शहरं
Join us  
Trending Stories
1
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
2
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
3
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
4
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
5
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
6
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
7
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
8
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
9
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
10
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
11
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
12
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
13
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
14
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
15
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
16
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
17
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
18
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
19
रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जण जखमी
20
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."

नवा भूसंपादन कायदा शेतकरी हितविरोधी

By admin | Updated: April 3, 2015 01:02 IST

केंद्र सरकारने आणू घातलेला भूमी अधिग्रहण कायदा शेतकरी हित विरोधातील असून उद्योगपतीधार्जिना आहे.

शेवटपर्यंंत विरोध करणार : शेतकरी संघटनेची भूमिकाचंद्रपूर : केंद्र सरकारने आणू घातलेला भूमी अधिग्रहण कायदा शेतकरी हित विरोधातील असून उद्योगपतीधार्जिना आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचे आणि ग्रामसभेच्याअधिकाराचे हनन होत आहे. यामुळे या कायद्याला अखेरपर्यंत विरोध करण्याची भूमिका शेतकरी संघटनेचे नेते अ‍ॅड. वामनराव चटप यांनी गुरूवारी चंद्रपुरात व्यक्त केली. या कायद्यासंदर्भातील माहिती देताना ते म्हणाले, एलएआरआर-२०११ (लँड अ‍ॅक्विझिशन रिसेफलमेंट रिव्हॅल्यूवेशन अ‍ॅक्ट-२०११) या नावाने या कायद्याच्या अध्यादेशाचे प्रारूप २०११ मध्ये तयार करण्यात आले होते. त्यानंतर जनचर्चेसाठी ठेवण्यात आले होते. पुढे २०१३ मध्ये ते संसदेत सादर करताना नाव बदलण्यात आले होते. तत्कालिन खासदार सुषमा स्वराज यांनी या प्रारूपावर आक्षेप घेवून ते अपूर्ण असल्याने संसदेच्या प्रारूप समितीकडे पाठविण्याची विनंती सरकारला केली होती.हा प्रस्ताव मान्य करून तत्कालिन खासदार सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षतेखालील कमेटीकडे सादर करण्यात आला होता. पुढे तत्कालिन ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांनी या कायद्याचे नवे प्रारूप संसदेत मांडल्यावर २०१३ मध्ये एकमताने मंजूर झाले होते. २७ सप्टेंबर २०१३ रोजी राष्ट्रपतींची सही झाल्याने १ जानेवारी २०१४ पासून ते देशभर लागू होणार होते. मात्र त्यावर ३१ डिसेंबर २०१४ रोजी दुरूस्तीचा अध्यादेश निघाला. आता तांत्रिक अडचणी पार करून सरकार हे विधेयक पुन्हा लागू करण्याच्या मार्गावर आहे.या कायद्यातील चार प्रमुख उद्देशांचा विचार करता शेतकऱ्यांच्या हितविरोधातच हा कायदा असल्याचा आरोप अ‍ॅड. चटप यांनी केला. ते म्हणाले, उद्योगासाठी बळजबरीने अधिग्रहण, राष्ट्रीय प्रकल्प व सुरक्षा प्रकल्पासाठी, ग्रामीण विकास संरचनेसाठी आणि रेल्व रस्ते विकास या चार उद्देशांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत करण्याचा अधिकार सरकारला मिळणार आहे. रेल्वमार्ग रस्ता विकासातील उद्देशात लोहमार्गालगतची एक किलोमीटर जमीन सरकार अधिग्रहित केली जाणार आहे. या नुसार, मुंबई-दिल्ली या एक हजार २०० किलोमीटर रेल्वेमार्गालगतची ४ लाख ६ हजार जमीन अधिग्रहीत केली जाणार असून अमृतसर-कलकत्ता, चेन्नई-बंगरूळ, मुंबई-बंगरूळ या चार रेल्वे प्रकल्पालगतची जमिन अधिग्रहीत केली जाणार आहे. भविष्यात ही जमिन उद्योगपतींच्या घश्यात टाकण्याचा सरकारचा डाव आहे. मात्र शेतकरी संघटना हे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही, असा विश्वास अ‍ॅड. चटप यांनी यावेळी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला श्रीधर बलकी, रवि गोखरे, दिवाकर माणुसमारे, प्राचार्य अनिल ठाकूरवार, प्रभाकर दिवे, विलास मोरे, नितीन डाखरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)