शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

Corona Virus in Chandrapur; मरकजवरून आलेल्या वडिलांचा अहवाल निगेटिव्ह; मात्र दोन्ही मुलांना कोरोना संसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 20:14 IST

जैजूर येथील रहिवासी दिल्ली येथील मरकज संमेलनात गेले होते. परत आल्यावर त्यांना तपासणीसाठी वांकडी येथे क्वारंटाईन ठेवण्यात आले होते. परंतु त्यांचा मेडिकल अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. घरी गेल्यानंतर त्यांच्या दोन मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांना हैद्राबादला नेण्यात आले.

ठळक मुद्देमहाराष्ट्र सीमेलगतच्या तेलगंणा राज्यात कोरोनाबाधित रूग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र राज्याच्या सीमेला लागून असलेल्या तेलंगणा राज्यातील आसिफाबाद जिल्हा वांकडी मंडळामधील जैनूर येथील रहिवासी दोन व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्यामुळे वांकडीवरून त्यांना हैद्राबादला कुटूंबासह रेफर करण्यात आले आहे. जैनूर हे गाव महाराष्ट्र सीमेला अगदी लागून असल्यामुळे तेथील जनता भयभित झाली आहे.जैजूर येथील रहिवासी दिल्ली येथील मरकज संमेलनात गेले होते. परत आल्यावर त्यांना तपासणीसाठी वांकडी येथे क्वारंटाईन ठेवण्यात आले होते. परंतु त्यांचा मेडिकल अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. घरी गेल्यानंतर त्यांच्या दोन मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांना हैद्राबादला नेण्यात आले. सोबत त्यांच्या पूर्ण कुटुंबाला नेण्यात आले आहे.जैनुर हे गांव महाराष्ट्र राज्याच्या जिवती तालुक्याच्या सीमेस लागून आहे. येथील नागरिक बाजारपेठ व नाते संबंध असल्यामुळे नियमित जैनूरला जात-येत असतात. बाधीत व्यक्तीच्या वहिलाचा तपासणी अहवाल निगेटीव्ह असताना मुलांना कसा काय कोरोनाचा संसर्ग झाला, हेच आरोग्य विभागाला कळेनासे झाले आहे. त्यामुळे वडिलाच्या अहवालावर संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, वडिलांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे ते बऱ्याच दिवसापासून मोकळे फिरत होते. सध्या जैनुर परिसर सील करण्यात आला आहे. त्यामुळे याची दखल महाराष्टÑ शासनास घेणे गरजेचे असून संर्पकांचा शोध-घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर लक्कडकोट व जिवती सीमा सील करणे गरजेचे झाले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस