शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

९० टक्के कोल्हापुरी बंधारे निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 23:38 IST

आॅनलाईन लोकमतकोठारी : सिंचनावर विशेष लक्ष केंद्रीत करुन या माध्यमातून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, शेतीसाठी मुबलक पाणी मिळावे व उत्पन्नात कमालीची वाढ व्हावी. तसेच नापिकीने शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागू नये, यासाठी कोठारी परिसरात शेकडो बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. त्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले. मात्र अधिकाºयांच्या दुर्लक्षितपणामुळे या परिसरातील ९० ...

आॅनलाईन लोकमतकोठारी : सिंचनावर विशेष लक्ष केंद्रीत करुन या माध्यमातून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, शेतीसाठी मुबलक पाणी मिळावे व उत्पन्नात कमालीची वाढ व्हावी. तसेच नापिकीने शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागू नये, यासाठी कोठारी परिसरात शेकडो बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. त्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले. मात्र अधिकाºयांच्या दुर्लक्षितपणामुळे या परिसरातील ९० टक्के बंधारे निकामी झाल्याचे वास्तव पुढे आले आहे.जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागातर्फे तसेच कृषी विभागाअंतर्गत बारमाही वाहणाऱ्या जिवंत नाल्यावर, हंगामी वाहनाºया नाल्यावर, याशिवाय मुळीच न वाहनाऱ्या नाल्यावर कोल्हापुरी, सिमेंट प्लग बंधाऱ्याची निर्मिती ठिकठिकाणी करण्यात आली. या बंधाऱ्याचे पाणी अडवून शेतकऱ्यांची कोरडवाहू शेती सिंचनाखाली आणून शेती सुजलाम सुफलाम करुन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा शासनाचा प्रयत्न होता. त्यासाठी करोडो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. बंधारे बांधकाम पूर्ण झाले. शासनाच्या रेकॉर्डवर शेतकऱ्यासाठी सिंचनाची तजवीज केल्याची नोंद झाली. मात्र वास्तविक चित्र वेगळेच आहे. शेती सिंचनासाठी बांधण्यात आलेल्या बंधाºयाची देखरेख संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली नाही. परिणामी आजघडीला हे बंधारे पाणी अडविण्याऐवजी पाणी वाहण्यासाठी वाट मोकळी करताना दिसत आहे. अनेक बंधारे पडले आहेत. त्याच्या भिंती पडून विखुरल्या आहेत. पाणी अडविण्यासाठी बंधाºयावर टाकण्यात आलेल्या पाट्या चोरीला गेल्या आहेत.चौकशी व्हावीसिंचन विभाग, कृषी विभाग व वनविभागांतर्गत बांधण्यात आलेल्या मागील चार वर्षाचे बंधारे तपासणी, प्रत्यक्ष पाहणी करावी व जबाबदार संबंधित अधिकाऱ्यांवर व बंधारे बांधकाम केलेल्या कंत्राटदारांवर, निरीक्षण करणाºया अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.वनविभागाचे बंधारेही निकामीमागील चार वर्षापासून वनविभागाच्या जंगल क्षेत्रातील नाल्यात बंधारे बांधकामावर विशेष जोर देण्यात आला. या जंगलाचा विकास व वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये व त्यात वन्यप्राण्यांचा जीव जाऊ नये, यासाठी वनक्षेत्रात बंधारे बांधकामावर शासनाने निधी उपलब्ध करुन दिला. मात्र याही विभागातील खांबुगिरी व अधिकाºयांच्या दुर्लक्षतेमुळे अनेक बंधारे केवळ शोभेची वास्तू ठरत आहे. ज्या उद्देशाने सिमेंट प्लग, गॅबीन, दगडी बंधारे बांधण्यात आले. त्या उद्देशालाच हरताळ फासण्यात आल्याचे वास्तव्य चित्र आहे.