शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Corona Virus in Chandrapur; आता ३० एप्रिलपर्यंत ताडोबा प्रवेशबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 19:07 IST

कोरोना व्हायरचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रातील पर्यटन स्थळी ३१ मार्चपर्यंत प्रवेश बंदीचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. आता ही प्रवेशबंदी ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना व्हायरचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रातील पर्यटन स्थळी ३१ मार्चपर्यंत प्रवेश बंदीचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. आता ही प्रवेशबंदी ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. यामुळे राज्यातील अन्य पर्यटन क्षेत्रासह ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासाठी सफारी बुक करणाऱ्या पर्यटकांना पुन्हा वाट पहावी लागणार आहे.कोरोना व्हायरसचा वाढता प्रादूर्भाव तसेच व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने तसेच अभयारण्यात देशातील विविध भागातून येणारे देशी पर्यटक व विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेटी देत असतात. त्यांच्या संपर्कात येणारे वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना सुद्धा कोरोना व्हायरसची लागण होण्याची शक्यता लक्षात घेता ३१ मार्चपर्यंत राज्यातील पर्यटन बंद ठेवण्याचा आदेश महाराष्ट्र राज्याचे मुख्य वनजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी सोमवारी काढले होते. यामध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचाही समावेश होता. महत्त्वाचे म्हणजे, कोरोनाच्या वाढत्या प्रादूभार्वामुळे ताडोबामध्ये येणाºया पर्यटकांची संख्या रोडावत होती. अशातच जिल्हा प्रशासनानेही ताडोबा येणाºया पर्यटकांचे थर्मलस्कॅनिंग करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु राज्यात कोरोना व्हायकसचा प्रसार वाढत असल्यामुळे अखेर राज्यासह ताडोबा पर्यटनही ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आले होते. नव्याने आलेल्या सूचनांनुसार राज्यातील सर्व पर्यटन क्षेत्रे ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. याबाबत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एन. आर. प्रवीण यांनी ‘लोकमत’ला दुजोरा दिला.

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प