शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

१०,१२ वीच्या परीक्षा केंद्रासाठी आता सुधारीत निकष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 06:00 IST

परीक्षा केंद्रासाठी यापूर्वीच्या निकषानुसार विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. पायाभूत सुविधा नसतानाही दहावी आणि बारावीचे परीक्षा केंद्र दिले जात होते. परिणामी जुन्या निकषांची दुरूस्ती करण्याची मागणी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी केली.

ठळक मुद्देसुविधा नसलेल्याशाळा वगळणार : ३१ आॅगस्टपर्यंत प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दहावी आणि बारावीच्या परिक्षाकेंद्रासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सुधारित निकष जाहीर केले आहेत. त्यामुळे या निकषांना अनुसरून जिल्ह्यातील शाळांची माहिती ३१ आॅगस्टपर्यंत पाठविण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.परीक्षा केंद्रासाठी यापूर्वीच्या निकषानुसार विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. पायाभूत सुविधा नसतानाही दहावी आणि बारावीचे परीक्षा केंद्र दिले जात होते. परिणामी जुन्या निकषांची दुरूस्ती करण्याची मागणी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी केली. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेवून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सुधारित निकष जाहीर केले. या नवीन निकषानुसार शाळा व्यवस्थापकांना सुविधा निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहे. केंद्र व्यवस्थापनासाठी दोन वर्गखोल्या आणि २५ विद्यार्थ्यांमागे एक वर्गखोली या प्रमाणात वर्गखोल्या असाव्यात. इमारतीच्या खिडक्यांना बारीक जाळ्या असाव्यात, दुहेरी बेंच प्रत्येक विद्यार्थ्याला द्यावे लागणार आहे. प्रत्येक वर्गखोलीमध्ये वीज जोडणीसह किमान २ ट्युब एलईडी व पंखे असावेत. अद्यावत संगणक प्रिंटरसह इंटरनेट सुविधा तसेच सीसीटीव्ही कॅमेरे असणाऱ्या शाळा व महाविद्यालयांना नवीन निकषानुसार केंद्रासाठी प्रथम प्राधान्य दिल्या जाणार आहे.परीक्षा कालावधीत केंद्राचे जनरेटर व्यवस्थित असावे, सर्व वर्गखोल्यांमध्ये दिवे, पंखे चालू राहतील इतक्या क्षमतेचे असावे. पर्यायी व्यवस्था म्हणून इनर्व्हटर, सौरउर्जा व अन्य सुविधा सज्ज ठेवण्याची जबाबदारी शाळेची आहे. अद्यावत अग्निशामक यंत्रणा व शाळेभोवती चारही बाजूने सुरक्षाभिंत असली पाहिजे. मुलामुलींसाठी स्वतंत्र व विद्यार्थी संख्येनुसार पुरेशी स्वच्छतागृहे असावीत.या स्वच्छतागृहांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा असावा. केंद्र शाळेत प्रथमोपचार आरोग्य पेढी ठेवावी लागणार आहे. केंद्रापासून वैद्यकीय सुविधा पोस्ट आॅफीस, बसव्यवस्था, पोलीस स्टेशनजवळच्या अंतरावर असावेत. परीक्षा विषयक गोपनीय साहित्य ठेवण्यासाठी पुरेशी सोय व सुरक्षितता असावी. परिक्षा केंद्रावर दोन महाविद्यालये ही एकाच संस्थेची नसावीत. नव्याने सांकेतांक प्राप्त शाळा, महाविद्यालयांना शक्यतो दोन वर्षांपर्यंत परिक्षा केंद्र देण्यात येऊ नये. नवीन केंद्रांना तीन वर्षांकरिता केंद्र संचालक हा त्या शाळेव्यतिरिक्त अन्य घटकांतून विभागीय मंडळाकडून देण्यात येणार आहे. असे सुधारित निकष नवीन परीक्षा केंद्रासाठी लागू करण्यात आले आहेत.विद्यार्थी संख्या वगळता ज्या अटींवर परीक्षा केंद्र मंजूर करण्यात आले. त्या अटींचे पालन केले नाही, तर केंद्र बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे आता परीक्षा केंद्राना प्रथम सुविधा उपलब्ध कराव्या लागणार आहे.शाळांना द्याव्या लागणार सुविधाशाळा, महाविद्यालयांना परीक्षा केंद्र अबाधित ठेवायचे असेल तर नवीन निकषानुसार सर्व सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, या निकषानुसार ग्रामीण आणि दुर्गम भागातील केंद्रांना मोठी कसरत करावी लागणार आहे.बोगस प्रकार थांबतीलदहावी आणि बारावीमध्ये पास होण्यासाठी अनेक विद्यार्थी गैरमार्गाचा वापर करतात. हा प्रकार टाळण्यासाठी परीक्षा मंडळाने नवीन निकष जाहीर केले आहे. त्यामुळे भविष्यात परीक्षेदरम्यान करण्यात येणारे गैरप्रकार थांबतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Educationशिक्षण