शहरं
Join us  
Trending Stories
1
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
2
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
3
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
4
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
6
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
7
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
8
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
9
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
10
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
11
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
12
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
13
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
14
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
15
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
16
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोललो..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
17
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
18
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
19
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
20
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक

जिल्ह्यात संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 23:50 IST

दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस पडत असल्याने नदी व नाल्यांना पूर आला. पुरामुळे नाल्या काठावरील सोयाबीन व कपाशीची शेती पाण्याखाली आली. रिमरिझ बरसणाऱ्या पावसाने सोमवारपासून जोर पकडला. परिणामी, पुराच्या पाण्याने रस्त्यांची दैनावस्था झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस पडत असल्याने नदी व नाल्यांना पूर आला. पुरामुळे नाल्या काठावरील सोयाबीन व कपाशीची शेती पाण्याखाली आली. रिमरिझ बरसणाऱ्या पावसाने सोमवारपासून जोर पकडला. परिणामी, पुराच्या पाण्याने रस्त्यांची दैनावस्था झाली. काही ठिकाणी पूलांना भेगा पडल्या. तालुकास्थळी जोडणारे रस्ते बंद झाल्याने नागरिक व विद्यार्थ्यांची कोंडी झाली. राज्य परिवहन मंडळाला काही मार्गांवरील फेऱ्या बंद कराव्या लागल्या. जिल्ह्यात आज सरासरी ८७. ९ टक्के पावसाची नोंद झाली. सिंदेवाही तालुक्यात आज सर्वाधिक १३९.६ मिमी तर पोंभुर्णा तालुक्यात सर्वात कमी ४४.५ मिमी पाऊस पडला. धान पिकासाठी हा पाऊस पुरेसा असल्याने उघडीप होताच रोवणीला मोठा वेग येणार आहे.जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या लगबगीत असतानाच पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. पेरणीयोग्य पाऊस पडल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी ही कामे पूर्ण केली. परंतु, त्यानंतर पावसाने दीर्घ उसंत घेतली. पुरेसा पाऊसच न आल्याने अंकूर करपण्याचा धोका निर्माण झाला होता. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे तर अवसान गळाले. धान उत्पादनात पुढे असणाºया नागभीड, सिंदेवाही, मूल, सावली, ब्रह्मपुरी, पोंभुर्णा, गोंडपिपरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तर पºहेच टाकले नव्हते. त्यामुळे भात शेतीचा हंगाम टळण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाले. परंतु, मागील दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या सर्वच भागात संततधार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पावसाने उसंत दिल्यानंतर रोवणीला सुरूवात होणार आहे. दरम्यान, पावसामुळे सावली तालुक्यातील व्याहाड बुज येथील धनराज गुरनुले यांचे घर कोसळले तर सावली येथील देवराव शिंदे, परमानंद मडावी, गजानन सोनुले, दामोदर मोहुर्ले यांच्या घरांचे अंशत: नुकसान झाले. गंगूबाई वनकर यांच्या घराची भिंत कोसळली. गोंडपिपरी, राजुरा, पोंभुर्णा, मूल, सिंदेवाही, नागभीड तालुक्यातही काही घरांचे नुकसान झाले. नाल्याला पूर आल्याने पाणी ओसरेपर्यंत नागरिकांना ताटकळत राहावे लागले.एसटीला दोन लाखांचे नुकसानदोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने चिमूर, हिंगणघाट, वर्धा, चिमूर, पिपरडा,सिंदेवाही, शिरपूर, तळोधी, पिपाळनेरी, भिसी, चिमूर नवरगाव मार्गावरील वाहतूक व्यवस्था मंगळवारी दुपारपर्यंत ठप्प झाली होती. त्यामुळे चिमूर आगाराला दोन लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आगार व्यवस्थापक प्रिंतेश रामटेके यांनी ‘लोकमत’ ला दिली.शासकीय कार्यालये ओसचिमूर तालुक्यातील बहुतांश कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी नागपूर, चंद्र्रपूर, वरोरा,सिंदेवाही, हिंगणघाट आदी शहरातून ये जा करतात. मात्र पावसाने प्रमुख मार्ग सोमवारी रात्रीपासूनच बंद झाले. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांनाविना शासकीय कार्यालये ओस पडली आहेत. पावसामुळे शेतकऱ्यांनीही शेतीची कामे बंद ठेवली. दरम्यान, वाहनधारकांनी पुलावरून पाणी असताना वाहन टाकू नये, असे आवाहन तहसीलदार संजय नागतिलक यांनी केले.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर