शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

जिल्ह्यात संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 23:50 IST

दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस पडत असल्याने नदी व नाल्यांना पूर आला. पुरामुळे नाल्या काठावरील सोयाबीन व कपाशीची शेती पाण्याखाली आली. रिमरिझ बरसणाऱ्या पावसाने सोमवारपासून जोर पकडला. परिणामी, पुराच्या पाण्याने रस्त्यांची दैनावस्था झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस पडत असल्याने नदी व नाल्यांना पूर आला. पुरामुळे नाल्या काठावरील सोयाबीन व कपाशीची शेती पाण्याखाली आली. रिमरिझ बरसणाऱ्या पावसाने सोमवारपासून जोर पकडला. परिणामी, पुराच्या पाण्याने रस्त्यांची दैनावस्था झाली. काही ठिकाणी पूलांना भेगा पडल्या. तालुकास्थळी जोडणारे रस्ते बंद झाल्याने नागरिक व विद्यार्थ्यांची कोंडी झाली. राज्य परिवहन मंडळाला काही मार्गांवरील फेऱ्या बंद कराव्या लागल्या. जिल्ह्यात आज सरासरी ८७. ९ टक्के पावसाची नोंद झाली. सिंदेवाही तालुक्यात आज सर्वाधिक १३९.६ मिमी तर पोंभुर्णा तालुक्यात सर्वात कमी ४४.५ मिमी पाऊस पडला. धान पिकासाठी हा पाऊस पुरेसा असल्याने उघडीप होताच रोवणीला मोठा वेग येणार आहे.जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या लगबगीत असतानाच पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. पेरणीयोग्य पाऊस पडल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी ही कामे पूर्ण केली. परंतु, त्यानंतर पावसाने दीर्घ उसंत घेतली. पुरेसा पाऊसच न आल्याने अंकूर करपण्याचा धोका निर्माण झाला होता. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे तर अवसान गळाले. धान उत्पादनात पुढे असणाºया नागभीड, सिंदेवाही, मूल, सावली, ब्रह्मपुरी, पोंभुर्णा, गोंडपिपरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तर पºहेच टाकले नव्हते. त्यामुळे भात शेतीचा हंगाम टळण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाले. परंतु, मागील दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या सर्वच भागात संततधार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पावसाने उसंत दिल्यानंतर रोवणीला सुरूवात होणार आहे. दरम्यान, पावसामुळे सावली तालुक्यातील व्याहाड बुज येथील धनराज गुरनुले यांचे घर कोसळले तर सावली येथील देवराव शिंदे, परमानंद मडावी, गजानन सोनुले, दामोदर मोहुर्ले यांच्या घरांचे अंशत: नुकसान झाले. गंगूबाई वनकर यांच्या घराची भिंत कोसळली. गोंडपिपरी, राजुरा, पोंभुर्णा, मूल, सिंदेवाही, नागभीड तालुक्यातही काही घरांचे नुकसान झाले. नाल्याला पूर आल्याने पाणी ओसरेपर्यंत नागरिकांना ताटकळत राहावे लागले.एसटीला दोन लाखांचे नुकसानदोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने चिमूर, हिंगणघाट, वर्धा, चिमूर, पिपरडा,सिंदेवाही, शिरपूर, तळोधी, पिपाळनेरी, भिसी, चिमूर नवरगाव मार्गावरील वाहतूक व्यवस्था मंगळवारी दुपारपर्यंत ठप्प झाली होती. त्यामुळे चिमूर आगाराला दोन लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आगार व्यवस्थापक प्रिंतेश रामटेके यांनी ‘लोकमत’ ला दिली.शासकीय कार्यालये ओसचिमूर तालुक्यातील बहुतांश कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी नागपूर, चंद्र्रपूर, वरोरा,सिंदेवाही, हिंगणघाट आदी शहरातून ये जा करतात. मात्र पावसाने प्रमुख मार्ग सोमवारी रात्रीपासूनच बंद झाले. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांनाविना शासकीय कार्यालये ओस पडली आहेत. पावसामुळे शेतकऱ्यांनीही शेतीची कामे बंद ठेवली. दरम्यान, वाहनधारकांनी पुलावरून पाणी असताना वाहन टाकू नये, असे आवाहन तहसीलदार संजय नागतिलक यांनी केले.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर