शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

चाॅकलेट नको, मला सॅनिटायझर हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:30 IST

चंद्रपूर : जिल्ह्यात २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहे. कोरोनापासून सुरक्षा म्हणून विद्यार्थी आता बॅगेमध्ये शालेय ...

चंद्रपूर : जिल्ह्यात २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहे. कोरोनापासून सुरक्षा म्हणून विद्यार्थी आता बॅगेमध्ये शालेय साहित्यासह सॅनिटायझरही नेत आहेत. चाॅकलेट नको तर सॅनिटायझरची बाॅटल दे, अशी मागणी पालकांकडे करीत असल्याचे दिसून येत आहे.

देशभरात मार्च २०२० पासून कोरोनाचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे इतर सर्व क्षेत्रांसह शिक्षण क्षेत्रावरही मोठा परिणाम पडला आहे. कधी नव्हे तर विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे देण्याची वेळ यावर्षी आली आहे. दरम्यान, नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत तर २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. यासाठी पालकांचे विशेष संमतिपत्रही भरून घेण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी आणि रोजच्या सवयींमध्ये मोठा बदल जाणवत आहे. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी प्रत्येक जण तशी काळजी घेत आहेत. शाळेत जाताना मुले टिफिन, पाण्याच्या बॉटलसह आता दप्तरात सॅनिटायझरची बाॅटल टाकली की नाही, याची खातरजमा स्वत:हून घेत आहेत. विशेष म्हणजे, शाळा सुरू झाल्यापासून मास्क तसेच सॅनिटायझरच्या विक्रीत वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील शाळांची सद्यस्थिती

पाचवी ते आठवीच्या एकूण शाळा

१४२८

सुरू झालेल्या शाळा

१४४५

विद्यार्थ्यांची संख्या

१,२५,५६२

शिक्षकांची उपस्थिती

३५७१

--

विद्यार्थी म्हणतात.....

शाळा सुरू झाल्यामुळे आता छान वाटत आहे. दररोज शाळेत ऑक्सिमीटर तसेच तापमान मोजले जात आहे. आम्ही शाळेत जाताना सॅनिटायझर लावून जातो तसेच येतानाही त्याचा वापर करीत आहेत.

-रीना हनवते

चंद्रपूर

----

कोरोनाला दूर ठेवण्यासाठी शाळेत जाताना मास्क तसेच सॅनिटायझरने हात धूत आहे. न चुकता दररोज याकडे लक्ष देत आहे. स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याच्या सूचना शिक्षकांकडून केल्या जात आहे. शाळेमध्येही विद्यार्थी सॅनिटयझरचा वापर करीत आहे. तसेच वारंवार हात धतत आहे.

रुद्र लडके

चंद्रपूर

---

कोरोना संसर्गापासून बचाव म्हणून आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. हात धुण्याकडे तसेच सॅनिटायझर लावण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. शाळेमध्ये विद्यार्थी पूर्णवेळ मास्क लावत आहेत, तसेच नियमांचे पालनसुद्धा करीत आहेत.

-शौर्या ससनकर

चंद्रपूर

बाॅक्स

एकही बाधित नाही

जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग २३ नोंव्हेंबरपासून सुरू झाले तर पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू झाले आहेत. शाळा सुरू करताना शिक्षकांवर जबाबदारी सोपविण्यात आली असून दक्षता घेतली जात आहे. दरम्यान, शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांची कोरोना चाचणी झाली आहे. सोशल डिस्टन्स पाळून विद्यार्थ्यांना बसविले जात आहे. गर्दी होणार नाही यासाठी विशेष काळजी घेतली जात असल्यामुळे सध्यातरी जिल्ह्यामध्ये एकाही विद्यार्थ्याला कोरोनाची लागत झालेली नाही. मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्स हे नियम पाळले जात आहेत. विशेषत: विद्यार्थीही दक्ष असल्याचे दिसून येत आहे.

-