शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 23:50 IST

दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस पडत असल्याने नदी व नाल्यांना पूर आला. पुरामुळे नाल्या काठावरील सोयाबीन व कपाशीची शेती पाण्याखाली आली. रिमरिझ बरसणाऱ्या पावसाने सोमवारपासून जोर पकडला. परिणामी, पुराच्या पाण्याने रस्त्यांची दैनावस्था झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस पडत असल्याने नदी व नाल्यांना पूर आला. पुरामुळे नाल्या काठावरील सोयाबीन व कपाशीची शेती पाण्याखाली आली. रिमरिझ बरसणाऱ्या पावसाने सोमवारपासून जोर पकडला. परिणामी, पुराच्या पाण्याने रस्त्यांची दैनावस्था झाली. काही ठिकाणी पूलांना भेगा पडल्या. तालुकास्थळी जोडणारे रस्ते बंद झाल्याने नागरिक व विद्यार्थ्यांची कोंडी झाली. राज्य परिवहन मंडळाला काही मार्गांवरील फेऱ्या बंद कराव्या लागल्या. जिल्ह्यात आज सरासरी ८७. ९ टक्के पावसाची नोंद झाली. सिंदेवाही तालुक्यात आज सर्वाधिक १३९.६ मिमी तर पोंभुर्णा तालुक्यात सर्वात कमी ४४.५ मिमी पाऊस पडला. धान पिकासाठी हा पाऊस पुरेसा असल्याने उघडीप होताच रोवणीला मोठा वेग येणार आहे.जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या लगबगीत असतानाच पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. पेरणीयोग्य पाऊस पडल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी ही कामे पूर्ण केली. परंतु, त्यानंतर पावसाने दीर्घ उसंत घेतली. पुरेसा पाऊसच न आल्याने अंकूर करपण्याचा धोका निर्माण झाला होता. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे तर अवसान गळाले. धान उत्पादनात पुढे असणाºया नागभीड, सिंदेवाही, मूल, सावली, ब्रह्मपुरी, पोंभुर्णा, गोंडपिपरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तर पºहेच टाकले नव्हते. त्यामुळे भात शेतीचा हंगाम टळण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाले. परंतु, मागील दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या सर्वच भागात संततधार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पावसाने उसंत दिल्यानंतर रोवणीला सुरूवात होणार आहे. दरम्यान, पावसामुळे सावली तालुक्यातील व्याहाड बुज येथील धनराज गुरनुले यांचे घर कोसळले तर सावली येथील देवराव शिंदे, परमानंद मडावी, गजानन सोनुले, दामोदर मोहुर्ले यांच्या घरांचे अंशत: नुकसान झाले. गंगूबाई वनकर यांच्या घराची भिंत कोसळली. गोंडपिपरी, राजुरा, पोंभुर्णा, मूल, सिंदेवाही, नागभीड तालुक्यातही काही घरांचे नुकसान झाले. नाल्याला पूर आल्याने पाणी ओसरेपर्यंत नागरिकांना ताटकळत राहावे लागले.एसटीला दोन लाखांचे नुकसानदोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने चिमूर, हिंगणघाट, वर्धा, चिमूर, पिपरडा,सिंदेवाही, शिरपूर, तळोधी, पिपाळनेरी, भिसी, चिमूर नवरगाव मार्गावरील वाहतूक व्यवस्था मंगळवारी दुपारपर्यंत ठप्प झाली होती. त्यामुळे चिमूर आगाराला दोन लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आगार व्यवस्थापक प्रिंतेश रामटेके यांनी ‘लोकमत’ ला दिली.शासकीय कार्यालये ओसचिमूर तालुक्यातील बहुतांश कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी नागपूर, चंद्र्रपूर, वरोरा,सिंदेवाही, हिंगणघाट आदी शहरातून ये जा करतात. मात्र पावसाने प्रमुख मार्ग सोमवारी रात्रीपासूनच बंद झाले. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांनाविना शासकीय कार्यालये ओस पडली आहेत. पावसामुळे शेतकऱ्यांनीही शेतीची कामे बंद ठेवली. दरम्यान, वाहनधारकांनी पुलावरून पाणी असताना वाहन टाकू नये, असे आवाहन तहसीलदार संजय नागतिलक यांनी केले.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर