शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

नेत्रदात्यांची संख्या घटली

By admin | Updated: October 8, 2014 23:22 IST

अंधाना दृष्टी मिळावी तसेच मृत्यू झाल्यानंतरही जग बघता यावे, यासाठी नेत्रदानाची संकल्पना समोर आली. तज्ज्ञ डॉक्टरांनी यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. मात्र नागरिकांची उदासीनता अंधाना

जनजागृतीची गरज : साडेपाच वर्षांत केवळ १०५ जणांनी केले नेत्रदानचंद्रपूर: अंधाना दृष्टी मिळावी तसेच मृत्यू झाल्यानंतरही जग बघता यावे, यासाठी नेत्रदानाची संकल्पना समोर आली. तज्ज्ञ डॉक्टरांनी यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. मात्र नागरिकांची उदासीनता अंधाना डोळस करण्याच्या आड येत आहे. आजही पाहिजे तशी जनजागृती झाली नसल्याने नागरिक नेत्रदान करण्यासाठी घाबरत आहे. एवढेच नाही तर, कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यानंतरही त्याचे नेत्रदान करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत नसल्याने मागील काही वर्षांमध्ये नेत्रदान करणाऱ्यांची संख्या झपाट्याने घटली आहे. समाज शिक्षित होत असला तरी, नेत्रदानासाठी आजही अंधश्रद्धा असल्याचे एका सर्व्हेक्षणात समोर आले आहे.येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत्रदान करण्यासाठी एका कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये समुपदेशनाचे काम मागील अनेक वर्षांपासून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र आजही नेत्रदानाविषयी नागरिकांत भीती आहे. विशेष म्हणजे, एकाद्या कुटुंबातील सदस्यांचा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. तर त्यांच्या कुटुंबीयाना मृत व्यक्तीचे नेत्रदान करण्यासाठी समुपदेशन केंद्राद्वारे प्रयत्न केले जाते. मात्र अनेकवेळा यासाठी कुटुंबीय तयारच होत नसल्याची बाब समोर आली आहे. शासनाने नेत्रदानाची संकल्पना समोर आणली तेव्हा एक सामाजिक कार्य म्हणून याकडे बघितले. मात्र या सामाजिक कार्याला नागरिकांनी अक्षरश: पाठ दाखविली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र संकलन केंद्राला २००९-१० आणि २०१०-११ मध्ये प्रत्येक वर्षी ४० जणांचे नेत्र संकलन करण्याचे उद्दीष्ठ देण्यात आले होते. यात २००९-१० मध्ये केवळ २८ जणांनी नेत्रदान करून अंधाना जग बघण्याची संधी दिली. २०१०-११ मध्ये यात एकाची घट होऊन २७ जणांनी नेत्रदान केले. २०११-१२ मध्ये २६ जणांनी तर २०१२-१३ मध्ये ७१ नेत्र संकलन करण्याचे उद्दीष्ट असतानाही केवळ २४ जणांनी नेत्रदान केले. २०१३-१४ मध्ये १६ जणांनी नेत्रदान केले आहे. तर चालू वर्षात पहिल्या सहा महिन्यामध्ये केवळ ४ जणांनी नेत्रदान केले आहे. नेत्रदान करणाऱ्यांची घटती संख्या लक्षात घेता नागरिकांमध्ये जनजागृतीची गरज आहे. एवढेच नाही तर, अनेकांना अंधश्रद्धेने ग्रासले असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.मृत्यूनंतर आपल्या डोळ्यांनी जग बघावे असे प्रत्येकांना वाटते. प्रत्यक्षात मात्र नेत्रदान करण्यासाठी आजही पाहिजे तसे नागरिक समोर येत नसल्याने हजारो अंधाना दृष्टीपासून वंचित राहावे लागत आहे. (नगर प्रतिनिधी)