शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

हजेरीपटावर एक लाख २२ हजार विद्यार्थी, उपस्थित १३ हजार ९६०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:30 IST

चंद्रपूर : नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मात्र अद्यापही कोरोनाचे सावट टळले नसल्याने ...

चंद्रपूर : नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मात्र अद्यापही कोरोनाचे सावट टळले नसल्याने पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे. हजेरीपटावर एक लाख २२ हजार ८४ विद्यार्थ्यांची नोंद आहे. मात्र प्रत्यक्षात केवळ १३ हजार ९६० विद्यार्थी शाळेत येत असल्याचे चित्र आहे.

दिवाळीनंतर कोरोनाचे रुग्ण वाढण्यास सुरूवात झाली. तसेच कोरोनावर लस येण्यापूर्वीच शासनाने २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु केल्या. मात्र याला काही पालकांनी तसेच पालकांच्या संघटनेकडून विरोध करण्यात आला. तसेच शाळेतील शिक्षकांसह शाळेतील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. आतापर्यंत ३७९ शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्यामुळे पालकांमध्ये धडकी भरली आहे. त्यामुळे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना चुकून कोरोना झाल्यास पालकांच्या रोषाला सामोर जावे लागण्याची शक्यता होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना पालकांचे संमतीपत्र घेवून शाळेत यावे, असा निर्णय घेण्यात आला. मात्र शाळेतून संमती घेण्यास पालक अनुत्सुक दिसून आले.

जिल्ह्यात नववी ते बारावीच्या ६१७ शाळा आहेत. त्यापैकी ३७६ शाळा सुरू आहेत. जिल्ह्यातील पटसंख्या एक लाख २२ हजार ८४ विद्यार्थ्यांची नोंद आहे. ५० टक्के तत्वावर विद्यार्थ्यांना शाळेत बोलविण्यात येत आहे. यापैकी केवळ १४ हजार विद्यार्थ्यांनी संमतीपत्र दिले. त्यापैकी १३ हजार ९४० विद्यार्थी शाळेत उपस्थित राहत असल्याने अद्यापही शाळेला विद्यार्थ्यांची प्रतीक्षा लागून आहे.

बॉक्स

स्वॅब टेस्टमुळे शिक्षकांची संख्या कमी

शाळेतील शिक्षकांसह शाळेतील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. आतापर्यंत सात हजार ८०० कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी ३७९ शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्यामुळे शाळेत शिक्षकांची कमी आहे.

कोट

५० टक्के विद्यार्थ्यांना शाळेत बोलविण्यात येत आहे. ज्या शाळेत रुग्ण आढळले आहेत. त्या शाळा सात दिवस बंद ठेवण्यात आल्या आहेत. शुक्रवारी ६१७ शाळांपैकी ३७६ शाळा सुरू होत्या. त्यामध्ये १३,९६० विद्यार्थी उपस्थित होते. प्रत्येक दिवशी जवळपास एवढेच विद्यार्थी उपस्थित राहत आहेत.

- उल्हास नरड, शिक्षणाधिकारी( माध्य.),