शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

९० टक्के कोल्हापुरी बंधारे निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 23:38 IST

आॅनलाईन लोकमतकोठारी : सिंचनावर विशेष लक्ष केंद्रीत करुन या माध्यमातून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, शेतीसाठी मुबलक पाणी मिळावे व उत्पन्नात कमालीची वाढ व्हावी. तसेच नापिकीने शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागू नये, यासाठी कोठारी परिसरात शेकडो बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. त्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले. मात्र अधिकाºयांच्या दुर्लक्षितपणामुळे या परिसरातील ९० ...

आॅनलाईन लोकमतकोठारी : सिंचनावर विशेष लक्ष केंद्रीत करुन या माध्यमातून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, शेतीसाठी मुबलक पाणी मिळावे व उत्पन्नात कमालीची वाढ व्हावी. तसेच नापिकीने शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागू नये, यासाठी कोठारी परिसरात शेकडो बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. त्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले. मात्र अधिकाºयांच्या दुर्लक्षितपणामुळे या परिसरातील ९० टक्के बंधारे निकामी झाल्याचे वास्तव पुढे आले आहे.जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागातर्फे तसेच कृषी विभागाअंतर्गत बारमाही वाहणाऱ्या जिवंत नाल्यावर, हंगामी वाहनाºया नाल्यावर, याशिवाय मुळीच न वाहनाऱ्या नाल्यावर कोल्हापुरी, सिमेंट प्लग बंधाऱ्याची निर्मिती ठिकठिकाणी करण्यात आली. या बंधाऱ्याचे पाणी अडवून शेतकऱ्यांची कोरडवाहू शेती सिंचनाखाली आणून शेती सुजलाम सुफलाम करुन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा शासनाचा प्रयत्न होता. त्यासाठी करोडो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. बंधारे बांधकाम पूर्ण झाले. शासनाच्या रेकॉर्डवर शेतकऱ्यासाठी सिंचनाची तजवीज केल्याची नोंद झाली. मात्र वास्तविक चित्र वेगळेच आहे. शेती सिंचनासाठी बांधण्यात आलेल्या बंधाºयाची देखरेख संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली नाही. परिणामी आजघडीला हे बंधारे पाणी अडविण्याऐवजी पाणी वाहण्यासाठी वाट मोकळी करताना दिसत आहे. अनेक बंधारे पडले आहेत. त्याच्या भिंती पडून विखुरल्या आहेत. पाणी अडविण्यासाठी बंधाºयावर टाकण्यात आलेल्या पाट्या चोरीला गेल्या आहेत.चौकशी व्हावीसिंचन विभाग, कृषी विभाग व वनविभागांतर्गत बांधण्यात आलेल्या मागील चार वर्षाचे बंधारे तपासणी, प्रत्यक्ष पाहणी करावी व जबाबदार संबंधित अधिकाऱ्यांवर व बंधारे बांधकाम केलेल्या कंत्राटदारांवर, निरीक्षण करणाºया अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.वनविभागाचे बंधारेही निकामीमागील चार वर्षापासून वनविभागाच्या जंगल क्षेत्रातील नाल्यात बंधारे बांधकामावर विशेष जोर देण्यात आला. या जंगलाचा विकास व वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये व त्यात वन्यप्राण्यांचा जीव जाऊ नये, यासाठी वनक्षेत्रात बंधारे बांधकामावर शासनाने निधी उपलब्ध करुन दिला. मात्र याही विभागातील खांबुगिरी व अधिकाºयांच्या दुर्लक्षतेमुळे अनेक बंधारे केवळ शोभेची वास्तू ठरत आहे. ज्या उद्देशाने सिमेंट प्लग, गॅबीन, दगडी बंधारे बांधण्यात आले. त्या उद्देशालाच हरताळ फासण्यात आल्याचे वास्तव्य चित्र आहे.