शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

एक गाव २४ तास पाणी देणारे !

By admin | Updated: June 8, 2014 23:46 IST

उन्हाळा आला की ग्रामीण भागात काही प्रमाणात पाण्याची टंचाई भासत असते, हे पोंभुर्णा तालुक्याचे समीकरण आहे. थेंब-थेंब पाण्यासाठी कोसोदूर पायपीट करण्याची पाळी नेहमीच मायमाऊलींच्या नशिबी कोरलेली.

नीळकंठ नैताम- देवाडा(खुर्द)उन्हाळा आला की ग्रामीण भागात काही प्रमाणात पाण्याची टंचाई भासत असते, हे पोंभुर्णा तालुक्याचे समीकरण आहे.  थेंब-थेंब पाण्यासाठी कोसोदूर पायपीट करण्याची पाळी नेहमीच मायमाऊलींच्या नशिबी कोरलेली. दरवर्षी लाखोंचा खर्च होऊनही पाणी टंचाई कायमच. मात्र या प्रकाराला जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यातील चेकहत्तीबोडी गाव अपवाद ठरत आहे. ही किमया साधली आहे, सौर ऊज्रेने. या ऊज्रेचा वापर करीत गावकर्‍यांनी नियोजनबद्धरीत्या पाणी प्रश्न मिटविला. आता या गावात २४ तास पाणी मिळत असून स्थानिक मायमाऊलींची पाण्यासाठी होणारी ससेहोलपटही थांबली आहे.पोंभूर्णा तालुक्यातील चेक हत्तीबोडी हे गाव लोकसंख्येच्या विस्ताराने फार लहान असून याठिकाणी ३८५ नागरिक वास्तव्यास राहतात. येथे दोन विहिरी व एक हातपंप अशी पाण्याची व्यवस्था होती. मात्र विहिर व हातपंपांच्या पाण्याची पातळी एप्रिल महिन्यापासून खोल जायची आणि स्थानिक नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. अशातच ही पाणी टंचाई दूर करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने या ठिकाणी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाण्याची सुविधा निर्माण केली. या योजनेमुळे काही प्रमाणात पाण्याचा प्रश्न मिटला असला तरी दरवर्षीच्या वाढत्या लोकसंख्येमुळे परत पाण्याची कमतरता भासत गेली. या परिस्थितीवर कशी मात करावी, हाच प्रश्न गावात चचर्िेला जाऊ लागला. अखेर चकहत्तीबोडी गावात एका हातपंपावर मोटरपंप बसविण्यात आले व त्याला सौरऊज्रेने जोडण्यात आले. त्यावरुन गावात दोन ठिकाणी सार्वजनिक नळ देण्यात आले. सोबतच आठशे लिटर क्षमतेची पाण्याची टाकीही बसविण्यात आली. स्वच्छ सुर्यप्रकाशाने सौरऊज्रेवरील मोटरपंप कार्यान्वित झाला. गावात मुबलक पाणी उपलब्ध झाले. विजेची तर बचत झालीच पण गावात २४ तास पाणी उपलब्ध झाले.या गावातील शेतकरी अनिल सातपुते म्हणाले, गावात सौरऊज्रेवरील पाणी पुरवठा सुरू झाल्याने या ठिकाणी आता पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला आहे. वर्षभरापासून कुणालाही शेतात किंवा इतरत्र पाण्यासाठी भटकावे लागत नाही. शेतमजुरी करताना पाण्यासाठी मोठी पंचायत व्हायची. परंतु आता नळाचे मुबलक पाणी मिळत असल्याने मजुरीही बुडत नाही आणि पाण्यासाठी भटकंतीही करावी लागत नाही.राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत या गावाची निवड करून सौरऊज्रेच्या माध्यमातून आठशे लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीद्वारे स्थानिक नागरिकांना पाणी पुरवठा केला जात असल्याने गावात मुबलक पाणी उपलब्ध झाले असून २४ तास पाणी देणारे चकहत्तीबोडा हे गाव जिल्ह्यात एकमेव ठरले आहे. या गावाची प्रेरणा इतर गावांनी घेतली तर मोठय़ा प्रमाणात पाणी प्रश्न मिटण्याची शक्यता आहे.