शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
3
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
4
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
5
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड
6
Video : युद्धाच्या १२ दिवसांनंतर इराणचा 'पॉवर शो', एका मिनिटात ११ मिसाईल डागून जगाला दिली 'ही' वॉर्निंग!
7
Dream11, एमपीएल, झूपीसह अनेक कंपन्यांकडून 'रियल मनी गेम्स' बंद; तुमच्या पैशांचं काय होणार?
8
२८ कोटी युझर्स, ९६०० कोटींचा महसूल; Dream 11 चा 'गेम' झाला, गेमिंग विधेयकानंतर बंद करण्याची तयारी?
9
बाई हा काय प्रकार? 'पुढचं पाऊल' फेम अभिनेत्रीचा प्रताप, नवऱ्याचं फक्त धड चेहरा गायब
10
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
11
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
12
Shravan Shukravar 2025: शेवटच्या श्रावण शुक्रवारनिमित्त देवीचे 'असे' करा कुंकुमार्चन; होईल शीघ्रकृपा!
13
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
14
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
15
मराठी, इंग्रजी, गणितात किती मार्क, विश्वास नांगरे पाटलांची आठवीतील गुणपत्रिका बघितली का?
16
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
17
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
18
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?
19
Matthew Breetzke World Record : हा भाऊ काय ऐकत नाय! फिफ्टी प्लसचा 'चौकार' अन् आणखी एक विश्व विक्रमी डाव
20
"हा ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्कार जिंकण्याच्या प्रयत्नाचा एक भाग," अमेरिकेच्या माजी NSA नं भारतावरील टॅरिफवरुन केली जोरदार टीका

नेत्रदात्यांची संख्या घटली

By admin | Updated: October 8, 2014 23:22 IST

अंधाना दृष्टी मिळावी तसेच मृत्यू झाल्यानंतरही जग बघता यावे, यासाठी नेत्रदानाची संकल्पना समोर आली. तज्ज्ञ डॉक्टरांनी यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. मात्र नागरिकांची उदासीनता अंधाना

जनजागृतीची गरज : साडेपाच वर्षांत केवळ १०५ जणांनी केले नेत्रदानचंद्रपूर: अंधाना दृष्टी मिळावी तसेच मृत्यू झाल्यानंतरही जग बघता यावे, यासाठी नेत्रदानाची संकल्पना समोर आली. तज्ज्ञ डॉक्टरांनी यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. मात्र नागरिकांची उदासीनता अंधाना डोळस करण्याच्या आड येत आहे. आजही पाहिजे तशी जनजागृती झाली नसल्याने नागरिक नेत्रदान करण्यासाठी घाबरत आहे. एवढेच नाही तर, कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यानंतरही त्याचे नेत्रदान करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत नसल्याने मागील काही वर्षांमध्ये नेत्रदान करणाऱ्यांची संख्या झपाट्याने घटली आहे. समाज शिक्षित होत असला तरी, नेत्रदानासाठी आजही अंधश्रद्धा असल्याचे एका सर्व्हेक्षणात समोर आले आहे.येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत्रदान करण्यासाठी एका कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये समुपदेशनाचे काम मागील अनेक वर्षांपासून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र आजही नेत्रदानाविषयी नागरिकांत भीती आहे. विशेष म्हणजे, एकाद्या कुटुंबातील सदस्यांचा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. तर त्यांच्या कुटुंबीयाना मृत व्यक्तीचे नेत्रदान करण्यासाठी समुपदेशन केंद्राद्वारे प्रयत्न केले जाते. मात्र अनेकवेळा यासाठी कुटुंबीय तयारच होत नसल्याची बाब समोर आली आहे. शासनाने नेत्रदानाची संकल्पना समोर आणली तेव्हा एक सामाजिक कार्य म्हणून याकडे बघितले. मात्र या सामाजिक कार्याला नागरिकांनी अक्षरश: पाठ दाखविली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र संकलन केंद्राला २००९-१० आणि २०१०-११ मध्ये प्रत्येक वर्षी ४० जणांचे नेत्र संकलन करण्याचे उद्दीष्ठ देण्यात आले होते. यात २००९-१० मध्ये केवळ २८ जणांनी नेत्रदान करून अंधाना जग बघण्याची संधी दिली. २०१०-११ मध्ये यात एकाची घट होऊन २७ जणांनी नेत्रदान केले. २०११-१२ मध्ये २६ जणांनी तर २०१२-१३ मध्ये ७१ नेत्र संकलन करण्याचे उद्दीष्ट असतानाही केवळ २४ जणांनी नेत्रदान केले. २०१३-१४ मध्ये १६ जणांनी नेत्रदान केले आहे. तर चालू वर्षात पहिल्या सहा महिन्यामध्ये केवळ ४ जणांनी नेत्रदान केले आहे. नेत्रदान करणाऱ्यांची घटती संख्या लक्षात घेता नागरिकांमध्ये जनजागृतीची गरज आहे. एवढेच नाही तर, अनेकांना अंधश्रद्धेने ग्रासले असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.मृत्यूनंतर आपल्या डोळ्यांनी जग बघावे असे प्रत्येकांना वाटते. प्रत्यक्षात मात्र नेत्रदान करण्यासाठी आजही पाहिजे तसे नागरिक समोर येत नसल्याने हजारो अंधाना दृष्टीपासून वंचित राहावे लागत आहे. (नगर प्रतिनिधी)