शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

ंहवालदिल शेतकऱ्यांचे आता खरिपाकडे लक्ष

By admin | Updated: April 20, 2015 01:12 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी निसर्ग मारकच ठरत आला आहे. मागील लागोपाठ दोन खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी निसर्ग मारकच ठरत आला आहे. मागील लागोपाठ दोन खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कर्जाचा बोझा अजूनही शेतकऱ्यांच्या डोक्यावरून कमी झाला नाही. रबी हंगामातही अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसानच केले आहे. अशातच हवामान खात्याने यंदा मान्सून वेळेवर बरसेल व पाऊसही चांगला होईल, असा अंदाज वर्तविल्याने नेहमीच आशावादी असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा आता नव्याने पल्लवित होऊ पाहत आहे. कृषी विभागानेही खरीपासाठी नियोजन पूर्ण केले आहे.२०१३ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. लाखो हेक्टरवरील शेती खरडून निघाली. खुद्द मुख्यमंत्र्यांना जिल्ह्याचा दौरा करावा लागला होता. काही शेतकऱ्यांना तर खरीपातील एक दानाही हाती मिळाला नाही. राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचे पॅकेज जाहीर केले. मायबाप सरकार धावून आले म्हणून शेतकऱ्यांनीही दु:खावर पांघरून घातले. मात्र राज्य शासनाची ही मदत झालेल्या नुकसानीच्या तुलनेत अतिशय तुटपुंजी होती. काही शेतकऱ्यांनाही अद्यापही ही मदत मिळाली नाही, अशी ओरड होत आहे. शासकीय मदतीतून शेतकऱ्यांचे कर्जाचे ओझे जराही हलके झाले नाही. उलट कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना वर्षभर त्याची दमछाक झाली. त्यानंतर मागील खरीप हंगामात वेळेवर मान्सून बरसला. आतातरी चांगले पीक हाती येईल, अशी आशा शेतकऱ्यांना वाटू लागली. मात्र वरूणराजाने अवकृपा दाखविणे सोडले नाही. प्रारंभी पाऊस पडल्यानंतर पावसाने अचानक दडी मारली. कित्येक दिवस पावसाचे दर्शनच झाले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. कशबशी पेरणी केल्यानंतर ऐन पीक भरात येत असतानाही पुन्हा पावसाने दडी मारली. यातही शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान झाले. हे नुकसान रबीतही भरून निघाले नाही. रबी हंगामात अवकाळी पावसाने पुन्हा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले.आता काही दिवसात पुन्हा खरीप हंगामाची लगबग सुरू होणार आहे. यावेळी हवामान खात्याने मान्सून वेळेवर बरसणार असे भाकित केले आहे. याशिवाय पावसाळ्यात वरूणराजाची कृपा चांगली असणार आहे, असाही हवामान खात्याचा अंदाज आहे. या वृत्तामुळे हवालदिल शेतकऱ्यांची थोडीशी आशा पल्लवित होऊ लागली आहे. यंदा कृषी विभागानेही आपले खरीपाचे नियोजन झटपट पूर्ण केले आहे. यावेळी चार लाख ६७ हजार ६८२ हेक्टरवर जिल्ह्यात खरीप पिकांची लागवड होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार यावेळी पुन्हा कापसाचा पेरा वाढणार असे दिसून येत आहे. कापसाचे १ लाख ३४ हजार ८२७ हेक्टरवर नियोजन करण्यात आले आहे. तर धान १ लाख ७७ हजार ६८ हेक्टर व १ लाख १८ हजार ४७४ हेक्टरवर सोयाबीन पिकांची लागवड होणार आहे. लागोपाठ दोन वर्ष खरीपाने खिसा भरण्याऐवजी खिशाला कात्री लावली होती. यावर्षी तर खरीपाने भरभरून द्यावे, अशा आशाळभूत नजरेने शेतकरी खरीप हंगामाकडे बघत आहेत. (शहर प्रतिनिधी)