शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

नऊ सरपंचांनी दिला काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा सामूहिक राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 18:57 IST

ब्रह्मपुरी तालुक्यातील नऊ सरपंच व तीन उपसरपंचांनी सदस्यत्वाचा सामूहिक राजीनामा दिला आहे. ऐन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर या राजीनाम्यांनी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

ठळक मुद्देनिवडणुकांच्या तोंडावर राजीनाम्याने उलटसुलट चर्चा

चंद्रपूर : निवडणुकीवेळी प्रत्येक ग्रामपंचायतीला २५ लाख रुपये देण्याचे पालकमंत्र्यांनी मान्य केले होते. मात्र, अद्यापही त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला नाही. तसेच तालुका काँग्रेस कमिटीकडून कोणतेही काम होत नाही. या कारणाने ब्रम्हपुरी तालुक्यातील नऊ सरपंच व तीन उपसरपंचांनी सदस्यत्वाचा सामूहिक राजीनामा दिला आहे. ऐन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर या राजीनाम्यांनी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

मागील सात-आठ वर्षांपासून तालुक्यात काँग्रेसची पकड मजबूत झाली आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. चिमूर तालुक्यात काही गावांचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीवेळी पालकमंत्र्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीला विकासकामांकरिता २५ लाख रुपये देणार असल्याचे सांगितले होते. मात्र, अद्यापही ही रक्कम मिळालेली नाही. तसेच काँग्रेस कमिटीकडून कोणतीही कामे होत नाहीत, असा आरोप करत तालुकाध्यक्ष तिडके यांच्याकडे सरपंच, उपसरपंच यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यात संजय राऊत तोरगव बु, राकेश पिलारे कलेता, शरद अलोणे तोरागाव खु., सुधीर पिलारे बेलागाव, प्रवीण बांडे नांदगाव, सुरेश दुनेदार पिंपळगाव, राजू नान्हे काहाली, अर्चना डेंगे खंडाळा, प्रेमानंद गेडाम सोनेगाव या सरपंचांसह नरेश राऊत कालेता, नंदकिशोर रखडे खंडाळा या उपसरपंचांचा समावेश आहे.

स्थानिक आमदार विकासनिधीअभावी संबंधित गावांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली नाहीत. मात्र, पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना मिळालेल्या निवेदनानुसार, या गावांमध्ये विकासकामे करण्यासाठी इतर शासकीय विकासनिधीतून कामे मंजूर करण्याचे प्रस्तावित केले आहे. परंतु, विकासनिधी देण्यास विलंब झाल्याचे एकमेव कारण हे कोरोना संकटकाळात राज्याच्या तिजोरीत झालेला खडखडाट हे आहे.

तसेच ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटी हे ब्रम्हपुरी व चिमुर विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या तालुक्यांतील सर्व गावांमधील काॅंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी यांच्या सर्व प्रश्नांचे निराकरण करत असतात. तालुका काँग्रेस कमिटीकडे काम घेऊन येणारे ग्रामस्थ हे कधीच निराश होऊन परतत नाहीत. त्यामुळे त्या ९ गावांतील सरपंचांनी दिलेले पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे तालुका काॅंग्रेस कमिटीने फेटाळले आहेत.

- खेमराज तिडके, तालुकाध्यक्ष, काँग्रेस कमिटी

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारResignationराजीनामाsarpanchसरपंच