शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

नऊ सरपंचांनी दिला काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा सामूहिक राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 18:57 IST

ब्रह्मपुरी तालुक्यातील नऊ सरपंच व तीन उपसरपंचांनी सदस्यत्वाचा सामूहिक राजीनामा दिला आहे. ऐन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर या राजीनाम्यांनी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

ठळक मुद्देनिवडणुकांच्या तोंडावर राजीनाम्याने उलटसुलट चर्चा

चंद्रपूर : निवडणुकीवेळी प्रत्येक ग्रामपंचायतीला २५ लाख रुपये देण्याचे पालकमंत्र्यांनी मान्य केले होते. मात्र, अद्यापही त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला नाही. तसेच तालुका काँग्रेस कमिटीकडून कोणतेही काम होत नाही. या कारणाने ब्रम्हपुरी तालुक्यातील नऊ सरपंच व तीन उपसरपंचांनी सदस्यत्वाचा सामूहिक राजीनामा दिला आहे. ऐन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर या राजीनाम्यांनी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

मागील सात-आठ वर्षांपासून तालुक्यात काँग्रेसची पकड मजबूत झाली आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. चिमूर तालुक्यात काही गावांचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीवेळी पालकमंत्र्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीला विकासकामांकरिता २५ लाख रुपये देणार असल्याचे सांगितले होते. मात्र, अद्यापही ही रक्कम मिळालेली नाही. तसेच काँग्रेस कमिटीकडून कोणतीही कामे होत नाहीत, असा आरोप करत तालुकाध्यक्ष तिडके यांच्याकडे सरपंच, उपसरपंच यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यात संजय राऊत तोरगव बु, राकेश पिलारे कलेता, शरद अलोणे तोरागाव खु., सुधीर पिलारे बेलागाव, प्रवीण बांडे नांदगाव, सुरेश दुनेदार पिंपळगाव, राजू नान्हे काहाली, अर्चना डेंगे खंडाळा, प्रेमानंद गेडाम सोनेगाव या सरपंचांसह नरेश राऊत कालेता, नंदकिशोर रखडे खंडाळा या उपसरपंचांचा समावेश आहे.

स्थानिक आमदार विकासनिधीअभावी संबंधित गावांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली नाहीत. मात्र, पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना मिळालेल्या निवेदनानुसार, या गावांमध्ये विकासकामे करण्यासाठी इतर शासकीय विकासनिधीतून कामे मंजूर करण्याचे प्रस्तावित केले आहे. परंतु, विकासनिधी देण्यास विलंब झाल्याचे एकमेव कारण हे कोरोना संकटकाळात राज्याच्या तिजोरीत झालेला खडखडाट हे आहे.

तसेच ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटी हे ब्रम्हपुरी व चिमुर विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या तालुक्यांतील सर्व गावांमधील काॅंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी यांच्या सर्व प्रश्नांचे निराकरण करत असतात. तालुका काँग्रेस कमिटीकडे काम घेऊन येणारे ग्रामस्थ हे कधीच निराश होऊन परतत नाहीत. त्यामुळे त्या ९ गावांतील सरपंचांनी दिलेले पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे तालुका काॅंग्रेस कमिटीने फेटाळले आहेत.

- खेमराज तिडके, तालुकाध्यक्ष, काँग्रेस कमिटी

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारResignationराजीनामाsarpanchसरपंच