शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

ना आधारकार्ड, ना रेशनकार्ड; जिवंत असल्याचा पुरावा काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 11:57 IST

Chandrapur : भटक्या-जमातीतील कुटुंबाची अशीही व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही या देशातल्या व चंद्रपूर जिल्ह्यातील भटके-विमुक्तांकडे अद्यापही रेशनकार्ड, आधारकार्ड व मतदारकार्डही नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे त्यांना शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. अशा या भटक्या कुटुंबाकडे जिवंत असल्याचा पुरावा काय, असा प्रश्न पडत आहे.

चंद्रपूर शहरातील नागपूर रोड, दाताळा रोड यासोबतच गडचिरोली रोड, बल्लारपूर रोड येथे अनेक भटक्या समाजातील अनेक भटके कुटुंब वास्तव्यास आहेत. व्यवसायासाठी ते गावोगावी भटकत असतात. गॅस शेकडी, कुकर दुरुस्ती, गोणे व फन्ऱ्या शिवणे, किंगरी व दमसाहेब वाजवून ते कुटुंबाचे पालनपोषण करतात. या पालातील मुले शिक्षणापासून वंचित आहेत. यांच्यातील बहुतांश जणांकडे आधारकार्ड, रेशनकार्ड नसल्याने यांना योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. 

समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूरच मतदारकार्ड नाही तात्पुरती वस्ती करून राहणाऱ्या अनेकांकडे मतदान कार्ड नाही. एवढेच नाही तर अनेकजण शिक्षणापासून दूर आहेत. ते समाजाच्या मुख्य प्रवाहापासूनच दूरच आहेत.

रेशनकार्ड नाही कुठलेही कागदपत्रे नसल्यामुळे या भटक्या लोकांकडे रेशनकार्ड नाही, त्यामुळे त्यांना शासकीय धान्याचा लाभ मिळत नाही.

आधारकार्ड नाही पालात राहणाऱ्या बहुतांश लोकांकडे आधारकार्ड नाही. त्यांना स्वतःची ओळख पटवून देताना अडचणी निर्माण होत आहेत.

एकही प्रमाणपत्र नाही अशा कुटुंबाकडे आधारकार्ड, मतदारकार्ड, रेशनकार्ड नाही. हातावर आणून पानावर खाणे ही त्यांची परिस्थिती आहे.

कुठल्याचा शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेक कागदपत्र जोडावे लागतात. परंतु, या लोकांकडे कुठलेही प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही.

कागदपत्रे देण्यात अडचण काय? कामधंदा करायचा आणि पोटाची खळगी भरायची यावरच त्यांचे लक्ष केंद्रित असते. कागदपत्र गोळा करण्यासाठी पुरावे लागतात.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर