शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

नऊ सरपंचांनी दिला काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा सामूहिक राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 18:57 IST

ब्रह्मपुरी तालुक्यातील नऊ सरपंच व तीन उपसरपंचांनी सदस्यत्वाचा सामूहिक राजीनामा दिला आहे. ऐन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर या राजीनाम्यांनी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

ठळक मुद्देनिवडणुकांच्या तोंडावर राजीनाम्याने उलटसुलट चर्चा

चंद्रपूर : निवडणुकीवेळी प्रत्येक ग्रामपंचायतीला २५ लाख रुपये देण्याचे पालकमंत्र्यांनी मान्य केले होते. मात्र, अद्यापही त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला नाही. तसेच तालुका काँग्रेस कमिटीकडून कोणतेही काम होत नाही. या कारणाने ब्रम्हपुरी तालुक्यातील नऊ सरपंच व तीन उपसरपंचांनी सदस्यत्वाचा सामूहिक राजीनामा दिला आहे. ऐन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर या राजीनाम्यांनी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

मागील सात-आठ वर्षांपासून तालुक्यात काँग्रेसची पकड मजबूत झाली आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. चिमूर तालुक्यात काही गावांचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीवेळी पालकमंत्र्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीला विकासकामांकरिता २५ लाख रुपये देणार असल्याचे सांगितले होते. मात्र, अद्यापही ही रक्कम मिळालेली नाही. तसेच काँग्रेस कमिटीकडून कोणतीही कामे होत नाहीत, असा आरोप करत तालुकाध्यक्ष तिडके यांच्याकडे सरपंच, उपसरपंच यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यात संजय राऊत तोरगव बु, राकेश पिलारे कलेता, शरद अलोणे तोरागाव खु., सुधीर पिलारे बेलागाव, प्रवीण बांडे नांदगाव, सुरेश दुनेदार पिंपळगाव, राजू नान्हे काहाली, अर्चना डेंगे खंडाळा, प्रेमानंद गेडाम सोनेगाव या सरपंचांसह नरेश राऊत कालेता, नंदकिशोर रखडे खंडाळा या उपसरपंचांचा समावेश आहे.

स्थानिक आमदार विकासनिधीअभावी संबंधित गावांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली नाहीत. मात्र, पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना मिळालेल्या निवेदनानुसार, या गावांमध्ये विकासकामे करण्यासाठी इतर शासकीय विकासनिधीतून कामे मंजूर करण्याचे प्रस्तावित केले आहे. परंतु, विकासनिधी देण्यास विलंब झाल्याचे एकमेव कारण हे कोरोना संकटकाळात राज्याच्या तिजोरीत झालेला खडखडाट हे आहे.

तसेच ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटी हे ब्रम्हपुरी व चिमुर विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या तालुक्यांतील सर्व गावांमधील काॅंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी यांच्या सर्व प्रश्नांचे निराकरण करत असतात. तालुका काँग्रेस कमिटीकडे काम घेऊन येणारे ग्रामस्थ हे कधीच निराश होऊन परतत नाहीत. त्यामुळे त्या ९ गावांतील सरपंचांनी दिलेले पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे तालुका काॅंग्रेस कमिटीने फेटाळले आहेत.

- खेमराज तिडके, तालुकाध्यक्ष, काँग्रेस कमिटी

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारResignationराजीनामाsarpanchसरपंच