शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
2
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
3
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
4
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
5
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
6
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
7
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
8
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
9
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
10
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
11
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
12
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
13
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
14
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
15
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
16
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
17
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
18
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
19
नाशिक बोगस शालार्थ आयडी प्रकरण : 'त्या' शिक्षक, अधिकाऱ्यांची झाडाझडती
20
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral

हजेरीपटावर एक लाख २२ हजार विद्यार्थी, उपस्थित १३ हजार ९६०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:30 IST

चंद्रपूर : नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मात्र अद्यापही कोरोनाचे सावट टळले नसल्याने ...

चंद्रपूर : नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मात्र अद्यापही कोरोनाचे सावट टळले नसल्याने पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे. हजेरीपटावर एक लाख २२ हजार ८४ विद्यार्थ्यांची नोंद आहे. मात्र प्रत्यक्षात केवळ १३ हजार ९६० विद्यार्थी शाळेत येत असल्याचे चित्र आहे.

दिवाळीनंतर कोरोनाचे रुग्ण वाढण्यास सुरूवात झाली. तसेच कोरोनावर लस येण्यापूर्वीच शासनाने २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु केल्या. मात्र याला काही पालकांनी तसेच पालकांच्या संघटनेकडून विरोध करण्यात आला. तसेच शाळेतील शिक्षकांसह शाळेतील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. आतापर्यंत ३७९ शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्यामुळे पालकांमध्ये धडकी भरली आहे. त्यामुळे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना चुकून कोरोना झाल्यास पालकांच्या रोषाला सामोर जावे लागण्याची शक्यता होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना पालकांचे संमतीपत्र घेवून शाळेत यावे, असा निर्णय घेण्यात आला. मात्र शाळेतून संमती घेण्यास पालक अनुत्सुक दिसून आले.

जिल्ह्यात नववी ते बारावीच्या ६१७ शाळा आहेत. त्यापैकी ३७६ शाळा सुरू आहेत. जिल्ह्यातील पटसंख्या एक लाख २२ हजार ८४ विद्यार्थ्यांची नोंद आहे. ५० टक्के तत्वावर विद्यार्थ्यांना शाळेत बोलविण्यात येत आहे. यापैकी केवळ १४ हजार विद्यार्थ्यांनी संमतीपत्र दिले. त्यापैकी १३ हजार ९४० विद्यार्थी शाळेत उपस्थित राहत असल्याने अद्यापही शाळेला विद्यार्थ्यांची प्रतीक्षा लागून आहे.

बॉक्स

स्वॅब टेस्टमुळे शिक्षकांची संख्या कमी

शाळेतील शिक्षकांसह शाळेतील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. आतापर्यंत सात हजार ८०० कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी ३७९ शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्यामुळे शाळेत शिक्षकांची कमी आहे.

कोट

५० टक्के विद्यार्थ्यांना शाळेत बोलविण्यात येत आहे. ज्या शाळेत रुग्ण आढळले आहेत. त्या शाळा सात दिवस बंद ठेवण्यात आल्या आहेत. शुक्रवारी ६१७ शाळांपैकी ३७६ शाळा सुरू होत्या. त्यामध्ये १३,९६० विद्यार्थी उपस्थित होते. प्रत्येक दिवशी जवळपास एवढेच विद्यार्थी उपस्थित राहत आहेत.

- उल्हास नरड, शिक्षणाधिकारी( माध्य.),