शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
6
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
7
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
8
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
9
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
10
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
11
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
12
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
13
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
14
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
15
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
16
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
17
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
18
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
19
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!

नवा भूसंपादन कायदा शेतकरी हितविरोधी

By admin | Updated: April 3, 2015 01:02 IST

केंद्र सरकारने आणू घातलेला भूमी अधिग्रहण कायदा शेतकरी हित विरोधातील असून उद्योगपतीधार्जिना आहे.

शेवटपर्यंंत विरोध करणार : शेतकरी संघटनेची भूमिकाचंद्रपूर : केंद्र सरकारने आणू घातलेला भूमी अधिग्रहण कायदा शेतकरी हित विरोधातील असून उद्योगपतीधार्जिना आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचे आणि ग्रामसभेच्याअधिकाराचे हनन होत आहे. यामुळे या कायद्याला अखेरपर्यंत विरोध करण्याची भूमिका शेतकरी संघटनेचे नेते अ‍ॅड. वामनराव चटप यांनी गुरूवारी चंद्रपुरात व्यक्त केली. या कायद्यासंदर्भातील माहिती देताना ते म्हणाले, एलएआरआर-२०११ (लँड अ‍ॅक्विझिशन रिसेफलमेंट रिव्हॅल्यूवेशन अ‍ॅक्ट-२०११) या नावाने या कायद्याच्या अध्यादेशाचे प्रारूप २०११ मध्ये तयार करण्यात आले होते. त्यानंतर जनचर्चेसाठी ठेवण्यात आले होते. पुढे २०१३ मध्ये ते संसदेत सादर करताना नाव बदलण्यात आले होते. तत्कालिन खासदार सुषमा स्वराज यांनी या प्रारूपावर आक्षेप घेवून ते अपूर्ण असल्याने संसदेच्या प्रारूप समितीकडे पाठविण्याची विनंती सरकारला केली होती.हा प्रस्ताव मान्य करून तत्कालिन खासदार सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षतेखालील कमेटीकडे सादर करण्यात आला होता. पुढे तत्कालिन ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांनी या कायद्याचे नवे प्रारूप संसदेत मांडल्यावर २०१३ मध्ये एकमताने मंजूर झाले होते. २७ सप्टेंबर २०१३ रोजी राष्ट्रपतींची सही झाल्याने १ जानेवारी २०१४ पासून ते देशभर लागू होणार होते. मात्र त्यावर ३१ डिसेंबर २०१४ रोजी दुरूस्तीचा अध्यादेश निघाला. आता तांत्रिक अडचणी पार करून सरकार हे विधेयक पुन्हा लागू करण्याच्या मार्गावर आहे.या कायद्यातील चार प्रमुख उद्देशांचा विचार करता शेतकऱ्यांच्या हितविरोधातच हा कायदा असल्याचा आरोप अ‍ॅड. चटप यांनी केला. ते म्हणाले, उद्योगासाठी बळजबरीने अधिग्रहण, राष्ट्रीय प्रकल्प व सुरक्षा प्रकल्पासाठी, ग्रामीण विकास संरचनेसाठी आणि रेल्व रस्ते विकास या चार उद्देशांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत करण्याचा अधिकार सरकारला मिळणार आहे. रेल्वमार्ग रस्ता विकासातील उद्देशात लोहमार्गालगतची एक किलोमीटर जमीन सरकार अधिग्रहित केली जाणार आहे. या नुसार, मुंबई-दिल्ली या एक हजार २०० किलोमीटर रेल्वेमार्गालगतची ४ लाख ६ हजार जमीन अधिग्रहीत केली जाणार असून अमृतसर-कलकत्ता, चेन्नई-बंगरूळ, मुंबई-बंगरूळ या चार रेल्वे प्रकल्पालगतची जमिन अधिग्रहीत केली जाणार आहे. भविष्यात ही जमिन उद्योगपतींच्या घश्यात टाकण्याचा सरकारचा डाव आहे. मात्र शेतकरी संघटना हे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही, असा विश्वास अ‍ॅड. चटप यांनी यावेळी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला श्रीधर बलकी, रवि गोखरे, दिवाकर माणुसमारे, प्राचार्य अनिल ठाकूरवार, प्रभाकर दिवे, विलास मोरे, नितीन डाखरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)