गावात दोन ठिकाणी सार्वजनिक नळ देण्यात आले. सोबतच आठशे लिटर क्षमतेची पाण्याची टाकीही बसविण्यात आली. स्वच्छ सुर्यप्रकाशाने सौरऊज्रेवरील मोटरपंप कार्यान्वित झाला. गावात मुबलक पाणी उपलब्ध झाले. विजेची तर बचत झालीच पण गावात २४ तास पाणी उपलब्ध झाले.या गावातील शेतकरी अनिल सातपुते म्हणाले, गावात सौरऊज्रेवरील पाणी पुरवठा सुरू झाल्याने या ठिकाणी आता पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला आहे. वर्षभरापासून कुणालाही शेतात किंवा इतरत्र पाण्यासाठी भटकावे लागत नाही. शेतमजुरी करताना पाण्यासाठी मोठी पंचायत व्हायची. परंतु आता नळाचे मुबलक पाणी मिळत असल्याने मजुरीही बुडत नाही आणि पाण्यासाठी भटकंतीही करावी लागत नाही.राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत या गावाची निवड करून सौरऊज्रेच्या माध्यमातून आठशे लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीद्वारे स्थानिक नागरिकांना पाणी पुरवठा केला जात असल्याने गावात मुबलक पाणी उपलब्ध झाले असून २४ तास पाणी देणारे चकहत्तीबोडा हे गाव जिल्ह्यात एकमेव ठरले आहे. या गावाची प्रेरणा इतर गावांनी घेतली तर मोठय़ा प्रमाणात पाणी प्रश्न मिटण्याची शक्यता आहे.