शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

नेत्रदात्यांची संख्या घटली

By admin | Updated: October 8, 2014 23:22 IST

अंधाना दृष्टी मिळावी तसेच मृत्यू झाल्यानंतरही जग बघता यावे, यासाठी नेत्रदानाची संकल्पना समोर आली. तज्ज्ञ डॉक्टरांनी यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. मात्र नागरिकांची उदासीनता अंधाना

जनजागृतीची गरज : साडेपाच वर्षांत केवळ १०५ जणांनी केले नेत्रदानचंद्रपूर: अंधाना दृष्टी मिळावी तसेच मृत्यू झाल्यानंतरही जग बघता यावे, यासाठी नेत्रदानाची संकल्पना समोर आली. तज्ज्ञ डॉक्टरांनी यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. मात्र नागरिकांची उदासीनता अंधाना डोळस करण्याच्या आड येत आहे. आजही पाहिजे तशी जनजागृती झाली नसल्याने नागरिक नेत्रदान करण्यासाठी घाबरत आहे. एवढेच नाही तर, कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यानंतरही त्याचे नेत्रदान करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत नसल्याने मागील काही वर्षांमध्ये नेत्रदान करणाऱ्यांची संख्या झपाट्याने घटली आहे. समाज शिक्षित होत असला तरी, नेत्रदानासाठी आजही अंधश्रद्धा असल्याचे एका सर्व्हेक्षणात समोर आले आहे.येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत्रदान करण्यासाठी एका कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये समुपदेशनाचे काम मागील अनेक वर्षांपासून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र आजही नेत्रदानाविषयी नागरिकांत भीती आहे. विशेष म्हणजे, एकाद्या कुटुंबातील सदस्यांचा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. तर त्यांच्या कुटुंबीयाना मृत व्यक्तीचे नेत्रदान करण्यासाठी समुपदेशन केंद्राद्वारे प्रयत्न केले जाते. मात्र अनेकवेळा यासाठी कुटुंबीय तयारच होत नसल्याची बाब समोर आली आहे. शासनाने नेत्रदानाची संकल्पना समोर आणली तेव्हा एक सामाजिक कार्य म्हणून याकडे बघितले. मात्र या सामाजिक कार्याला नागरिकांनी अक्षरश: पाठ दाखविली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र संकलन केंद्राला २००९-१० आणि २०१०-११ मध्ये प्रत्येक वर्षी ४० जणांचे नेत्र संकलन करण्याचे उद्दीष्ठ देण्यात आले होते. यात २००९-१० मध्ये केवळ २८ जणांनी नेत्रदान करून अंधाना जग बघण्याची संधी दिली. २०१०-११ मध्ये यात एकाची घट होऊन २७ जणांनी नेत्रदान केले. २०११-१२ मध्ये २६ जणांनी तर २०१२-१३ मध्ये ७१ नेत्र संकलन करण्याचे उद्दीष्ट असतानाही केवळ २४ जणांनी नेत्रदान केले. २०१३-१४ मध्ये १६ जणांनी नेत्रदान केले आहे. तर चालू वर्षात पहिल्या सहा महिन्यामध्ये केवळ ४ जणांनी नेत्रदान केले आहे. नेत्रदान करणाऱ्यांची घटती संख्या लक्षात घेता नागरिकांमध्ये जनजागृतीची गरज आहे. एवढेच नाही तर, अनेकांना अंधश्रद्धेने ग्रासले असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.मृत्यूनंतर आपल्या डोळ्यांनी जग बघावे असे प्रत्येकांना वाटते. प्रत्यक्षात मात्र नेत्रदान करण्यासाठी आजही पाहिजे तसे नागरिक समोर येत नसल्याने हजारो अंधाना दृष्टीपासून वंचित राहावे लागत आहे. (नगर प्रतिनिधी)