शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मराठा आरक्षणासंदर्भातील अधिसूचनेच्या विरोधात चंद्रपुरातून पाठवल्या हरकती

By साईनाथ कुचनकार | Updated: January 30, 2024 17:30 IST

राज्यघटनेत, संविधानात सगेसोयरे किंवा सरसगट हा आरक्षणाचा निकष नसून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असणे हा आरक्षणाचा निकष असतानादेखील अध्यादेश काढला, तो त्वरित रद्द करावा, अशी मागणीही करण्यात आली.

चंद्रपूर : मराठा आरक्षणासंदर्भात २६ जानेवारी रोजी महाराष्ट्र शासनाने अधिसूचना काढली. त्या संदर्भात सर्वत्र हरकत नोंदविण्यात येत आहे. चंद्रपुरातूनही ओबीसी सेवा संघाच्या वतीने मोठ्या प्रमाणात हरकत नोंदविण्यात आल्या असून पोस्ट कार्यालयाच्या माध्यमातून शासनाकडे पत्र पाठविण्यात आले आहे.ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अनिल डहाके, महासचिव ॲड. विलास माथनकर यांनी ओबीसी बांधवांना यासंदर्भात आवाहन केले होते. त्यानंतर ओबीसी सेवा संघाचे पदाधिकारी, सदस्यांनी हरकती नोंदविल्या आहे. यासाठी चंद्रपूर येथील पोस्ट कार्यालयातून सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या सचिवांना या हरकती पाठविण्यात आल्या आहेत.

प्रस्तावित मसुद्यातील तरतुदीनुसार केवळ शपथपत्राच्या व गृह चौकशीच्या आधारे जात प्रमाणपत्र देण्याचा प्रकार असंविधानिक असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. हा ओबीसींवर अन्याय असून ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नसल्याचे म्हणत आता ओबीसींना बुक्का देण्याचे काम सरकारने केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

राज्यघटनेत, संविधानात सगेसोयरे किंवा सरसगट हा आरक्षणाचा निकष नसून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असणे हा आरक्षणाचा निकष असतानादेखील अध्यादेश काढला, तो त्वरित रद्द करावा, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी प्रा. अनिल डहाके, ॲड. विलास माथनकर, प्रा. सुरेश विधाते, वसंत वडस्कर, प्रलय म्हशाखेत्री, भूषण फुसे, आकाश कडुकर, बंडू डाखरे, डॉ. संजय घाटे, आशिष वांढरे, नरेंद्र जीवतोड, स्वप्निल आस्वले यांनी पोस्टाने हरकती पाठवल्या आहेत.

मराठा समाजाचा ओबीसींमध्ये सरसकट समावेश करण्यासाठी शासनाने नियमांचा मसुदा तयार केला. हा मसुदा ओबीसी समाजाचे नुकसान करणारा आहे. त्यामुळे ओबीसी बांधवांनी स्वत: पुढाकार घेऊन १६ फेब्रुवारीपूर्वी जास्तीत जास्त हरकती नोंदवाव्यात. याबाबत ओबीसी सेवा संघाने शासनाकडे हरकती पाठविल्या आहे.-प्रा. अनिल डहाके, जिल्हाध्यक्ष,ओबीसी सेवा संघ, चंद्रपूर

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण