शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालयातून ‘तो’ फलकच गायब

By admin | Updated: May 18, 2015 01:28 IST

राज्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर माहितीचा अधिकार कायदा २००५ पासून लागू करण्यात आला.

नवरगाव : राज्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर माहितीचा अधिकार कायदा २००५ पासून लागू करण्यात आला. या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत असून प्रत्येक कार्यालयात माहिती अधिकाराचे फलक दर्शनी भागावर लावण्यात आले आहेत. परंतु नवरगाव येथील कृषी विभागाच्या कृषी मंडल कार्यालय याबाबत अपवाद ठरले असून या कार्यालयात माहिती अधिकाराचा फलकच दिसेनासा झाला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांसह शेतकरीवर्ग माहिती अधिकारापासून वंचित आहेत. तसेच संबंधित विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.भ्रष्टाचाराला आळा बसावा व सामान्य जनतेला माहिती मिळावी, या हेतूने शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था व इतर शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या ठिकाणी माहिती अधिकाराविषयी फलक दिसून येतात. मात्र शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्माण करण्यात आलेल्या नवरगाव येथील कृषी मंडल कार्यालयात माहिती अधिकाराचा फलक नसल्याने अजूनही काही विभागात जागरूकता निर्माण करण्याची वेळ आली आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहिती अधिकार कायद्याला १० वर्षाचा कालावधी होत असताना या कृषी विभागाच्या कार्यालयात माहिती अधिकाराचा फलक न दिसणे ही मोठी खेदाची बाब आहे.एखाद्या कार्यालयात माहिती अधिकाराचा फलक नसणे ही बाब माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन नाही का, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. माहिती अधिकार कायद्यातंर्गत कामकाजात सुसूत्रता येईल. सोबतच काही अंशी भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी होईल, असे अपेक्षित होते. मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने व हलगर्जीपणामुळे या कायद्याचे तीनतेरा वाजले. माहिती अधिकार कायद्यातंर्गत कोणत्या विभागात कशी माहिती मागावी, हे सर्वसामान्य जनतेला माहीत नसल्याने काही विशिष्ट लोक माहिती अधिकाराचा वापर करून आपली पोळी भाजून घेण्याचे काम करीत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचीही चर्चा जनतेत आहे. कृषी विभागाच्या मंडल कार्यालयासी शेतकरी वर्गाचा नेहमीच संबंध येतो. शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना पुरविणे हे त्यांचे काम आहे. याही कामकाजात कुठेतरी हलगर्जीपणा होत असल्याचे चव्हाट्यावर आणले. त्यातल्याच एका प्रकारात माहिती अधिकारचा फलक दर्शनी भागात लावणे अत्यावश्यक असतानाही दिसून येत नसल्याने संबंधित विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे जनतेला माहिती अधिकाराचा लाभ घेता यावा, यासाठी फलक लावण्यात यावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)