शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

हजेरीपटावर एक लाख २२ हजार विद्यार्थी, उपस्थित १३ हजार ९६०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:30 IST

चंद्रपूर : नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मात्र अद्यापही कोरोनाचे सावट टळले नसल्याने ...

चंद्रपूर : नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मात्र अद्यापही कोरोनाचे सावट टळले नसल्याने पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे. हजेरीपटावर एक लाख २२ हजार ८४ विद्यार्थ्यांची नोंद आहे. मात्र प्रत्यक्षात केवळ १३ हजार ९६० विद्यार्थी शाळेत येत असल्याचे चित्र आहे.

दिवाळीनंतर कोरोनाचे रुग्ण वाढण्यास सुरूवात झाली. तसेच कोरोनावर लस येण्यापूर्वीच शासनाने २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु केल्या. मात्र याला काही पालकांनी तसेच पालकांच्या संघटनेकडून विरोध करण्यात आला. तसेच शाळेतील शिक्षकांसह शाळेतील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. आतापर्यंत ३७९ शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्यामुळे पालकांमध्ये धडकी भरली आहे. त्यामुळे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना चुकून कोरोना झाल्यास पालकांच्या रोषाला सामोर जावे लागण्याची शक्यता होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना पालकांचे संमतीपत्र घेवून शाळेत यावे, असा निर्णय घेण्यात आला. मात्र शाळेतून संमती घेण्यास पालक अनुत्सुक दिसून आले.

जिल्ह्यात नववी ते बारावीच्या ६१७ शाळा आहेत. त्यापैकी ३७६ शाळा सुरू आहेत. जिल्ह्यातील पटसंख्या एक लाख २२ हजार ८४ विद्यार्थ्यांची नोंद आहे. ५० टक्के तत्वावर विद्यार्थ्यांना शाळेत बोलविण्यात येत आहे. यापैकी केवळ १४ हजार विद्यार्थ्यांनी संमतीपत्र दिले. त्यापैकी १३ हजार ९४० विद्यार्थी शाळेत उपस्थित राहत असल्याने अद्यापही शाळेला विद्यार्थ्यांची प्रतीक्षा लागून आहे.

बॉक्स

स्वॅब टेस्टमुळे शिक्षकांची संख्या कमी

शाळेतील शिक्षकांसह शाळेतील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. आतापर्यंत सात हजार ८०० कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी ३७९ शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्यामुळे शाळेत शिक्षकांची कमी आहे.

कोट

५० टक्के विद्यार्थ्यांना शाळेत बोलविण्यात येत आहे. ज्या शाळेत रुग्ण आढळले आहेत. त्या शाळा सात दिवस बंद ठेवण्यात आल्या आहेत. शुक्रवारी ६१७ शाळांपैकी ३७६ शाळा सुरू होत्या. त्यामध्ये १३,९६० विद्यार्थी उपस्थित होते. प्रत्येक दिवशी जवळपास एवढेच विद्यार्थी उपस्थित राहत आहेत.

- उल्हास नरड, शिक्षणाधिकारी( माध्य.),