शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
3
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
4
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
5
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
6
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
7
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
8
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
9
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
10
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
11
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
12
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
13
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
14
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
15
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
16
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
17
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
18
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
19
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
20
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!

चाॅकलेट नको, मला सॅनिटायझर हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:30 IST

चंद्रपूर : जिल्ह्यात २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहे. कोरोनापासून सुरक्षा म्हणून विद्यार्थी आता बॅगेमध्ये शालेय ...

चंद्रपूर : जिल्ह्यात २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहे. कोरोनापासून सुरक्षा म्हणून विद्यार्थी आता बॅगेमध्ये शालेय साहित्यासह सॅनिटायझरही नेत आहेत. चाॅकलेट नको तर सॅनिटायझरची बाॅटल दे, अशी मागणी पालकांकडे करीत असल्याचे दिसून येत आहे.

देशभरात मार्च २०२० पासून कोरोनाचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे इतर सर्व क्षेत्रांसह शिक्षण क्षेत्रावरही मोठा परिणाम पडला आहे. कधी नव्हे तर विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे देण्याची वेळ यावर्षी आली आहे. दरम्यान, नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत तर २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. यासाठी पालकांचे विशेष संमतिपत्रही भरून घेण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी आणि रोजच्या सवयींमध्ये मोठा बदल जाणवत आहे. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी प्रत्येक जण तशी काळजी घेत आहेत. शाळेत जाताना मुले टिफिन, पाण्याच्या बॉटलसह आता दप्तरात सॅनिटायझरची बाॅटल टाकली की नाही, याची खातरजमा स्वत:हून घेत आहेत. विशेष म्हणजे, शाळा सुरू झाल्यापासून मास्क तसेच सॅनिटायझरच्या विक्रीत वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील शाळांची सद्यस्थिती

पाचवी ते आठवीच्या एकूण शाळा

१४२८

सुरू झालेल्या शाळा

१४४५

विद्यार्थ्यांची संख्या

१,२५,५६२

शिक्षकांची उपस्थिती

३५७१

--

विद्यार्थी म्हणतात.....

शाळा सुरू झाल्यामुळे आता छान वाटत आहे. दररोज शाळेत ऑक्सिमीटर तसेच तापमान मोजले जात आहे. आम्ही शाळेत जाताना सॅनिटायझर लावून जातो तसेच येतानाही त्याचा वापर करीत आहेत.

-रीना हनवते

चंद्रपूर

----

कोरोनाला दूर ठेवण्यासाठी शाळेत जाताना मास्क तसेच सॅनिटायझरने हात धूत आहे. न चुकता दररोज याकडे लक्ष देत आहे. स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याच्या सूचना शिक्षकांकडून केल्या जात आहे. शाळेमध्येही विद्यार्थी सॅनिटयझरचा वापर करीत आहे. तसेच वारंवार हात धतत आहे.

रुद्र लडके

चंद्रपूर

---

कोरोना संसर्गापासून बचाव म्हणून आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. हात धुण्याकडे तसेच सॅनिटायझर लावण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. शाळेमध्ये विद्यार्थी पूर्णवेळ मास्क लावत आहेत, तसेच नियमांचे पालनसुद्धा करीत आहेत.

-शौर्या ससनकर

चंद्रपूर

बाॅक्स

एकही बाधित नाही

जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग २३ नोंव्हेंबरपासून सुरू झाले तर पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू झाले आहेत. शाळा सुरू करताना शिक्षकांवर जबाबदारी सोपविण्यात आली असून दक्षता घेतली जात आहे. दरम्यान, शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांची कोरोना चाचणी झाली आहे. सोशल डिस्टन्स पाळून विद्यार्थ्यांना बसविले जात आहे. गर्दी होणार नाही यासाठी विशेष काळजी घेतली जात असल्यामुळे सध्यातरी जिल्ह्यामध्ये एकाही विद्यार्थ्याला कोरोनाची लागत झालेली नाही. मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्स हे नियम पाळले जात आहेत. विशेषत: विद्यार्थीही दक्ष असल्याचे दिसून येत आहे.

-