शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

आता दर तीन महिन्यांनी सरपंच सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:30 IST

घनश्याम नवघडे नागभीड : आता दर तीन महिन्यांनी सरपंचांची सभा होणार आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाने मंगळवारी तसे ...

घनश्याम नवघडे

नागभीड : आता दर तीन महिन्यांनी सरपंचांची सभा होणार आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाने मंगळवारी तसे निर्देशच दिले आहेत. ही सभा गट विकास अधिकारी यांनी आयोजित करावयाची आहे. राज्यात सर्वत्र नवीन सरपंच पदारूढ होत आहेत, या पार्श्वभूमीवर या निर्णयाचे सरपंच वर्तुळात स्वागत होत आहे.

नवीन पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायतींना विविध अधिकार बहाल करण्यात आले आहेत. आता ग्रामपंचायतींना केंद्र व राज्य शासनाचा थेट निधीही मिळत आहे. अनेक ग्रामपंचायती चांगली कामेही करीत आहेत. मात्र ग्रामपंचायतींची कामे वेळेवर होत नसल्याबाबतच्या अनेक तक्रारी व निवेदने राज्याच्या ग्रामविकास विभागाला प्राप्त झाली होती. या बाबी विचारात घेऊन गट विकास अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सदर सभेत पंचायत विस्तार अधिकारी व इतर कर्मचारी, संबंधित सरपंच, ग्रामसेवक यांची आढावा बैठक घेऊन तक्रारी, गाऱ्हाणी व अडचणींची सोडवणूक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सदर सभा दर तीन महिन्यांनी नियमितपणे आयोजित करावी व ज्या दिवशी तक्रार निवारण दिन आहे त्याचदिवशी सदर सभेचे आयोजन करावे, असेही यात म्हटले आहे. गटविकास अधिकारी यांना सभा घेतल्यानंतर कार्यालयीन कामकाजाच्या पाच दिवसात सभेचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवावा लागणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सात दिवसांत विभागीय आयुक्तांना पाठवायचा आहे. त्यानंतर विभागीय आयुक्त दहा दिवसांत शासनाकडे पाठवतील.