शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

चाॅकलेट नको, मला सॅनिटायझर हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:30 IST

चंद्रपूर : जिल्ह्यात २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहे. कोरोनापासून सुरक्षा म्हणून विद्यार्थी आता बॅगेमध्ये शालेय ...

चंद्रपूर : जिल्ह्यात २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहे. कोरोनापासून सुरक्षा म्हणून विद्यार्थी आता बॅगेमध्ये शालेय साहित्यासह सॅनिटायझरही नेत आहेत. चाॅकलेट नको तर सॅनिटायझरची बाॅटल दे, अशी मागणी पालकांकडे करीत असल्याचे दिसून येत आहे.

देशभरात मार्च २०२० पासून कोरोनाचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे इतर सर्व क्षेत्रांसह शिक्षण क्षेत्रावरही मोठा परिणाम पडला आहे. कधी नव्हे तर विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे देण्याची वेळ यावर्षी आली आहे. दरम्यान, नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत तर २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. यासाठी पालकांचे विशेष संमतिपत्रही भरून घेण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी आणि रोजच्या सवयींमध्ये मोठा बदल जाणवत आहे. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी प्रत्येक जण तशी काळजी घेत आहेत. शाळेत जाताना मुले टिफिन, पाण्याच्या बॉटलसह आता दप्तरात सॅनिटायझरची बाॅटल टाकली की नाही, याची खातरजमा स्वत:हून घेत आहेत. विशेष म्हणजे, शाळा सुरू झाल्यापासून मास्क तसेच सॅनिटायझरच्या विक्रीत वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील शाळांची सद्यस्थिती

पाचवी ते आठवीच्या एकूण शाळा

१४२८

सुरू झालेल्या शाळा

१४४५

विद्यार्थ्यांची संख्या

१,२५,५६२

शिक्षकांची उपस्थिती

३५७१

--

विद्यार्थी म्हणतात.....

शाळा सुरू झाल्यामुळे आता छान वाटत आहे. दररोज शाळेत ऑक्सिमीटर तसेच तापमान मोजले जात आहे. आम्ही शाळेत जाताना सॅनिटायझर लावून जातो तसेच येतानाही त्याचा वापर करीत आहेत.

-रीना हनवते

चंद्रपूर

----

कोरोनाला दूर ठेवण्यासाठी शाळेत जाताना मास्क तसेच सॅनिटायझरने हात धूत आहे. न चुकता दररोज याकडे लक्ष देत आहे. स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याच्या सूचना शिक्षकांकडून केल्या जात आहे. शाळेमध्येही विद्यार्थी सॅनिटयझरचा वापर करीत आहे. तसेच वारंवार हात धतत आहे.

रुद्र लडके

चंद्रपूर

---

कोरोना संसर्गापासून बचाव म्हणून आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. हात धुण्याकडे तसेच सॅनिटायझर लावण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. शाळेमध्ये विद्यार्थी पूर्णवेळ मास्क लावत आहेत, तसेच नियमांचे पालनसुद्धा करीत आहेत.

-शौर्या ससनकर

चंद्रपूर

बाॅक्स

एकही बाधित नाही

जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग २३ नोंव्हेंबरपासून सुरू झाले तर पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू झाले आहेत. शाळा सुरू करताना शिक्षकांवर जबाबदारी सोपविण्यात आली असून दक्षता घेतली जात आहे. दरम्यान, शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांची कोरोना चाचणी झाली आहे. सोशल डिस्टन्स पाळून विद्यार्थ्यांना बसविले जात आहे. गर्दी होणार नाही यासाठी विशेष काळजी घेतली जात असल्यामुळे सध्यातरी जिल्ह्यामध्ये एकाही विद्यार्थ्याला कोरोनाची लागत झालेली नाही. मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्स हे नियम पाळले जात आहेत. विशेषत: विद्यार्थीही दक्ष असल्याचे दिसून येत आहे.

-