शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

चंद्रपूरात ओबीसी परिषद होणार; शेकडो जातींचे प्रतिनिधी करणार मंथन

By राजेश भोजेकर | Updated: December 13, 2023 14:47 IST

डॉ. अशोक जीवतोडे : मराठ्यांना आरक्षण द्या पण, ओबीसींना धक्का नको

चंद्रपूर : ओबीसीमध्ये अनेक जाती आहेत. मात्र या जातींकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. या सर्व जातींना एकत्र करून चंद्रपूरात येत्या १७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जनता महाविद्यालयाच्या पटांगणावर ओबीसी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या परिषदेत ओबीसीमध्ये समाविष्ट असलेल्या शेकडो जातीतील प्रतिनिधी सहभागी होऊन ओबीसींच्या मुद्द्यांवर आणि न्याय्य मागण्यांवर विचार मंथन करणार आहे. परिषदेत पारीत झालेला ठराव राज्य शासनाला सादर करण्यात येणार आहे, अशी विदर्भवादी ओबीसी नेते डाॅ. अशोक जिवतोडे यांनी दिली.

सध्या राज्यात मराठा आरक्षण या विषयावर जे वातावरण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजात खदखद आहे. देशाच्या स्वातंत्र्यापासून आजतागायत ओबीसी समाजाचे घटनादत्त अधिकार व हक्क प्रलंबित आहेत. ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात ओबीसी समाज व संघटना सातत्यपूर्ण लढा देत आला आहे. सध्याचे राज्यातील वातावरण बघता ओबीसी समाजाला डिवचण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येते. या सर्वकष बाबींवर ओबीसीमधील जातसमूहाचे प्रतिनिधी विचारमंथन करणार आहे, ओबीसीतील शेकडो जात संघटनांची वज्रमूठ या निमित्ताने बांधली जाणार आहे, अशी माहितीही विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. जीवतोडे यांनी दिली.

मनाेज जरांगेंच्या भूमिकेबद्दल ओबीसींमध्ये संभ्रम

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांची आरक्षणाबाबतची भूमिका वारंवार बदलताना दिसून येत आहे. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या व ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्या, ही त्यांची मागणी ओबीसी समाजाला न पटणारी आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून तर आजतागायत मराठा समाजाला राज्यात मिळालेल्या प्रतिनिधित्वानंतरही आत्मचिंतन करण्याचे सोडून समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचे कार्य ते करीत आहेत. जो ओबीसी समाज नेहमी मराठा समाजासोबत राहिला आहे. त्याच ओबीसी समाजाच्या पाठीत खंजर खुपसण्याचा प्रयत्न जरांगे यांचा दिसतो आहे, अशी टीकाही यावेळी डाॅ. जिवतोडे यांनी केली. ओबीसी समाजातील समस्त जातसमुदायाची ताकद व एकता दाखविण्यासाठीच 'ओबीसी बचाव परीषद' आयोजित करण्यात आलेली आहे, असा पुनरुच्चार डाॅ. जिवतोडे यांनी केला.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरMaratha Reservationमराठा आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जाती